शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

Citizenship Amendment Bill: ईशान्येतील विसंवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 04:11 IST

संसदेत जे जमले ते संसदेबाहेर जमलेले दिसत नाही.

भारतीय नागरिकत्व कायद्यातील सुधारणांवर बहुमताची मोहर उमटल्यानंतर देशातील वातावरण काहीसे दुभंगले आहे. संसदेत अन्य पक्षांची मदत भाजपला मिळाली. मात्र संसदेत जे जमले ते संसदेबाहेर जमलेले दिसत नाही. दिल्ली, राजस्थान, पंजाब येथील स्थलांतरितांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी अन्य ठिकाणी उत्साह नाही. ३७० कलम रद्द केल्यावर नागरिकांमध्ये जसे समाधानाचे वातावरण होते तसे या वेळी झालेले नाही. उलट विविध समाजघटकांमध्ये साशंकतेची भावना दाटली आहे.

भारताला हिंदूराष्ट्र करण्याच्या दिशेने हे पाऊल आहे यामुळे एकीकडे अस्वस्थता असताना या सुधारणेमुळे आपल्याच प्रदेशात आपण अल्पसंख्य होणार ही धास्ती ईशान्य भारतात वाढत आहे. तेथे भय स्थलांतरित हिंदूंबद्दल आहे. गृहमंत्री अमित शहा म्हणतात, की समाजामध्ये अशी धास्ती निर्माण करण्यात विरोधी पक्षांचे राजकीय हेतू आहेत. हे मान्य केले, तरी या लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यात सरकार कमी पडते आहे आणि संवादाचा अभाव किंवा एकतर्फी संवाद हे याचे मुख्य कारण आहे. विदेशात धार्मिक छळ सोसणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांना देशात स्थान देण्यास कोणाचा विरोध नाही.

भारत हाच त्यांना आधार वाटला पाहिजे अशीच सर्वांची भावना आहे. विरोध आहे तो केवळ धर्म हा निकष लावून प्रवेश देण्याला वा अटकाव करण्याला. यातून देशात दुभंगलेपणाची भावना वाढीस लागत आहे. देशाची एकात्मता राखण्यासाठी धाडसी निर्णय घ्यावे लागतात असे सरकारतर्फे सांगण्यात येते. परंतु, नागरिकत्वातील सुधारणांसारख्या मुद्द्यांवर समाजात ऐक्यापेक्षा दुभंग अधिक प्रगट होताना दिसतो. अशावेळी जनतेशी संवाद साधण्यात केंद्र सरकार कमी पडत आहे हे वारंवार लक्षात येते. काश्मीरमध्ये अद्याप विश्वासाचे वातावरण निर्माण झालेले नाही. नागरिकत्व कायद्यातील बदलांमुळे तेथे स्वस्थता येण्यास आणखी वेळ लागेल.

देशातील अल्पसंख्याकांनी सरकारवर विश्वास ठेवावा असे केंद्रीय गृहमंत्री राज्यसभेत दोन वेळा म्हणाले. पण अशा वक्तव्यांनी अल्पसंख्याकांचे समाधान होण्यासारखे नाही. सरकारची प्रतिमा आश्वासक वाटली पाहिजे. तशी ती देशातील अल्पसंख्याकांना वाटत नाही आणि आसाम, त्रिपुरातील बहुसंख्याकांनाही वाटत नाही. नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती करण्यापूर्वी ईशान्य भारतातील शंभराहून अधिक संघटनांशी अमित शहा यांनी चर्चा केली होती असे सांगतात. तरीही भाजपची सत्ता असलेल्या त्रिपुरा व आसाम येथे जनतेच्या रागाचा उद्रेक झाला, यावरून संवादाचा अभाव स्पष्ट व्हावा. ईशान्य भारतातील बहुतांश प्रदेश या नव्या कायद्याच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आला आहे. आसाम व त्रिपुरामधील काही भागांतही ही नवी सुधारणा लागू होणार नाही. तरीही तेथील नागरिकांचा प्रखर विरोध सुरू आहे. तो विरोध बांगलादेशातील बंगाली हिंदूंना ईशान्य भारतात मुक्तद्वार मिळेल म्हणून आहे.

एनआरसीला या भागात ९० लाख हिंदू स्थलांतरित आढळले. नव्या कायद्यामुळे या सर्वांना नागरिकत्व आणि मतदानाचा हक्क मिळेल. यामुळे तेथील समाजव्यवस्थेचे स्वरूप बदलून स्थानिक अल्पसंख्य होतील, स्थानिकांच्या संस्कृतीवर आक्रमण होईल ही धास्ती तेथील जनतेला वाटते. स्थलांतरितांना नागरिकत्व मिळण्याचा कालावधीही १२ वर्षांवरून पाच वर्षांवर आणण्यात आला आहे. म्हणजे ९० लाख स्थलांतरितांना नागरिकत्वाचा हक्क देऊन भाजप तेथे आपली व्होट बँक तयार करीत आहे. भाजपचा हा राजकीय डाव हे असंतोषाचे एक कारण असले तरी मुख्य कारण स्थानिकांच्या संस्कृती, रितीरिवाजांवर होत असलेले आक्रमण हा आहे.

उत्तर भारतीयांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबईत जशी अस्वस्थता आली, तोच प्रकार आसाम व त्रिपुरामध्ये होत आहे. तेथील जनतेचा विश्वास संपादन करण्यात भाजपला यश आलेले नाही. संवाद साधण्यातील - विश्वास निर्माण करण्यातील कमतरता ही सध्याच्या केंद्र सरकारमधील गंभीर त्रुटी असून, त्याचे दुष्परिणाम राजकारण, समाजकारण याबरोबरच आर्थिक क्षेत्रातही दिसतात. ही त्रुटी सरकारने त्वरित भरून काढायला हवी. संवाद साधण्यातील कमतरता ही सध्याच्या केंद्र सरकारमधील गंभीर त्रुटी असून त्याचे दुष्परिणाम राजकारण, समाजकारण याबरोबर आर्थिक क्षेत्रातही दिसतात. ही त्रुटी सरकारने त्वरित भरून काढली पाहिजे.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपाAssamआसाम