शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

आधी ‘हा’ कचरा साफ करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:14 IST

स्वच्छ शहरासाठी नागपूर महापालिकेने कंबर कसली आहे. आज स्वच्छ शहरांच्या यादीत नागपूरचा १३७ वा क्रमांक आहे. तो २० च्या आत आणण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे.

स्वच्छ शहरासाठी नागपूर महापालिकेने कंबर कसली आहे. आज स्वच्छ शहरांच्या यादीत नागपूरचा १३७ वा क्रमांक आहे. तो २० च्या आत आणण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे. याचा अर्थ मनपाला सेंच्युरी मारून वर आणखी काही धावा काढाव्या लागणार आहेत. आजची शहराची स्थिती पाहू जाता हे आव्हान नजीकच्या काळात पूर्ण होईल अशी आशा बाळगणे वेडेपणाचे ठरेल. कारण मोहीम यशस्वी करतो म्हटले तर मनपाला युद्धपातळीवर काम तर करावेच लागेल शिवाय नागरिकांचा १०० टक्के सहभागही त्यात घ्यावा लागणार आहे. केवळ प्रचंड पैसा ओतून एकट्या प्रशासकीय पातळीवर हे आव्हान पेलणे शक्य नाही. यात लोकसहभाग किती मिळतो हे महत्त्वाचे आहे. प्रत्येक नागरिकाला आपले घर स्वच्छ असावे असेच वाटते. पण आपल्या घरातला कचरा शेजारच्या अंगणात टाकण्याची वाईट खोड आम्हाला आहे. ही मानसिकता बदलल्याशिवाय ‘स्वच्छ परिसर, स्वच्छ शहर’ ही संकल्पना प्रत्यक्षात येणे शक्य नाही. प्रशासकीय पातळीवर महापालिकेने अनेक योजना हाती घेतल्या आहे. पण सर्वच योजना सामुदायिक जबाबदारीतून पार पाडतो म्हटले तर त्यात कुठेकुठे ढिलाई होण्याची शक्यता असते. यासाठी व्यक्तिगत पातळीवर उत्तरदायित्व निश्चित करण्याची गरज असते. शहराच्या काही भागांत चांगले काम सुरू आहे. तर काही भाग विकासापासून कोसो दूर आहेत, असे जे आज चित्र दिसते त्यातून त्या त्या भागातील अधिकारी, नगरसेवक कसे काम करतात हे दिसून येते. तेव्हा सर्व अधिकारी आणि नगरसेवकांना त्यांच्या भागांतील विकासकामांबाबत व्यक्तीश: जबाबदार धरले तर शहराचा समतोल विकास शक्य आहे. शहरातील वाढते अतिक्रमण हे कचºयाचे मुख्य स्रोत आहे. आज शहरातील बहुसंख्य भागातील फुटपाथवर अतिक्रमण दिसून येते. मिसळ, पावभाजीचे ठेले, चहाच्या टपºया, पान गुटख्याची दुकाने ही जास्तीत जास्त कचरा निर्माण करणारी ठिकाणे आहेत. अतिक्रमणविरोधी पथक कधीकाळी कारवाई करते, पण सकाळी कारवाई झाली की दुपारी ‘जैसे थे’ होते. प्रशासनातील काही लोकांचे आशीर्वाद असल्याशिवाय अतिक्रमण करणारे एवढी हिंमत करू शकत नाही. शहरात ठिकठिकाणी बांधकाम चालू असते. त्याचे सर्व साहित्य रस्त्यावरच विखुरले असते. पावसाळ्यात तेथे पाणी साचून घाण पसरते. याविरुद्ध कायद्यात दंडाची तरतूद आहे. पण येथे कायद्याचे भय आहे कुणाला? ‘काय द्यायचे’ तेवढे बोला म्हणून मामला रफादफा केला जातो. तेव्हा ही सर्व साफसफाई झाल्याशिवाय स्वच्छता मोहिमेला बळ मिळणार नाही हे स्पष्ट आहे. आणखी एक, ओला कचरा, सुका कचरा. मग त्यासाठी कोणत्या कुंड्या वापरायच्या यावर काथ्याकूट न करता आणि हा मुद्दा प्रतिष्ठेचाही न करता शहराची ‘कचराकोंडी’ फोडता आली तर पहिल्या २० शहरांत नागपूरला आणण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे असे मानता येईल.

टॅग्स :nagpurनागपूरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान