शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

मुंबई विद्यापीठाला गतवैभव मिळवून देण्याचे आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:00 IST

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी रुईया महाविद्यालयाचे प्राचार्य 

योगेश बिडवई

यू कॅन विन; कार्यक्षम कारभाराची कुलगुरू सुहास पेडणेकरांकडून अपेक्षाडॉ. सुहास पेडणेकर यांच्या नियुक्तीचे शैक्षणिक क्षेत्रातून स्वागत होत आहे. संशोधक व उत्तम प्रशासक असलेल्या डॉ. पेडणेकर यांच्याकडून सर्वांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. विद्यापीठाला गतवैभव मिळवून देण्याचे त्यांच्यापुढे आव्हान आहे. परीक्षा विभाग टिकेचे लक्ष्य ठरला आहे. निकाल वेळेवर लागण्यासाठी त्यांना कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यासाठी चुकीच्या नियुक्त्या त्यांना रद्द कराव्या लागणार आहेत.डॉ. पेडणेकर आणि रुईया महाविद्यालय हे अनेक वर्षांचे समीकरण होते. प्राचार्यपदाच्या कारकीर्दीत त्यांनी महाविद्यालयाच्या लौकिकात भर घातली. ‘बेस्ट कॉलेज’ पुरस्कार, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात विद्यार्थ्यांचे यश, १३ नवे अभ्यासक्रम सुरू करणे आदींतून त्यांच्या उत्तम प्रशासनाची झलक दाखविली. १६१ वर्षांची ज्ञानदानाची परंपरा असलेल्या मुंबई विद्यापीठाचा पसारा मोठा आहे. मुंबई व कोकणातील ७४९ महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्न आहेत. त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.

डॉ. पेडणेकर यांनी विद्यापीठाचा कारभार सुधारण्यासाठी पहिल्याच आठवड्यात सर्वांकडून सूचना मागविण्यास सुरुवात करून त्यांच्या कामाची दिशा स्पष्ट केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. नव्या कुलगुरू परीक्षा विभागाचा कारभार सुरळीत करण्यासाठी सर्वाधिक प्राधान्य द्यावे लागणार आहे. निकालाचा अभूतपूर्व गोंधळ झाल्याने डॉ. संजय देशमुख यांची राज्यपालांनी गच्छंती केली. अनेक महाविद्यालये परीक्षा विभागाला सहकार्य करत नाहीत. प्राध्यापक पेपर तपासत नाहीत. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणे हाच उपाय आहे, अन्यथा निकाल वेळेवर लावणे पुन्हा अशक्य होईल. विधी विभागातील पदव्युत्तर पदवीच्या प्रवेश परीक्षेत प्रश्नपत्रिका सदोष होती. पेपर सेटर डॉ. स्वाती रौतेला यांनी चुकांची कबुली दिली.

त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने त्यांना शिक्षेऐवजी अभ्यास मंडळावर अंतरिम नियुक्ती केली. निकाल गोंधळामुळे विद्यापीठाची डागाळलेली प्रतिमा उजळण्यासाठी डॉ. पेडणेकरांना दोषी लोकांवर आधी कारवाई करावी लागणार आहे. जबाबदारीच्या पदावर कार्यक्षम व अनुभवी प्राध्यापकांची नियुक्ती करावी लागणार आहे. अन्यथा डॉ. पेडणेकर यांची कारभार सुधारण्याची भाषा ‘केवळ तोल मोल के बोल’ ठरेल.परीक्षा विभागात नियंत्रकांची पूर्ण वेळ पदे रिक्त आहेत. केवळ त्याची तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे कार्यक्षमतेने काम होत नाही. प्रवेश प्रक्रियासुद्धा आॅनलाईन होण्याची गरज आहे. त्यामुळे कोटा व्यवस्थित भरला जाईल. अर्थशास्त्र विभागात वाङमय चौर्याचे प्रकरण गाजले. राज्यपालांच्या निर्देशानुसार समिती नेमण्यात आली. समितीने अहवाल दिला. मात्र विद्यापीठाने हा अहवाल दडपल्याची स्थिती आहे. हा अहवाल सर्वांसमोर ठेवण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याचे धाडस कुलगुरूंना दाखवावे लागणार आहे. कुलगुरू पहिल्या महिन्यात कोणते निर्णय घेतात, त्यावरच त्यांची वाटचाल स्पष्ट होईल.

विद्यापीठाचे नॅक मूल्यांकन हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे मुंबईची प्रतिष्ठा कायम राहणार आहे. विद्यापीठात संशोधनाचे काम जवळपास ठप्प झाले आहेत. डॉ. पेडणेकर हे स्वत: रसायनशास्त्र आहेत. ते संशोधनाला चालना देतील, अशी अपेक्षा आहे.विद्यापीठात अनेक प्राध्यापक निवृत्तीनंतरही पदाला चिकटून आहेत. त्यांच्याऐवजी नव्या दमाच्या प्राध्यापकांची नियुक्ती करावी लागणार आहे. तसेच विद्यापीठाअंतर्गत अनेक स्वायत्त संस्थांवर अनुभव नसलेल्या व्यक्तींची वर्णी लागली आहे, त्याचा कुलगुरूंना विचार करावा लागेल.

विद्यार्थ्यांप्रमाणेच प्राध्यापकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यासाठी उमासा व मुक्ता संघटना काम करत आहेत. मूलभूत सेवाहक्क, वेळेवर बढती, सेवार्थ प्रणालीची अंमलबजावणी हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. कुलगुरूंनी त्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. संजय देशमुख यांनी दोन अधिकाऱ्यांवर विश्वास ठेऊन त्यांच्यावर बरेचसे निर्णय सोपविले होते. त्याचात्यांना फटका बसला. नव्या कुलगुरूंना ‘अशा’ अधिकाºयांपासून दूर राहण्याची कसरत करावी लागणार आहे. कुलगुरूंनी राजकीय नियुक्त्या टाळून कारभार केल्यास विद्यापीठाला ते नक्कीच नावलौकिक मिळवून देतील.

टॅग्स :Mumbai Universityमुंबई विद्यापीठ