शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आधी ‘हा’ कचरा साफ करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:14 IST

स्वच्छ शहरासाठी नागपूर महापालिकेने कंबर कसली आहे. आज स्वच्छ शहरांच्या यादीत नागपूरचा १३७ वा क्रमांक आहे. तो २० च्या आत आणण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे.

स्वच्छ शहरासाठी नागपूर महापालिकेने कंबर कसली आहे. आज स्वच्छ शहरांच्या यादीत नागपूरचा १३७ वा क्रमांक आहे. तो २० च्या आत आणण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे. याचा अर्थ मनपाला सेंच्युरी मारून वर आणखी काही धावा काढाव्या लागणार आहेत. आजची शहराची स्थिती पाहू जाता हे आव्हान नजीकच्या काळात पूर्ण होईल अशी आशा बाळगणे वेडेपणाचे ठरेल. कारण मोहीम यशस्वी करतो म्हटले तर मनपाला युद्धपातळीवर काम तर करावेच लागेल शिवाय नागरिकांचा १०० टक्के सहभागही त्यात घ्यावा लागणार आहे. केवळ प्रचंड पैसा ओतून एकट्या प्रशासकीय पातळीवर हे आव्हान पेलणे शक्य नाही. यात लोकसहभाग किती मिळतो हे महत्त्वाचे आहे. प्रत्येक नागरिकाला आपले घर स्वच्छ असावे असेच वाटते. पण आपल्या घरातला कचरा शेजारच्या अंगणात टाकण्याची वाईट खोड आम्हाला आहे. ही मानसिकता बदलल्याशिवाय ‘स्वच्छ परिसर, स्वच्छ शहर’ ही संकल्पना प्रत्यक्षात येणे शक्य नाही. प्रशासकीय पातळीवर महापालिकेने अनेक योजना हाती घेतल्या आहे. पण सर्वच योजना सामुदायिक जबाबदारीतून पार पाडतो म्हटले तर त्यात कुठेकुठे ढिलाई होण्याची शक्यता असते. यासाठी व्यक्तिगत पातळीवर उत्तरदायित्व निश्चित करण्याची गरज असते. शहराच्या काही भागांत चांगले काम सुरू आहे. तर काही भाग विकासापासून कोसो दूर आहेत, असे जे आज चित्र दिसते त्यातून त्या त्या भागातील अधिकारी, नगरसेवक कसे काम करतात हे दिसून येते. तेव्हा सर्व अधिकारी आणि नगरसेवकांना त्यांच्या भागांतील विकासकामांबाबत व्यक्तीश: जबाबदार धरले तर शहराचा समतोल विकास शक्य आहे. शहरातील वाढते अतिक्रमण हे कचºयाचे मुख्य स्रोत आहे. आज शहरातील बहुसंख्य भागातील फुटपाथवर अतिक्रमण दिसून येते. मिसळ, पावभाजीचे ठेले, चहाच्या टपºया, पान गुटख्याची दुकाने ही जास्तीत जास्त कचरा निर्माण करणारी ठिकाणे आहेत. अतिक्रमणविरोधी पथक कधीकाळी कारवाई करते, पण सकाळी कारवाई झाली की दुपारी ‘जैसे थे’ होते. प्रशासनातील काही लोकांचे आशीर्वाद असल्याशिवाय अतिक्रमण करणारे एवढी हिंमत करू शकत नाही. शहरात ठिकठिकाणी बांधकाम चालू असते. त्याचे सर्व साहित्य रस्त्यावरच विखुरले असते. पावसाळ्यात तेथे पाणी साचून घाण पसरते. याविरुद्ध कायद्यात दंडाची तरतूद आहे. पण येथे कायद्याचे भय आहे कुणाला? ‘काय द्यायचे’ तेवढे बोला म्हणून मामला रफादफा केला जातो. तेव्हा ही सर्व साफसफाई झाल्याशिवाय स्वच्छता मोहिमेला बळ मिळणार नाही हे स्पष्ट आहे. आणखी एक, ओला कचरा, सुका कचरा. मग त्यासाठी कोणत्या कुंड्या वापरायच्या यावर काथ्याकूट न करता आणि हा मुद्दा प्रतिष्ठेचाही न करता शहराची ‘कचराकोंडी’ फोडता आली तर पहिल्या २० शहरांत नागपूरला आणण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे असे मानता येईल.

टॅग्स :nagpurनागपूरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान