शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टी किंवा अनावृष्टी यांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 05:06 IST

सतत कोसळणारा पाऊस, त्सुनामी, डोंगरांचे उतार आणि उथळ नदीपात्रे ही पुराचे संकट ओढवणारी काही कारणे सांगता येतील.

- डॉ. एस.एस. मंठाआपल्या देशात जून ते सप्टेंबर हे महिने अतिवृष्टी किंवा अनावृष्टी किंवा वादळवारे घेऊन येत असतात. त्यामुळे कधी पाणी पुलाखालून तर कधी पुलावरून वाहू लागते. अतिवृष्टी किंवा अनावृष्टी या दोन्ही गोष्टी चिंता उत्पन्न करीत असतात. यंदा नासाकडून जो पावसाचा अंदाज मिळाला तो उत्तरेकडचा आणि दक्षिणेकडचा असा दोन्ही ठिकाणचा होता. उत्तरेकडील अतिवृष्टी बंगालच्या उपसागरापर्यंत होती तर दक्षिणेकडील अतिवृष्टीने कर्नाटक आणि केरळला तडाखा दिला. त्यापैकी केरळमधील अतिवृष्टीने आठ लाख लोकांना बेघर केले तसेच ३५० लोकांचे प्राण घेतले. ‘होणारे ते घडत असे’ या भारतीय प्रवृत्तीने आपण अशा घटनांकडे दुर्लक्ष न करता वास्तविक त्या दुर्घटनांमध्येच त्याच्या सुटकेचे मार्ग दडलेले असतात. ते शोधण्याचे प्रयत्न मात्र करावे लागतात.सतत कोसळणारा पाऊस, त्सुनामी, डोंगरांचे उतार आणि उथळ नदीपात्रे ही पुराचे संकट ओढवणारी काही कारणे सांगता येतील. पुरामुळे लोकांचा त्रास वाढतो हे तर खरेच आहे. पण कधी कधी पुरामुळे शेतजमिनीला आवश्यक असलेली पोषक द्रव्येही मिळतात, जी शेतीसाठी किफायतशीर ठरतात. पुरामुळे जो गाळ वाहून आणला जातो त्यामुळे शेतजमीन सुपीक होऊन कृषी उत्पादनात वाढदेखील होऊ शकते.अनेक भागातील नद्यांना नियमित पूर येतो. जसे ब्रह्मपुत्रा, गंगा, मध्य भारतातील नद्या आणि दख्खनच्या पठारातील नद्या. या पुरांना तोंड देण्याची पद्धत स्थानपरत्वे भिन्न भिन्न असते. केंद्रीय जल आयोगाने दिलेल्या माहितीप्रमाणे दरवर्षी पुरामुळे बाधित होणाऱ्या जमिनीचे प्रमाण हे ८००० दशलक्ष हेक्टर इतके असते. तर राष्ट्रीय पूर आयोगाच्या अहवालाप्रमाणे भारतातील पूरप्रवण क्षेत्र हे ४ कोटी हेक्टर्स इतके आहे.पुरामुळे बाधित होणारी राज्ये पंजाब, प. बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, केरळ, आसाम, गुजरात आणि ओरिसा ही आहेत. गतवर्षी बिहारमध्ये पुरामुळे ५०० लोकांना प्राण गमवावे लागले. नदीतील पुराचे पाणी धोक्याची पातळी ओलांडत असतानाही पूरप्रवण भागातील लोक ती जागा सोडत नाहीत असे दिसून आले आहे.२०१५ साली झालेल्या मुसळधार पावसामुळे दक्षिणेकडील राज्यांना रु.२०,००० कोटी इतके नुकसान सोसावे लागले होते. तर २०१६ च्या पुरामुळे आसामातील २९ खेडी प्रभावित झाली होती व ९००० लोकांना विस्थापित व्हावे लागले होते. चेन्नईत झालेल्या मुसळधार पावसाने सर्वांनाच आत्मचिंतन करायला लावले होते. तसेच पुराला तोंड देण्याच्या पद्धतीत बदल करण्याची गरज दाखवून दिली होती.वृत्तपत्रीय माहितीनुसार दरवर्षी पुरामुळे तीन कोटी लोक प्रभावित होत असतात. २०१६ च्या दराच्या आधारे पुरामुळे होणारे नुकसान हे दरवर्षी ११००० कोटी इतके असते. तसे दरवर्षी किमान एक हजार लोकांना पुरामुळे प्राण गमवावे लागतात. तेलंगणाचे नवे राजधानीचे शहर अमरावती हे कृष्णा नदीच्या काठावर वसले जात आहे. या नदीला दरवर्षी किमान तीनदा पूर येतो. त्यामुळे नदीच्या काठावरील निवासस्थाने हा काळजीचा विषय ठरणार आहे. भावी पिढ्यांना पुरामुळे किती किंमत चुकती करावी लागणार आहे?पुराला तोंड देण्यासाठी व्यवस्थापन आणि पूर नियंत्रण या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पुराचे पाणी नियंत्रित करण्यासाठी भिंती उभारणे आणि फ्लडगेटस् निर्माण करणे गरजेचे ठरेल. पूरप्रवण भागातील घरांचे वॉटरप्रूफिंग आवश्यक करावे लागेल. तसेच पुराच्या काळात लोकांना अन्यत्र हलवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्यक्रमही निश्चित करावे लागतींल. पुराची कल्पना देण्यासाठी फ्लड वॉर्निंग सिस्टीमही मजबूत करावी लागेल.घरांची बांधकामे करताना पूर पातळीपेक्षा उंच जागी घर बांधण्याची परवानगी द्यावी लागेल. तसेच नदीतील गाळ काढून नदीतून पाणी झपाट्याने वाहून जाईल अशी व्यवस्था करावी लागेल. पूर पसरू नये यासाठी जागोजागी भिंती बांधून अडथळे निर्माण करावे लागतील. पुराचे पाणी साठवून ठेवण्यासाठी कृत्रिम तलाव निर्माण करणे, वनीकरण करणे इ. उपायही अमलात आणावे लागतील.धरणांचे दरवाजे केव्हा उघडायचे याची पद्धतही विकसित करावी लागेल. नदीतील पाण्याचा प्रवाह अव्याहतपणे खळाळता राहील अशी व्यवस्था करणेही गरजेचे ठरेल. सध्या स्मार्ट शहरे निर्माण केली जात आहेत. तेथे पाण्याचा योग्य पुरवठा होणे आणि नियंत्रित मलनि:सारण व्यवस्था निर्माण करणे गरजेचे राहील. दरवर्षी पुरामुळे होणारे नुकसान टाळायलाच हवे!(लेखक एआयसीटीईचे माजी चेअरमन आणि एनआयएएस बंगळुरूचे एडीजे. प्रोफेसर आहेत)

टॅग्स :floodपूरNatural Calamityनैसर्गिक आपत्तीKerala Floodsकेरळ पूरRainपाऊसlandslidesभूस्खलन