शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

धर्मादाय संस्थांचा शेतकऱ्यांसाठी पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:26 IST

धर्मादाय संस्थांच्या पुढाकारातून राज्यात ३००० जोडप्यांचे विवाह, सामूहिक विवाह सोहळ्यातून होतील़ प्रामुख्याने अल्पभूधारक शेतक-यांच्या पाल्यांसाठी़

- धर्मराज हल्लाळेराज्यातील धर्मादाय संस्था, विशेषत: नानाविध धार्मिक स्थळे यांच्या बँक खात्यांवर मोठ्या रकमा वर्षानुवर्षे पडून आहेत़ हा पैसा भाविक भक्तांकडून आलेला सार्वजनिक निधी आहे़ बहुतांश ठिकाणी त्याचा वापर होत नाही़ अपवाद काही संस्था व देवस्थाने नियमितपणे सामाजिक उपक्रमांना मदत करतात़ एकीकडे ही परिस्थिती, तर दुसरीकडे मराठवाड्यात अनेक शेतकºयांनी आपल्या मुलीच्या विवाहासाठी पुरेसे पैसे नाहीत म्हणून जीवनयात्रा संपविली़ शेतमालाचे उत्पादन, त्यावर होणारा खर्च आणि मिळणारा भाव हे सूत्रच बिघडलेले आहे़ शेती व्यवस्था कोलमडल्याने शेतकरी सातत्याने अडचणीत आहे़ त्याची चर्चा विविध अंगाने होत राहते़ मात्र प्रश्न कायम आहेत़ त्याचवेळी शेतकरी आत्महत्यांची कारणमीमांसा करीत असताना मुलीच्या विवाहाचा होणारा खर्च हा त्या शेतकरी पित्यासमोरील चिंतेचा विषय असतो़या गंभीर विषयाची जाणीव असलेल्या राज्य धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी राज्यातील धर्मादाय संस्थांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते़ त्याला प्रतिसाद देत मराठवाड्यासह सबंध राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी धर्मादाय संस्थांच्या विश्वस्तांनी समित्या गठित केल्या आहेत़ कलम ४१ (क) नुसार समित्यांनी नोंदणी करून त्या-त्या गावातील धर्मादाय शिक्षण संस्था, देवस्थाने तसेच सर्वधर्मीय स्थळांच्या विश्वस्तांनी आपल्या संस्थांकडून आर्थिक योगदान देणे सुरू केले आहे़ साधारणत: प्रत्येक जिल्ह्यामध्ये १०० जोडप्यांचे सामूहिक विवाह सोहळ्यात विवाह लावले जातील़ प्रामुख्याने अल्पभूधारक शेतकºयांच्या मुलीच्या लग्नाचा खर्च उचलण्याची जबाबदारी या संस्थांनी घेतली आहे़राज्यामध्ये वर्षाला सुमारे तीन लाख विवाह होतात़ परंपरेनुसार बहुतांश विवाह सोहळ्यांमध्ये अक्षता म्हणून लाखो टन धान्य वापरले जाते़ दरम्यान, या सर्व सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये परंपरा व भावना जपण्यासाठी विवाह सोहळ्याच्या केवळ मंचावरच धान्याची अक्षता असेल अन् सभा मंडपात फुले दिली जातील, असे नियोजन या संस्थांनी केले आहे़ ज्यामुळे लाखो टन धान्य मातीमोल होणार नाही़ हा अतिशय साधा व सोपा उपचार वाटत असला तरी एक मूलभूत संदेश देण्याचा धर्मादाय संस्थांचा प्रयत्न असणार आहे़ या सामूहिक सोहळ्यात स्त्री जन्माचे स्वागत करण्याची शपथही दिली जाईल़मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या या प्रामुख्याने दुष्काळी परिस्थितीमुळे झाल्या़ डोक्यावर कर्जाचा डोंगर, मुलीच्या विवाहाची चिंता हे विषय शेतकरी कुटुंबात गंभीर बनतात़ अशावेळी धर्मादाय आयुक्त डिगे यांनी केलेले आवाहन आणि राज्यातील धर्मादाय संस्थांनी घेतलेला पुढाकार सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे़ विवाहाच्या खर्चाबरोबरच हुंड्यासारखी कुप्रथा हद्दपार करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे़ कितीही प्रबोधन झाले असले वा कायद्याचा बडगा असला तरी ग्रामीण भागात अजूनही हुंडा देणे-घेणे सुरू असते हे उघड सत्य आहे़ तरीही लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी गौरसारखे एखादे अख्खे गाव हुंडा देणार नाही, घेणार नाही, असा ठराव घेते, हेही चित्र आहे़ त्याचा प्रचार, प्रसार झाला पाहिजे़ हुंडा न घेणाºया कुटुंबाचे जाहीरपणे कौतुक केले पाहिजे़ मात्र आजही काही भागात हुंडा हा प्रतिष्ठेचे प्रतीक मानला जातो़ या कुप्रथेचाही मोठेपणा मिरविला जातो़ खरे तर म्हटले पाहिजे, चला हुंड्याला बदनाम करू या!

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीMaharashtraमहाराष्ट्र