शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

कर्जमाफीच्या याद्या तयार करताना बँकांकडून झाल्या चुका, मुख्यमंत्र्यांची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:24 IST

कर्जमाफीच्या याद्या तयार करताना बँकांकडून झालेल्या चुकांची कबुली खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिल्याने बँकांच्या भोंगळ कारभारावर शिक्कामोर्तब झाले आहे.

कर्जमाफीच्या याद्या तयार करताना बँकांकडून झालेल्या चुकांची कबुली खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिल्याने बँकांच्या भोंगळ कारभारावर शिक्कामोर्तब झाले आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी ज्या शेतकºयांना प्रातिनिधक स्वरुपात कर्जमाफीचे जे प्रमाणपत्र देण्यात आले त्यांचाच सातबारा अद्याप कोरा झालेला नाही. त्यामुळे या योजनेतील गोंधळ आणखी वाढला आहे. परवा सहकार मंत्र्यांनी विदर्भात एका कार्यक्रमात केवळ दोन लाख शेतकºयांच्याच खात्यात रक्कम जमा होणार असल्याची घोषणा केल्याने ६ लाख ५० हजार अर्जदार शेतकºयांना धक्का बसला आहे. आता २५ नोव्हेंबरपर्यंत ७० टक्के कर्जमाफीची सरकारने केलेली घोषणा कितपत खरी ठरते, हा खरा प्रश्न आहे. कर्जमाफीचे प्रमाणपत्र वाटप करून ११ दिवसांचा कालावधी झाला असला तरी एकाही शेतकºयाच्या खात्यात एक छदामही जमा झालेला नाही. रक्कम जमा झाली नाही म्हणून बँकेने नाहरकत प्रमाण पत्र दिले नाही. ते मिळाले नाही म्हणून तलाठ्याने सातबारा कोरा केला नाही. याचा अर्थ मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आलेल्या प्रमाणपत्राला कवडीची किंमत नाही, असाच होतो. नोटाबंदी आणि जीसटीच्या बाबतीत सरकारने केलेल्या घिसाडघाईची पुनरावृत्ती कर्जमाफीची यादी जाहीर करतानाही झाली. परिणामी शेतकरी दररोज बँकांचे उंबरठे झिजवतो अन् नकारात्मक उत्तर ऐकून आल्यापावली परत जातो. आतातर ‘आपलं सरकार’ पोर्टलवर टाकण्यात आलेली यादीही काढून टाकण्यात आली आहे. आधी हिरवी, पिवळी आणि लाल, अशा तीन भागात यादी अपलोड करण्याची घोषणा शासनाने केली होती. परंतु सर्व याद्या दोषपूर्ण असल्याने पोर्टलवरून त्या काढून टाकण्याची नामुष्की सरकारवर ओढवली. याद्या अपलोड करताना बँकांनी ज्या चुका केल्या आहेत, त्या अधिकाºयांच्या गचाळ कारभाराचे प्रमाण देण्यासाठी पुरेशा आहेत. काहींचा आधार क्रमांक चुकीचा टाकण्यात आला तर काहींच्या १५ अंकी खाते क्रमांकात घोळ आहे. त्यामुळे कर्जमाफीचा हा गोंधळ २५ नोव्हेंबरपर्यंत तरी संपेल की नाही, याबाबत साशंकता वाटते. कर्जमाफीच्या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी निवडण्यात आलेला आॅनलाईनचा पर्याय आता शासनासाठीच डोकेदुखी ठरू पाहात आहे. याच गतीने याद्या तयार करण्याचे काम चालले तर पुढील हंगामापर्यंत तरी शेतकºयाचा सातबारा कोरा होणार नाही, बँका कर्ज देणार नाहीत आणि पुन्हा त्याला कर्जासाठी सावकाराच्या दारात उभे राहावे लागेल. आत्महत्येचे सत्र सुरू आहे, कदाचित तेही संपणार नाही.

टॅग्स :Farmerशेतकरी