शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

Citizenship Amendment Bill: ईशान्येतील विसंवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 04:11 IST

संसदेत जे जमले ते संसदेबाहेर जमलेले दिसत नाही.

भारतीय नागरिकत्व कायद्यातील सुधारणांवर बहुमताची मोहर उमटल्यानंतर देशातील वातावरण काहीसे दुभंगले आहे. संसदेत अन्य पक्षांची मदत भाजपला मिळाली. मात्र संसदेत जे जमले ते संसदेबाहेर जमलेले दिसत नाही. दिल्ली, राजस्थान, पंजाब येथील स्थलांतरितांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी अन्य ठिकाणी उत्साह नाही. ३७० कलम रद्द केल्यावर नागरिकांमध्ये जसे समाधानाचे वातावरण होते तसे या वेळी झालेले नाही. उलट विविध समाजघटकांमध्ये साशंकतेची भावना दाटली आहे.

भारताला हिंदूराष्ट्र करण्याच्या दिशेने हे पाऊल आहे यामुळे एकीकडे अस्वस्थता असताना या सुधारणेमुळे आपल्याच प्रदेशात आपण अल्पसंख्य होणार ही धास्ती ईशान्य भारतात वाढत आहे. तेथे भय स्थलांतरित हिंदूंबद्दल आहे. गृहमंत्री अमित शहा म्हणतात, की समाजामध्ये अशी धास्ती निर्माण करण्यात विरोधी पक्षांचे राजकीय हेतू आहेत. हे मान्य केले, तरी या लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यात सरकार कमी पडते आहे आणि संवादाचा अभाव किंवा एकतर्फी संवाद हे याचे मुख्य कारण आहे. विदेशात धार्मिक छळ सोसणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांना देशात स्थान देण्यास कोणाचा विरोध नाही.

भारत हाच त्यांना आधार वाटला पाहिजे अशीच सर्वांची भावना आहे. विरोध आहे तो केवळ धर्म हा निकष लावून प्रवेश देण्याला वा अटकाव करण्याला. यातून देशात दुभंगलेपणाची भावना वाढीस लागत आहे. देशाची एकात्मता राखण्यासाठी धाडसी निर्णय घ्यावे लागतात असे सरकारतर्फे सांगण्यात येते. परंतु, नागरिकत्वातील सुधारणांसारख्या मुद्द्यांवर समाजात ऐक्यापेक्षा दुभंग अधिक प्रगट होताना दिसतो. अशावेळी जनतेशी संवाद साधण्यात केंद्र सरकार कमी पडत आहे हे वारंवार लक्षात येते. काश्मीरमध्ये अद्याप विश्वासाचे वातावरण निर्माण झालेले नाही. नागरिकत्व कायद्यातील बदलांमुळे तेथे स्वस्थता येण्यास आणखी वेळ लागेल.

देशातील अल्पसंख्याकांनी सरकारवर विश्वास ठेवावा असे केंद्रीय गृहमंत्री राज्यसभेत दोन वेळा म्हणाले. पण अशा वक्तव्यांनी अल्पसंख्याकांचे समाधान होण्यासारखे नाही. सरकारची प्रतिमा आश्वासक वाटली पाहिजे. तशी ती देशातील अल्पसंख्याकांना वाटत नाही आणि आसाम, त्रिपुरातील बहुसंख्याकांनाही वाटत नाही. नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती करण्यापूर्वी ईशान्य भारतातील शंभराहून अधिक संघटनांशी अमित शहा यांनी चर्चा केली होती असे सांगतात. तरीही भाजपची सत्ता असलेल्या त्रिपुरा व आसाम येथे जनतेच्या रागाचा उद्रेक झाला, यावरून संवादाचा अभाव स्पष्ट व्हावा. ईशान्य भारतातील बहुतांश प्रदेश या नव्या कायद्याच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आला आहे. आसाम व त्रिपुरामधील काही भागांतही ही नवी सुधारणा लागू होणार नाही. तरीही तेथील नागरिकांचा प्रखर विरोध सुरू आहे. तो विरोध बांगलादेशातील बंगाली हिंदूंना ईशान्य भारतात मुक्तद्वार मिळेल म्हणून आहे.

एनआरसीला या भागात ९० लाख हिंदू स्थलांतरित आढळले. नव्या कायद्यामुळे या सर्वांना नागरिकत्व आणि मतदानाचा हक्क मिळेल. यामुळे तेथील समाजव्यवस्थेचे स्वरूप बदलून स्थानिक अल्पसंख्य होतील, स्थानिकांच्या संस्कृतीवर आक्रमण होईल ही धास्ती तेथील जनतेला वाटते. स्थलांतरितांना नागरिकत्व मिळण्याचा कालावधीही १२ वर्षांवरून पाच वर्षांवर आणण्यात आला आहे. म्हणजे ९० लाख स्थलांतरितांना नागरिकत्वाचा हक्क देऊन भाजप तेथे आपली व्होट बँक तयार करीत आहे. भाजपचा हा राजकीय डाव हे असंतोषाचे एक कारण असले तरी मुख्य कारण स्थानिकांच्या संस्कृती, रितीरिवाजांवर होत असलेले आक्रमण हा आहे.

उत्तर भारतीयांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबईत जशी अस्वस्थता आली, तोच प्रकार आसाम व त्रिपुरामध्ये होत आहे. तेथील जनतेचा विश्वास संपादन करण्यात भाजपला यश आलेले नाही. संवाद साधण्यातील - विश्वास निर्माण करण्यातील कमतरता ही सध्याच्या केंद्र सरकारमधील गंभीर त्रुटी असून, त्याचे दुष्परिणाम राजकारण, समाजकारण याबरोबरच आर्थिक क्षेत्रातही दिसतात. ही त्रुटी सरकारने त्वरित भरून काढायला हवी. संवाद साधण्यातील कमतरता ही सध्याच्या केंद्र सरकारमधील गंभीर त्रुटी असून त्याचे दुष्परिणाम राजकारण, समाजकारण याबरोबर आर्थिक क्षेत्रातही दिसतात. ही त्रुटी सरकारने त्वरित भरून काढली पाहिजे.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपाAssamआसाम