शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

मधुमेहाचे आव्हान

By admin | Updated: March 31, 2016 03:34 IST

मधुमेह रोखण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करा; अन्यथा २०३० पर्यंत हा मोठी मनुष्यहानी घडवून आणणारा सातवा आजार ठरू शकेल, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने भारताला

मधुमेह रोखण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करा; अन्यथा २०३० पर्यंत हा मोठी मनुष्यहानी घडवून आणणारा सातवा आजार ठरू शकेल, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने भारताला दिला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात ज्या गतीने मधुमेहींच्या संख्येत वाढ होत आहे, ती बघू जाता हा इशारा गांभीर्याने घेण्याची गरज आहे. वरकरणी अत्यंत साधा वाटणारा हा आजार अनेक प्रकारची गुंतागुंत निर्माण करू शकतो आणि त्यामुळे जीवघेणाही ठरू शकतो. दुर्दैवाने आजच्या घडीला तरी मधुमेहाचे निर्दालन करणारे औषध उपलब्ध नाही. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू न देता, सामान्य पातळीच्या शक्य तेवढे जवळ राखण्याचे आणि त्याच वेळी ते सामान्य पातळीच्या खाली न जाऊ देण्याचे व्यवस्थापन करणे, एवढेच डॉक्टर आणि रुग्णाच्या हातात असते. सकस आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रणात राखणे आणि सोबतीला आवश्यक ती औषधे नियमितपणे घेणे, एवढे केले तरी मधुमेही अनेक वर्षे आरोग्यदायी जीवन जगू शकतो. वर्षानुवर्षे असे जीवन जगण्यासाठी शिस्त, नियमितपणा आणि सातत्य या गुणांची अत्यंत आवश्यकता असते. दुर्दैवाने भारतीयांमध्ये हे गुण अभावानेच आढळतात. शिवाय देशात अजूनही अगदी उच्च शिक्षित वर्गातही आरोग्यविषयक जागृतीचा अभाव दिसून येतो. याला जोड लाभली आहे, ती झपाट्याने बदलत असलेल्या जीवनशैलीची! बदलत चाललेली खाद्य संस्कृती, भोजनात निकस, पोटभरू पदार्थांचा समावेश, मद्यपान, रात्रीची जागरणे, वाढत्या स्पर्धेमुळे व ढासळत्या कुटुंब व्यवस्थेमुळे निर्माण होणारे ताणतणाव, या सगळ्या कारणांचा परिपाक म्हणून मधुमेह भारतात झपाट्याने हातपाय पसरत आहे. २०१५ मध्ये एकूण प्रौढ नागरिकांपैकी (वय २० ते ७९) ८.७ टक्के नागरिक मधुमेहग्रस्त होते. हेच प्रमाण २०१० मध्ये ७.२ टक्के एवढे होते. मधुमेहाची झपाट्याने होणारी वाढ यातून लक्षात येते. हा आजार प्रामुख्याने विकसित देशांमधला मानला जात असला तरी भारताने याबाबत ब्रिटनसारख्या विकसित देशाला कधीच मागे टाकले असून, येत्या काही वर्षात अमेरिकेलाही मागे टाकेल, असे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर मधुमेहाने महामारीचे स्वरुप घेण्यापूर्वीच, भारत सरकार आणि नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.