शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

आधी ‘हा’ कचरा साफ करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:14 IST

स्वच्छ शहरासाठी नागपूर महापालिकेने कंबर कसली आहे. आज स्वच्छ शहरांच्या यादीत नागपूरचा १३७ वा क्रमांक आहे. तो २० च्या आत आणण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे.

स्वच्छ शहरासाठी नागपूर महापालिकेने कंबर कसली आहे. आज स्वच्छ शहरांच्या यादीत नागपूरचा १३७ वा क्रमांक आहे. तो २० च्या आत आणण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे. याचा अर्थ मनपाला सेंच्युरी मारून वर आणखी काही धावा काढाव्या लागणार आहेत. आजची शहराची स्थिती पाहू जाता हे आव्हान नजीकच्या काळात पूर्ण होईल अशी आशा बाळगणे वेडेपणाचे ठरेल. कारण मोहीम यशस्वी करतो म्हटले तर मनपाला युद्धपातळीवर काम तर करावेच लागेल शिवाय नागरिकांचा १०० टक्के सहभागही त्यात घ्यावा लागणार आहे. केवळ प्रचंड पैसा ओतून एकट्या प्रशासकीय पातळीवर हे आव्हान पेलणे शक्य नाही. यात लोकसहभाग किती मिळतो हे महत्त्वाचे आहे. प्रत्येक नागरिकाला आपले घर स्वच्छ असावे असेच वाटते. पण आपल्या घरातला कचरा शेजारच्या अंगणात टाकण्याची वाईट खोड आम्हाला आहे. ही मानसिकता बदलल्याशिवाय ‘स्वच्छ परिसर, स्वच्छ शहर’ ही संकल्पना प्रत्यक्षात येणे शक्य नाही. प्रशासकीय पातळीवर महापालिकेने अनेक योजना हाती घेतल्या आहे. पण सर्वच योजना सामुदायिक जबाबदारीतून पार पाडतो म्हटले तर त्यात कुठेकुठे ढिलाई होण्याची शक्यता असते. यासाठी व्यक्तिगत पातळीवर उत्तरदायित्व निश्चित करण्याची गरज असते. शहराच्या काही भागांत चांगले काम सुरू आहे. तर काही भाग विकासापासून कोसो दूर आहेत, असे जे आज चित्र दिसते त्यातून त्या त्या भागातील अधिकारी, नगरसेवक कसे काम करतात हे दिसून येते. तेव्हा सर्व अधिकारी आणि नगरसेवकांना त्यांच्या भागांतील विकासकामांबाबत व्यक्तीश: जबाबदार धरले तर शहराचा समतोल विकास शक्य आहे. शहरातील वाढते अतिक्रमण हे कचºयाचे मुख्य स्रोत आहे. आज शहरातील बहुसंख्य भागातील फुटपाथवर अतिक्रमण दिसून येते. मिसळ, पावभाजीचे ठेले, चहाच्या टपºया, पान गुटख्याची दुकाने ही जास्तीत जास्त कचरा निर्माण करणारी ठिकाणे आहेत. अतिक्रमणविरोधी पथक कधीकाळी कारवाई करते, पण सकाळी कारवाई झाली की दुपारी ‘जैसे थे’ होते. प्रशासनातील काही लोकांचे आशीर्वाद असल्याशिवाय अतिक्रमण करणारे एवढी हिंमत करू शकत नाही. शहरात ठिकठिकाणी बांधकाम चालू असते. त्याचे सर्व साहित्य रस्त्यावरच विखुरले असते. पावसाळ्यात तेथे पाणी साचून घाण पसरते. याविरुद्ध कायद्यात दंडाची तरतूद आहे. पण येथे कायद्याचे भय आहे कुणाला? ‘काय द्यायचे’ तेवढे बोला म्हणून मामला रफादफा केला जातो. तेव्हा ही सर्व साफसफाई झाल्याशिवाय स्वच्छता मोहिमेला बळ मिळणार नाही हे स्पष्ट आहे. आणखी एक, ओला कचरा, सुका कचरा. मग त्यासाठी कोणत्या कुंड्या वापरायच्या यावर काथ्याकूट न करता आणि हा मुद्दा प्रतिष्ठेचाही न करता शहराची ‘कचराकोंडी’ फोडता आली तर पहिल्या २० शहरांत नागपूरला आणण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे असे मानता येईल.

टॅग्स :nagpurनागपूरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान