शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
2
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
3
भाजपाचं 'ऑपरेशन लोटस'! काँग्रेस अन् शिंदेसेनेला मातब्बर फोडणार; गोल्डन वुमननं हाती घेतलं कमळ
4
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
5
IND vs SA: विराट कोहली पुन्हा कसोटी क्रिकेट खेळणार? रांची एकदिवसीय सामन्यानंतर केलं मोठं विधान!
6
Post Office च्या या स्कीममध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
7
जया बच्चन यांनी लग्नाला म्हटलं 'जुनी परंपरा', नात नव्याच्या बाबतीत व्यक्त केली ही इच्छा
8
लग्नानंतर देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, सुदैवाने नवरा नवरी वाचले
9
Local Body ELections: उमेदवारीसाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून भाजपचे दोन गट भिडले
10
अंबरनाथची संपूर्ण, तर बदलापूरमध्ये ६ प्रभागांची निवडणूक पुढे ढकलली
11
आजपासून संसदेचे अधिवेशन! पान मसाला, सिगारेट, तंबाखु महागणार; सरकार विधेयक सादर करणार
12
Nepal Earthquake: भारताच्या शेजारी देशात ४.४ तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट!
13
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
14
Bigg Boss Marathi: रितेश देशमुखच असणार 'बिग बॉस मराठी'चा होस्ट, सलमान खान म्हणाला- "भाऊ तुम्ही..."
15
आजचे राशीभविष्य, १ डिसेंबर २०२५: भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास आजचा दिवस अनुकूल
16
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
17
अग्रलेख : शेवटी मरण कार्यकर्त्यांचेच! अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार?
18
फोनमध्ये सिम नसल्यास ॲप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सॲप्स वेब थेट लॉगआउट होणार!
19
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
20
Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
Daily Top 2Weekly Top 5

मधुमेहाचे आव्हान

By admin | Updated: March 31, 2016 03:34 IST

मधुमेह रोखण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करा; अन्यथा २०३० पर्यंत हा मोठी मनुष्यहानी घडवून आणणारा सातवा आजार ठरू शकेल, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने भारताला

मधुमेह रोखण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करा; अन्यथा २०३० पर्यंत हा मोठी मनुष्यहानी घडवून आणणारा सातवा आजार ठरू शकेल, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने भारताला दिला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात ज्या गतीने मधुमेहींच्या संख्येत वाढ होत आहे, ती बघू जाता हा इशारा गांभीर्याने घेण्याची गरज आहे. वरकरणी अत्यंत साधा वाटणारा हा आजार अनेक प्रकारची गुंतागुंत निर्माण करू शकतो आणि त्यामुळे जीवघेणाही ठरू शकतो. दुर्दैवाने आजच्या घडीला तरी मधुमेहाचे निर्दालन करणारे औषध उपलब्ध नाही. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू न देता, सामान्य पातळीच्या शक्य तेवढे जवळ राखण्याचे आणि त्याच वेळी ते सामान्य पातळीच्या खाली न जाऊ देण्याचे व्यवस्थापन करणे, एवढेच डॉक्टर आणि रुग्णाच्या हातात असते. सकस आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रणात राखणे आणि सोबतीला आवश्यक ती औषधे नियमितपणे घेणे, एवढे केले तरी मधुमेही अनेक वर्षे आरोग्यदायी जीवन जगू शकतो. वर्षानुवर्षे असे जीवन जगण्यासाठी शिस्त, नियमितपणा आणि सातत्य या गुणांची अत्यंत आवश्यकता असते. दुर्दैवाने भारतीयांमध्ये हे गुण अभावानेच आढळतात. शिवाय देशात अजूनही अगदी उच्च शिक्षित वर्गातही आरोग्यविषयक जागृतीचा अभाव दिसून येतो. याला जोड लाभली आहे, ती झपाट्याने बदलत असलेल्या जीवनशैलीची! बदलत चाललेली खाद्य संस्कृती, भोजनात निकस, पोटभरू पदार्थांचा समावेश, मद्यपान, रात्रीची जागरणे, वाढत्या स्पर्धेमुळे व ढासळत्या कुटुंब व्यवस्थेमुळे निर्माण होणारे ताणतणाव, या सगळ्या कारणांचा परिपाक म्हणून मधुमेह भारतात झपाट्याने हातपाय पसरत आहे. २०१५ मध्ये एकूण प्रौढ नागरिकांपैकी (वय २० ते ७९) ८.७ टक्के नागरिक मधुमेहग्रस्त होते. हेच प्रमाण २०१० मध्ये ७.२ टक्के एवढे होते. मधुमेहाची झपाट्याने होणारी वाढ यातून लक्षात येते. हा आजार प्रामुख्याने विकसित देशांमधला मानला जात असला तरी भारताने याबाबत ब्रिटनसारख्या विकसित देशाला कधीच मागे टाकले असून, येत्या काही वर्षात अमेरिकेलाही मागे टाकेल, असे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर मधुमेहाने महामारीचे स्वरुप घेण्यापूर्वीच, भारत सरकार आणि नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.