शहरं
Join us  
Trending Stories
1
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
2
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
3
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
4
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
5
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
6
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
7
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
8
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
9
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
10
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
11
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
12
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
13
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
14
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
15
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
16
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
17
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
18
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
19
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
20
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
Daily Top 2Weekly Top 5

चक दे इंडिया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 04:08 IST

भारतीय महिलांनी १३ वर्षांनी आशिया चषक पटकावला.आता पुढील वर्षी होणाºया विश्वचषक स्पर्धेतही आपला महिला संघ नक्कीच बाजी मारेल

भारतीय महिलांनी १३ वर्षांनी आशिया चषक पटकावला.आता पुढील वर्षी होणाºया विश्वचषक स्पर्धेतही आपला महिला संघ नक्कीच बाजी मारेल, पण त्यासाठी देशवासीयांनी प्रोत्साहन देणे खूप आवश्यक आहे आणि हे जेव्हा होईल तेव्हाच खºया अर्थाने म्हणता येईल ‘चक दे इंडिया’...२००७ साली शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेला ‘चक दे इंडिया’ हा महिला हॉकीवर आधारित चित्रपट चांगलाच गाजला. परंतु, या चित्रपटाचे टायटल साँग हॉकीच्या तुलनेत भारतीय क्रिकेटच्या यशासाठी जास्त वापरले गेले. जेव्हा कधी क्रिकेटच्या मैदानात टीम इंडियाने बाजी मारली, तेव्हा प्रत्येक न्यूज चॅनल्स तसेच मैदानावरही ‘चक दे इंडिया’ गाणे वाजवले जायचे. मात्र, गेल्या काही वर्षात भारतीय हॉकीने केलेल्या प्रगतीकडे पाहता खºया अर्थाने ‘चक दे इंडिया’ गाजतंय. काही दिवसांपूर्वीच भारताच्या पुरुष संघाने ढाका येथे मलेशियाला २-१ असे नमवून तिसºयांदा आशिया चषक पटकावला, तर रविवारी भारताच्या महिलांनी अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात चीनचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-४ असा पराभव करत दुसºयांदा आशिया चषक उंचावला.१९८३ साली भारताने क्रिकेट विश्वचषक उंचावल्यानंतर देशात क्रिकेटने आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केले. आज क्रिकेटचे वर्चस्व मोडणे जवळपास अशक्य असले, तरी इतर खेळातील चमकदार यश भारतीयांना लक्ष देण्यास भाग पाडत आहे. भारतात खेळ म्हणजे केवळ क्रिकेट नाही, याची या निमित्ताने का होईना पण थोडी जाणीव देशवासीयांना होत आहे. ज्यावेळी कधी आॅलिम्पिक स्पर्धा जवळ येते, तेव्हाच देशात त्या मर्यादित काळापुरते क्रीडा वातावरण निर्माण होते. आपला देश आॅलिम्पिकमध्ये कितपत मजल मारणार, कोणत्या खेळामध्ये किती पदक येतील, नेमबाजी, बॅडमिंटन, टेनिस या खेळातून संधी असतीलही, पण हॉकीमध्ये किमान एक तरी पदक मिळालेच पाहिजे, अशा अनेक चर्चा यावेळी रंगतात. खेळाडूंना पदक मिळवण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागतेच, मात्र त्याहून अधिक आवश्यकता असते ती प्रोत्साहनाची, पाठिंब्याची आणि विश्वासाची.प्रत्येक खेळाडू आॅलिम्पिकमध्ये आपल्या देशासाठी जीव तोडून मेहनत घेत असतो. कित्येक महिने आपल्या घरापासून दूर राहून केवळ आॅलिम्पिक पदक नजरेसमोर ठेवून स्वत:ला सज्ज करत असतो. त्यामुळेच तर, कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक स्वीकारल्यानंतर वाजले जाणारे राष्ट्रगीत ऐकल्यावर त्या खेळाडूला आनंदाश्रू अनावर होतात. पण एक भारतीय क्रीडाप्रेमी म्हणून आपल्याला ही मेहनत दिसत नाही किंवा आपण ती मेहनत जाणून घेण्याचा प्रयत्नही करत नाही. त्यामुळेच जेव्हा कधी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूंना अपयश येते तेव्हा सहजपणे प्रतिक्रिया मिळते की, आपल्या खेळाडूंकडून काही होणार नाही.यंदा आशिया चषक स्पर्धेच्या पुरुष व महिला जेतेपदांवर कब्जा करून भारताने वर्चस्व मिळवले खरे, पण त्यातही ‘या स्पर्धेत आॅस्टेÑलिया, नेदरलँड, स्पेनसारखे तगडे संघ नव्हते म्हणून भारताला संधी मिळाली,’ असा नकारात्मक सूरही काहींनी उमटवलाच असणार. खेळाडूंना अनेकदा कठोर मेहनतीसह शुभेच्छा मिळणेही तितकेच गरजेचं असतं. जेव्हा कधी संघ किंवा खेळाडू देशासाठी जिंकतो तेव्हा आपल्याला त्या कामगिरीचे अंतिम स्वरूप दिसते. परंतु, या यशासाठी केलेली तपश्चर्या कधीच कळून येत नाही. 

टॅग्स :Sportsक्रीडाHockeyहॉकी