शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

कर्जमाफीच्या याद्या तयार करताना बँकांकडून झाल्या चुका, मुख्यमंत्र्यांची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:24 IST

कर्जमाफीच्या याद्या तयार करताना बँकांकडून झालेल्या चुकांची कबुली खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिल्याने बँकांच्या भोंगळ कारभारावर शिक्कामोर्तब झाले आहे.

कर्जमाफीच्या याद्या तयार करताना बँकांकडून झालेल्या चुकांची कबुली खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिल्याने बँकांच्या भोंगळ कारभारावर शिक्कामोर्तब झाले आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी ज्या शेतकºयांना प्रातिनिधक स्वरुपात कर्जमाफीचे जे प्रमाणपत्र देण्यात आले त्यांचाच सातबारा अद्याप कोरा झालेला नाही. त्यामुळे या योजनेतील गोंधळ आणखी वाढला आहे. परवा सहकार मंत्र्यांनी विदर्भात एका कार्यक्रमात केवळ दोन लाख शेतकºयांच्याच खात्यात रक्कम जमा होणार असल्याची घोषणा केल्याने ६ लाख ५० हजार अर्जदार शेतकºयांना धक्का बसला आहे. आता २५ नोव्हेंबरपर्यंत ७० टक्के कर्जमाफीची सरकारने केलेली घोषणा कितपत खरी ठरते, हा खरा प्रश्न आहे. कर्जमाफीचे प्रमाणपत्र वाटप करून ११ दिवसांचा कालावधी झाला असला तरी एकाही शेतकºयाच्या खात्यात एक छदामही जमा झालेला नाही. रक्कम जमा झाली नाही म्हणून बँकेने नाहरकत प्रमाण पत्र दिले नाही. ते मिळाले नाही म्हणून तलाठ्याने सातबारा कोरा केला नाही. याचा अर्थ मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आलेल्या प्रमाणपत्राला कवडीची किंमत नाही, असाच होतो. नोटाबंदी आणि जीसटीच्या बाबतीत सरकारने केलेल्या घिसाडघाईची पुनरावृत्ती कर्जमाफीची यादी जाहीर करतानाही झाली. परिणामी शेतकरी दररोज बँकांचे उंबरठे झिजवतो अन् नकारात्मक उत्तर ऐकून आल्यापावली परत जातो. आतातर ‘आपलं सरकार’ पोर्टलवर टाकण्यात आलेली यादीही काढून टाकण्यात आली आहे. आधी हिरवी, पिवळी आणि लाल, अशा तीन भागात यादी अपलोड करण्याची घोषणा शासनाने केली होती. परंतु सर्व याद्या दोषपूर्ण असल्याने पोर्टलवरून त्या काढून टाकण्याची नामुष्की सरकारवर ओढवली. याद्या अपलोड करताना बँकांनी ज्या चुका केल्या आहेत, त्या अधिकाºयांच्या गचाळ कारभाराचे प्रमाण देण्यासाठी पुरेशा आहेत. काहींचा आधार क्रमांक चुकीचा टाकण्यात आला तर काहींच्या १५ अंकी खाते क्रमांकात घोळ आहे. त्यामुळे कर्जमाफीचा हा गोंधळ २५ नोव्हेंबरपर्यंत तरी संपेल की नाही, याबाबत साशंकता वाटते. कर्जमाफीच्या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी निवडण्यात आलेला आॅनलाईनचा पर्याय आता शासनासाठीच डोकेदुखी ठरू पाहात आहे. याच गतीने याद्या तयार करण्याचे काम चालले तर पुढील हंगामापर्यंत तरी शेतकºयाचा सातबारा कोरा होणार नाही, बँका कर्ज देणार नाहीत आणि पुन्हा त्याला कर्जासाठी सावकाराच्या दारात उभे राहावे लागेल. आत्महत्येचे सत्र सुरू आहे, कदाचित तेही संपणार नाही.

टॅग्स :Farmerशेतकरी