शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

किनारपट्टी अध्यादेश विनाशाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 02:28 IST

किनारपट्टी नियमन क्षेत्रासाठी (सीआरझेड) अधिसूचना २०१८ काढण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय म्हणजे विकासाला नाही, तर किनारपट्टीच्या विनाशाला आमंत्रण ठरेल.

- सुलक्षणा महाजन(नगरविकास तज्ज्ञ)सध्याच्या केंद्र शासनाच्या काही लाडक्या समजुती आहेत. कारभाराचा झपाटा दाखविण्यासाठी अध्यादेश काढणे ही त्यातलीच एक. अध्यादेशाने राज्य सरकारे किंवा शहरांचा कारभार सांभाळणाऱ्या नगर-महापालिका, उद्योजक, नागरिक आपोआप कृतिशील होतात आणि विकास होतो, अशीही केंद्र शासनाची समजूत आहे. किनारपट्टी नियमन क्षेत्रासाठी (सीआरझेड) अधिसूचना २०१८ काढण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय म्हणजे विकासाला नाही, तर किनारपट्टीच्या विनाशाला आमंत्रण ठरेल.या अधिसूचनेमुळे किनारपट्टी भागातील बांधकामांवर असलेल्या चटई क्षेत्राच्या मर्यादा हटविल्या जाणार आहेत. मुंबईच्या आणि देशाच्या किनाºयावर पारंपरिक कोळीवाडे आहेत. प्रचलित ५०० मीटर रुंदीच्या संरक्षित किनारा नियमामुळे कोळीवाड्यांमध्ये कोणतेही नवीन बांधकाम करता येत नसे. त्यांच्यासाठी विशेष नियम आवश्यक आहेत. कोळीवाडा विकासासाठी नियमावलीत सुधारणा व्हावी, म्हणून पर्यावरण आणि सामाजिक चळवळीतील लोक प्रयत्नशील होते. त्यांचे निमित्त करून, संपूर्ण किनारपट्टीवरील चटईक्षेत्रावर असलेल्या मर्यादा काढून टाकण्याची गरज नव्हती, परंतु दिल्ली दरबारी मुंबईमधील विकासकांची भलामण करणाºया राजकीय नेत्यांचे वजन सध्या खूप जास्त असल्यामुळेच हा अध्यादेश काढला गेला असावा.समुद्रकिनारी बांधकामांना मागणी जास्त असते आणि नफा अफाट असतो. त्यामुळे विकासकांना भूखंड सांडपाणी किंवा मैलापाणी प्रक्रियेसाठी खर्ची घालायचे नसतात. आता अशा बांधकामांसाठी नगरपालिका किनारपट्टीमध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारून विकासकांना मदत करू शकतील. विकासक कोळीवाडे विकसित करताना चटई क्षेत्र वाट्टेल तसे वाढवून बांधू शकतील. वास्तवात सांडपाणी, मैलापाणी, उद्योगांनी वापरलेले पाणी यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी अनेक कायदे आणि तंत्रे उपलब्ध असूनही प्रदूषित पाणी नदी, नाले आणि समुद्रामध्ये सोडले जाते. कारण त्यासाठी लागणारी आर्थिक गुंतवणूक आणि देखभाल दुरुस्तीचा खर्च करण्याची आपल्या नगरपालिकांची, महानगरपालिकांची आणि विकासकांची वृत्ती नाही. आता तर किनारपट्टी प्रदूषण करण्याचा हक्कच त्यांना मिळणार आहे.पर्यटन क्षेत्राला किनारपट्टीचे विशेष आकर्षण असते. त्यांच्यासाठी ७,५०० किलोमीटर लांबीचा किनारा शासनाने मुक्त करून दिला आहे. यामुळे किनारपट्टीतील जमीन मालक, कोळीवाड्यातील सामान्य मतदार, शहरातील विकासक आणि त्यांचे श्रीमंत ग्राहक यांना मोठाच फायदा होणार आहे. नवीन वर्षात येणाºया निवडणुकीच्या तोंडावर केंद्र शासनाला विकासक पैसे पुरवू शकतात, तर सामान्य लोक मते. त्यामुळेच हा अध्यादेश म्हणजे त्यांच्यासाठी नवीन वर्षाची भेटच असणार आहे.या अध्यादेशानुसार समुद्रामधील बेटांना तर विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. बेटांच्या किनाºयापासून ना विकास क्षेत्राची रुंदी ५०० मीटरवरून केवळ २० मीटर इतकी कमी केली आहे. पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने अशी बेटे सर्वात आकर्षक असली, तरी तेथे जमिनीची धूप आणि प्रदूषणाचा धोका वाढणार आहे. हवामान बदलाच्या परिणामी समुद्राच्या पातळीत वाढहोण्याचा धोका हा अध्यादेश काढताना लक्षातही घेतला नसावा.लोकसंख्या वाढ, नागरीकरण आणि निसर्गातील साधनसामुग्रीचा अवास्तव उपभोग, यामुळे सर्व जगावरच पर्यावरण संकटाचे सावट आहे. भारतासारख्या विकसनशील देशामधील समस्या जास्तच गंभीर आहेत. पाण्याचे स्रोत, नदीकिनारे आणि समुद्रकिनारे यावर होणारे परिणाम आपल्याच मुळावर येणारे आहेत. त्यामुळेच पर्यावरण संकटाशी सामना करणे, निसर्गाचे जतन आणि संवर्धन हे उद्देश जागतिक आणि स्थानिक महत्त्वाचे झाले आहेत. प्रत्येक ठिकाणचा निसर्ग वेगळा आणि त्याच्या संवर्धनाचे मार्गही वेगवेगळे असणार आहेत. असे वेगवेगळे मार्ग स्थानिक पातळीवर तेथील लोकांनी शोधायचे असतात. त्यासाठी समाजाची पर्यावरण जाणीव वाढवून वृत्ती घडावी लागते. उद्देश, मार्ग आणि सामाजिक वृत्ती या तिन्ही गोष्टींचा मेळ घालूनच पर्यावरण रक्षण होऊ शकते. चांगल्या हेतूने अनेक कायदे केले शासनाने केले असले, काही तंत्रे शोधली असली, तरी नागरिकांमध्ये जी पर्यावरणीय सामाजिक वृत्ती असावी लागते, ती आपल्या आपल्याकडे अभावानेच दिसते.कोणार्क मंदिराजवळ, समुद्रकिनाºयाजवळ जमीन, पाणी आणि आकाश यांची होणारी उपेक्षा बघून संवेदनशील पंतप्रधान इंदिरा गांधी व्यथित झाल्या होत्या. त्यांच्या पुढाकारामुळे समुद्रकिनारा संवर्धन कायदा १९९१ मध्ये केला होता. त्याचा आढावा घेऊन डॉ. स्वामिनाथन यांनी केलेल्या शिफारशी आणि सर्व राज्यांशी चर्चा होऊन २०११ साली त्यात बदल करण्यात आले. त्याकडे दुर्लक्ष करून शासनाने हा नवा अध्यादेश काढून पर्यावरण जतनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई