शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

कर्जमाफीच्या याद्या तयार करताना बँकांकडून झाल्या चुका, मुख्यमंत्र्यांची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:24 IST

कर्जमाफीच्या याद्या तयार करताना बँकांकडून झालेल्या चुकांची कबुली खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिल्याने बँकांच्या भोंगळ कारभारावर शिक्कामोर्तब झाले आहे.

कर्जमाफीच्या याद्या तयार करताना बँकांकडून झालेल्या चुकांची कबुली खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिल्याने बँकांच्या भोंगळ कारभारावर शिक्कामोर्तब झाले आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी ज्या शेतकºयांना प्रातिनिधक स्वरुपात कर्जमाफीचे जे प्रमाणपत्र देण्यात आले त्यांचाच सातबारा अद्याप कोरा झालेला नाही. त्यामुळे या योजनेतील गोंधळ आणखी वाढला आहे. परवा सहकार मंत्र्यांनी विदर्भात एका कार्यक्रमात केवळ दोन लाख शेतकºयांच्याच खात्यात रक्कम जमा होणार असल्याची घोषणा केल्याने ६ लाख ५० हजार अर्जदार शेतकºयांना धक्का बसला आहे. आता २५ नोव्हेंबरपर्यंत ७० टक्के कर्जमाफीची सरकारने केलेली घोषणा कितपत खरी ठरते, हा खरा प्रश्न आहे. कर्जमाफीचे प्रमाणपत्र वाटप करून ११ दिवसांचा कालावधी झाला असला तरी एकाही शेतकºयाच्या खात्यात एक छदामही जमा झालेला नाही. रक्कम जमा झाली नाही म्हणून बँकेने नाहरकत प्रमाण पत्र दिले नाही. ते मिळाले नाही म्हणून तलाठ्याने सातबारा कोरा केला नाही. याचा अर्थ मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आलेल्या प्रमाणपत्राला कवडीची किंमत नाही, असाच होतो. नोटाबंदी आणि जीसटीच्या बाबतीत सरकारने केलेल्या घिसाडघाईची पुनरावृत्ती कर्जमाफीची यादी जाहीर करतानाही झाली. परिणामी शेतकरी दररोज बँकांचे उंबरठे झिजवतो अन् नकारात्मक उत्तर ऐकून आल्यापावली परत जातो. आतातर ‘आपलं सरकार’ पोर्टलवर टाकण्यात आलेली यादीही काढून टाकण्यात आली आहे. आधी हिरवी, पिवळी आणि लाल, अशा तीन भागात यादी अपलोड करण्याची घोषणा शासनाने केली होती. परंतु सर्व याद्या दोषपूर्ण असल्याने पोर्टलवरून त्या काढून टाकण्याची नामुष्की सरकारवर ओढवली. याद्या अपलोड करताना बँकांनी ज्या चुका केल्या आहेत, त्या अधिकाºयांच्या गचाळ कारभाराचे प्रमाण देण्यासाठी पुरेशा आहेत. काहींचा आधार क्रमांक चुकीचा टाकण्यात आला तर काहींच्या १५ अंकी खाते क्रमांकात घोळ आहे. त्यामुळे कर्जमाफीचा हा गोंधळ २५ नोव्हेंबरपर्यंत तरी संपेल की नाही, याबाबत साशंकता वाटते. कर्जमाफीच्या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी निवडण्यात आलेला आॅनलाईनचा पर्याय आता शासनासाठीच डोकेदुखी ठरू पाहात आहे. याच गतीने याद्या तयार करण्याचे काम चालले तर पुढील हंगामापर्यंत तरी शेतकºयाचा सातबारा कोरा होणार नाही, बँका कर्ज देणार नाहीत आणि पुन्हा त्याला कर्जासाठी सावकाराच्या दारात उभे राहावे लागेल. आत्महत्येचे सत्र सुरू आहे, कदाचित तेही संपणार नाही.

टॅग्स :Farmerशेतकरी