शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
4
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
5
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
6
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
7
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
8
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
9
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
10
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
11
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
12
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
13
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
14
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
15
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
16
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
17
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
18
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
19
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
20
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'

मधुमेहाचे आव्हान

By admin | Updated: March 31, 2016 03:34 IST

मधुमेह रोखण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करा; अन्यथा २०३० पर्यंत हा मोठी मनुष्यहानी घडवून आणणारा सातवा आजार ठरू शकेल, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने भारताला

मधुमेह रोखण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करा; अन्यथा २०३० पर्यंत हा मोठी मनुष्यहानी घडवून आणणारा सातवा आजार ठरू शकेल, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने भारताला दिला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात ज्या गतीने मधुमेहींच्या संख्येत वाढ होत आहे, ती बघू जाता हा इशारा गांभीर्याने घेण्याची गरज आहे. वरकरणी अत्यंत साधा वाटणारा हा आजार अनेक प्रकारची गुंतागुंत निर्माण करू शकतो आणि त्यामुळे जीवघेणाही ठरू शकतो. दुर्दैवाने आजच्या घडीला तरी मधुमेहाचे निर्दालन करणारे औषध उपलब्ध नाही. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू न देता, सामान्य पातळीच्या शक्य तेवढे जवळ राखण्याचे आणि त्याच वेळी ते सामान्य पातळीच्या खाली न जाऊ देण्याचे व्यवस्थापन करणे, एवढेच डॉक्टर आणि रुग्णाच्या हातात असते. सकस आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रणात राखणे आणि सोबतीला आवश्यक ती औषधे नियमितपणे घेणे, एवढे केले तरी मधुमेही अनेक वर्षे आरोग्यदायी जीवन जगू शकतो. वर्षानुवर्षे असे जीवन जगण्यासाठी शिस्त, नियमितपणा आणि सातत्य या गुणांची अत्यंत आवश्यकता असते. दुर्दैवाने भारतीयांमध्ये हे गुण अभावानेच आढळतात. शिवाय देशात अजूनही अगदी उच्च शिक्षित वर्गातही आरोग्यविषयक जागृतीचा अभाव दिसून येतो. याला जोड लाभली आहे, ती झपाट्याने बदलत असलेल्या जीवनशैलीची! बदलत चाललेली खाद्य संस्कृती, भोजनात निकस, पोटभरू पदार्थांचा समावेश, मद्यपान, रात्रीची जागरणे, वाढत्या स्पर्धेमुळे व ढासळत्या कुटुंब व्यवस्थेमुळे निर्माण होणारे ताणतणाव, या सगळ्या कारणांचा परिपाक म्हणून मधुमेह भारतात झपाट्याने हातपाय पसरत आहे. २०१५ मध्ये एकूण प्रौढ नागरिकांपैकी (वय २० ते ७९) ८.७ टक्के नागरिक मधुमेहग्रस्त होते. हेच प्रमाण २०१० मध्ये ७.२ टक्के एवढे होते. मधुमेहाची झपाट्याने होणारी वाढ यातून लक्षात येते. हा आजार प्रामुख्याने विकसित देशांमधला मानला जात असला तरी भारताने याबाबत ब्रिटनसारख्या विकसित देशाला कधीच मागे टाकले असून, येत्या काही वर्षात अमेरिकेलाही मागे टाकेल, असे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर मधुमेहाने महामारीचे स्वरुप घेण्यापूर्वीच, भारत सरकार आणि नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.