शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा नेते गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
2
"मी जर तोंड उघडलं तर संपूर्ण देश..."; बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा
3
"माझ्या नादाला लागाल तर..." ठाण्याच्या माजी महापौरांची आगरी समाजाविषयी कथित ऑडिओ क्लीप चर्चेत, षड्यंत्र असल्याचा आरोप
4
कर्ज फेडू शकत नसल्यानं पाकिस्तानचा मास्टरस्ट्रोक; सौदीला गजब ऑफर, अमेरिकेचेही टेन्शन वाढलं
5
"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी? 
6
दुचाकी वाचवायला गेला आणि तीन जणांचा जीव गेला, ट्रक अपघाताचा थरकाप उडणारा सीसीटीव्ही व्हिडीओ
7
समृद्धी महामार्गाच्या घोटाळ्यातून पन्नास खोके, एकदम ‘ओके’! हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
8
अंकिता भंडारी हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे, उत्तराखंड सरकारचा निर्णय  
9
‘१४० कोटी जनतेच्या गरजेसाठी कुठूनही स्वस्तात तेल आणू’, ट्रम्प यांच्या ५०० टक्के टॅरिफच्या धमकीला भारताचं थेट उत्तर 
10
विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनांची कंटेनरला धडक: ठाण्यात विचित्र अपघातात चाैघे जखमी, १२ वाहनांचे नुकसान
11
‘गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा’, निलेश राणे यांची मागणी  
12
VIDEO: प्रभासच्या चाहत्यांचा थिएटरमध्ये धुडगूस; ‘द राजा साब’च्या स्क्रीनिंगदरम्यान आणल्या मगरी
13
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात 8 वेळा चर्चा', अमेरिकन मंत्र्याचा 'तो' दावा भारताने फेटाळला...
14
"Bombay is not Maharashtra City..."; भाजपा नेत्याच्या विधानानं नवा वाद; उद्धवसेनेने सुनावले
15
महिला सक्षमीकरणाचे नवे मॉडेल! सोमनाथ मंदिरामुळे शेकडो महिलांना मिळाली रोजगाराची सुवर्णसंधी
16
Gautami Kapoor : राम कपूरकडे नव्हतं काम, पत्नी गौतमीने सांभाळलं घर; सांगितला लग्नानंतरचा अत्यंत कठीण काळ
17
२८ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; १ फेब्रुवारीला बजेट; सामान्यांची 'अच्छे दिन'ची प्रतीक्षा संपणार?
18
उमेदवारांची माहिती अद्याप 'अंधारात', निवडणुकीतील ४६९ उमेदवारांची शपथपत्रे अपलोडच केली नाहीत!
19
"एक दिवस हिजाब घालणारी महिला पंतप्रधान बनेल, पण कदाचित मी जिवंत नसेन", सोलापुरात ओवैसींचा अजित पवारांवर हल्ला
20
हिमाचल प्रदेशच्या सिरमौरमध्ये भीषण अपघात; दरीत कोसळली बस, ८ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्र आराधनेचे शताब्दी पर्व! जगातील सर्वात मोठी सांस्कृतिक संघटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 08:05 IST

‘पंच परिवर्तना’तून भारत नवे वैभव गाठेल, हा दृढ विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आजच्या शताब्दी सोहळ्यात सामावलेला आहे.

योगी आदित्यनाथमुख्यमंत्री, उत्तर प्रदेश

भारतभूमी ही त्याग, तपस्या आणि धर्माची अखंड परंपरा जपणारी आहे. संकटांच्या काळात या भूमीतूनच जागृतीच्या ज्वाला उठल्या आणि जनमानसाला नवी दिशा मिळाली. १९२५ साली नागपूरमध्ये डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी प्रज्वलित केलेली एक छोटी ज्योत आज ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या जगातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी सांस्कृतिक संघटनेचा अखंड राष्ट्रदीप बनली आहे.संघाचा जन्म हा राजकीय महत्त्वाकांक्षेतून नव्हे, तर भारतीय आत्म्याच्या ऊर्जेतून झाला. जेव्हा समाज अंतर्बाह्य सुदृढ, संघटित आणि चरित्रवान बनेल, तेव्हाच स्वातंत्र्याचे सार्थक होईल अशी डॉ. हेडगेवार यांची भावना होती. त्यामुळे संघाची शाखा ही केवळ खेळ अथवा व्यायामाची जागा नसून चरित्रनिर्मितीची कार्यशाळा ठरली.आज संघाच्या ८३ हजार शाखा आणि लाखो सेवा प्रकल्प शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, आपत्ती निवारण यांसारख्या क्षेत्रात कार्यरत आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या निराशाजनक काळातही संघाने सेवाभावातून राष्ट्राला सकारात्मक दिशा दिली. युद्धकाळ असो वा नैसर्गिक आपत्ती – स्वयंसेवक नेहमी आघाडीवर राहिले. श्रीरामजन्मभूमी आंदोलनातही संघाचे शिस्तबद्ध नेतृत्व निर्णायक ठरले. डॉ. हेडगेवारांनंतर गुरुजी गोळवलकर, बाळासाहेब देवरस, रज्जुभय्या, सुदर्शनजी आणि आता डॉ. मोहन भागवत यांनी संघाला काळानुरूप दिशा दिली. या प्रवासातूनच देशाला पं. दीनदयाल उपाध्याय यांचे एकात्म मानवदर्शन, अटल बिहारी वाजपेयी यांचे उदार राष्ट्रवाद आणि आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यक्षम नेतृत्व लाभले.आजच्या जागतिकीकरणाच्या काळात जेव्हा संस्कृती आणि कुटुंबसंस्था डळमळीत दिसतात, तेव्हा संघाची उपयुक्तता अधिकच ठळक होते. भारताचे भविष्य केवळ तांत्रिक प्रगतीवर नाही तर संस्कार, चरित्र आणि सांस्कृतिक स्थैर्यावर उभारलेले असेल, याचे संघ सतत स्मरण करून देत आला आहे.शताब्दी पर्व हा केवळ इतिहासाचा उत्सव नसून, नव्या शतकासाठीचा संकल्प आहे. सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, कुटुंबबोधन, स्वदेशी जीवनशैली आणि नागरिक कर्तव्यबोध या ‘पंच परिवर्तनां’तून भारत नवे वैभव गाठेल, हा दृढ विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आजच्या शताब्दी सोहळ्यात सामावलेला आहे. शताब्दी पर्वाचा हा क्षण आपल्याला स्मरण करून देतो की गेलेला काळ हा फक्त इतिहास आहे, पण येणारी शताब्दी हे आपले कर्तव्य आहे. जर प्रत्येक भारतीयाने आपल्या अंतःकरणात संघाच्या संस्कारांचा दीप प्रज्वलित केला तर कोणतीही शक्ती भारताला विश्वगुरु होण्यापासून रोखू शकणार नाही.  भारत माता की जय!

English
हिंदी सारांश
Web Title : RSS Centenary: A Century of Nation-Building, World's Largest Cultural Organization

Web Summary : RSS, born from Indian spirit, promotes unity and character. Eighty-three thousand branches serve in education, health, disaster relief. It shaped leaders like Vajpayee and Modi, emphasizing cultural values amid globalization. The centenary marks a pledge for social harmony and national progress.
टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघyogi adityanathयोगी आदित्यनाथ