शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

चीनला घरचा अहेर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 12:40 AM

डोकलाम मुद्यावरून भारत व चीनदरम्यान सुरू असलेला वाद शमण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. भारताने डोकलाममधून सैन्य मागे घ्यावे, यासाठी गत दीड महिन्यापासून रोजच प्रसार माध्यमांच्या माध्यमातून भारताला धमकावत असलेल्या चीनने, बुधवारी पुन्हा एकदा धमकी दिली. भारताने सैन्य मागे न घेतल्यास, कठोर पावले उचलल्या जातील, असा इशारा चीनने दिला. डोकलाममधील विवाद ...

डोकलाम मुद्यावरून भारत व चीनदरम्यान सुरू असलेला वाद शमण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. भारताने डोकलाममधून सैन्य मागे घ्यावे, यासाठी गत दीड महिन्यापासून रोजच प्रसार माध्यमांच्या माध्यमातून भारताला धमकावत असलेल्या चीनने, बुधवारी पुन्हा एकदा धमकी दिली. भारताने सैन्य मागे न घेतल्यास, कठोर पावले उचलल्या जातील, असा इशारा चीनने दिला. डोकलाममधील विवाद हा चीन व भूतानदरम्यानचा विवाद असून, भारताचे त्या विवादाशी काहीही देणे-घेणे नाही, अशी भूमिका चीनने घेतली आहे. भारत आणि भूतानला मात्र ती भूमिका मान्य नाही. भारत आणि भूतानदरम्यानच्या करारानुसार भूतानचे बाह्य आक्रमणापासून संरक्षण करण्याची जबाबदारी भारताची आहे आणि त्या अनुषंगानेच भारतीय सैन्य भूतानच्या भूमीवर आहे, अशी भूमिका उभय देशांनी घेतली आहे. या विवादासंदर्भात भारताने अत्यंत संयंत भूमिका घेतली असताना, चीन मात्र दररोज आक्रस्ताळेपणा करीत आहे. स्वत:ला अमेरिकेच्या बरोबरीची महाशक्ती समजू लागलेल्या चीनसारख्या सामर्थ्यशाली राष्ट्रासाठी हे शोभादायक नाही, अशा वर्तणुकीमुळे आपण आपल्या देशाला उत्तर कोरियासारख्या बेजबाबदार देशाच्या पंगतीत नेऊन बसवित आहोत, याचेही भान चिनी प्रसार माध्यमांना राहिलेले दिसत नाही. या पार्श्वभूमीवर, बुधवारी चीनमधील एका तज्ज्ञाने चीनला घरचा अहेर दिला. विशेष म्हणजे एका चिनी प्रसार माध्यमामध्येच त्या संदर्भातील बातमी उमटली आहे. मकाऊस्थित लष्करी तज्ज्ञ अँटनी वाँग डाँग यांनी ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ या दैनिकाशी संवाद साधताना असे वक्तव्य केले, की जमिनीवरील लढाईत चीन भारताला मात देईलही; पण भारतीय नौदलाला हिंद महासागरात पराभूत करणे चिनी नौदलासाठी अशक्यप्राय आहे आणि त्या स्थितीत चीनचा इंधन पुरवठा बंद होऊ शकतो. चीनच्या सरकारी प्रसार माध्यमांमध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, चीनचा ८० टक्के इंधन पुरवठा हिंद महासागरातील जलमार्गाने होतो. त्याचे स्मरणही डाँग यांनी करवून दिले. मलाक्काच्या समुद्रधुनीतील ज्या चिंचोळ्या मार्गाने चीन खनिज तेलाची आयात करतो, तो मार्ग अंदमान-निकोबार द्वीपसमूहावरील भारतीय नौदलाच्या तळाच्या अगदी आवाक्यात आहे, हेच डाँग यांना सूचित करायचे होते. चिनी राज्यकर्त्यांनाही त्याची जाणीव आहे आणि बहुधा त्यामुळेच चीन रणमैदानात उतरण्याऐवजी मनोवैज्ञानिक युद्ध खेळू बघत आहे.