शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

आधी ‘हा’ कचरा साफ करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:14 IST

स्वच्छ शहरासाठी नागपूर महापालिकेने कंबर कसली आहे. आज स्वच्छ शहरांच्या यादीत नागपूरचा १३७ वा क्रमांक आहे. तो २० च्या आत आणण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे.

स्वच्छ शहरासाठी नागपूर महापालिकेने कंबर कसली आहे. आज स्वच्छ शहरांच्या यादीत नागपूरचा १३७ वा क्रमांक आहे. तो २० च्या आत आणण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे. याचा अर्थ मनपाला सेंच्युरी मारून वर आणखी काही धावा काढाव्या लागणार आहेत. आजची शहराची स्थिती पाहू जाता हे आव्हान नजीकच्या काळात पूर्ण होईल अशी आशा बाळगणे वेडेपणाचे ठरेल. कारण मोहीम यशस्वी करतो म्हटले तर मनपाला युद्धपातळीवर काम तर करावेच लागेल शिवाय नागरिकांचा १०० टक्के सहभागही त्यात घ्यावा लागणार आहे. केवळ प्रचंड पैसा ओतून एकट्या प्रशासकीय पातळीवर हे आव्हान पेलणे शक्य नाही. यात लोकसहभाग किती मिळतो हे महत्त्वाचे आहे. प्रत्येक नागरिकाला आपले घर स्वच्छ असावे असेच वाटते. पण आपल्या घरातला कचरा शेजारच्या अंगणात टाकण्याची वाईट खोड आम्हाला आहे. ही मानसिकता बदलल्याशिवाय ‘स्वच्छ परिसर, स्वच्छ शहर’ ही संकल्पना प्रत्यक्षात येणे शक्य नाही. प्रशासकीय पातळीवर महापालिकेने अनेक योजना हाती घेतल्या आहे. पण सर्वच योजना सामुदायिक जबाबदारीतून पार पाडतो म्हटले तर त्यात कुठेकुठे ढिलाई होण्याची शक्यता असते. यासाठी व्यक्तिगत पातळीवर उत्तरदायित्व निश्चित करण्याची गरज असते. शहराच्या काही भागांत चांगले काम सुरू आहे. तर काही भाग विकासापासून कोसो दूर आहेत, असे जे आज चित्र दिसते त्यातून त्या त्या भागातील अधिकारी, नगरसेवक कसे काम करतात हे दिसून येते. तेव्हा सर्व अधिकारी आणि नगरसेवकांना त्यांच्या भागांतील विकासकामांबाबत व्यक्तीश: जबाबदार धरले तर शहराचा समतोल विकास शक्य आहे. शहरातील वाढते अतिक्रमण हे कचºयाचे मुख्य स्रोत आहे. आज शहरातील बहुसंख्य भागातील फुटपाथवर अतिक्रमण दिसून येते. मिसळ, पावभाजीचे ठेले, चहाच्या टपºया, पान गुटख्याची दुकाने ही जास्तीत जास्त कचरा निर्माण करणारी ठिकाणे आहेत. अतिक्रमणविरोधी पथक कधीकाळी कारवाई करते, पण सकाळी कारवाई झाली की दुपारी ‘जैसे थे’ होते. प्रशासनातील काही लोकांचे आशीर्वाद असल्याशिवाय अतिक्रमण करणारे एवढी हिंमत करू शकत नाही. शहरात ठिकठिकाणी बांधकाम चालू असते. त्याचे सर्व साहित्य रस्त्यावरच विखुरले असते. पावसाळ्यात तेथे पाणी साचून घाण पसरते. याविरुद्ध कायद्यात दंडाची तरतूद आहे. पण येथे कायद्याचे भय आहे कुणाला? ‘काय द्यायचे’ तेवढे बोला म्हणून मामला रफादफा केला जातो. तेव्हा ही सर्व साफसफाई झाल्याशिवाय स्वच्छता मोहिमेला बळ मिळणार नाही हे स्पष्ट आहे. आणखी एक, ओला कचरा, सुका कचरा. मग त्यासाठी कोणत्या कुंड्या वापरायच्या यावर काथ्याकूट न करता आणि हा मुद्दा प्रतिष्ठेचाही न करता शहराची ‘कचराकोंडी’ फोडता आली तर पहिल्या २० शहरांत नागपूरला आणण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे असे मानता येईल.

टॅग्स :nagpurनागपूरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान