शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

राष्ट्र आराधनेचे शताब्दी पर्व! जगातील सर्वात मोठी सांस्कृतिक संघटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 08:05 IST

‘पंच परिवर्तना’तून भारत नवे वैभव गाठेल, हा दृढ विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आजच्या शताब्दी सोहळ्यात सामावलेला आहे.

योगी आदित्यनाथमुख्यमंत्री, उत्तर प्रदेश

भारतभूमी ही त्याग, तपस्या आणि धर्माची अखंड परंपरा जपणारी आहे. संकटांच्या काळात या भूमीतूनच जागृतीच्या ज्वाला उठल्या आणि जनमानसाला नवी दिशा मिळाली. १९२५ साली नागपूरमध्ये डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी प्रज्वलित केलेली एक छोटी ज्योत आज ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या जगातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी सांस्कृतिक संघटनेचा अखंड राष्ट्रदीप बनली आहे.संघाचा जन्म हा राजकीय महत्त्वाकांक्षेतून नव्हे, तर भारतीय आत्म्याच्या ऊर्जेतून झाला. जेव्हा समाज अंतर्बाह्य सुदृढ, संघटित आणि चरित्रवान बनेल, तेव्हाच स्वातंत्र्याचे सार्थक होईल अशी डॉ. हेडगेवार यांची भावना होती. त्यामुळे संघाची शाखा ही केवळ खेळ अथवा व्यायामाची जागा नसून चरित्रनिर्मितीची कार्यशाळा ठरली.आज संघाच्या ८३ हजार शाखा आणि लाखो सेवा प्रकल्प शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, आपत्ती निवारण यांसारख्या क्षेत्रात कार्यरत आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या निराशाजनक काळातही संघाने सेवाभावातून राष्ट्राला सकारात्मक दिशा दिली. युद्धकाळ असो वा नैसर्गिक आपत्ती – स्वयंसेवक नेहमी आघाडीवर राहिले. श्रीरामजन्मभूमी आंदोलनातही संघाचे शिस्तबद्ध नेतृत्व निर्णायक ठरले. डॉ. हेडगेवारांनंतर गुरुजी गोळवलकर, बाळासाहेब देवरस, रज्जुभय्या, सुदर्शनजी आणि आता डॉ. मोहन भागवत यांनी संघाला काळानुरूप दिशा दिली. या प्रवासातूनच देशाला पं. दीनदयाल उपाध्याय यांचे एकात्म मानवदर्शन, अटल बिहारी वाजपेयी यांचे उदार राष्ट्रवाद आणि आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यक्षम नेतृत्व लाभले.आजच्या जागतिकीकरणाच्या काळात जेव्हा संस्कृती आणि कुटुंबसंस्था डळमळीत दिसतात, तेव्हा संघाची उपयुक्तता अधिकच ठळक होते. भारताचे भविष्य केवळ तांत्रिक प्रगतीवर नाही तर संस्कार, चरित्र आणि सांस्कृतिक स्थैर्यावर उभारलेले असेल, याचे संघ सतत स्मरण करून देत आला आहे.शताब्दी पर्व हा केवळ इतिहासाचा उत्सव नसून, नव्या शतकासाठीचा संकल्प आहे. सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, कुटुंबबोधन, स्वदेशी जीवनशैली आणि नागरिक कर्तव्यबोध या ‘पंच परिवर्तनां’तून भारत नवे वैभव गाठेल, हा दृढ विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आजच्या शताब्दी सोहळ्यात सामावलेला आहे. शताब्दी पर्वाचा हा क्षण आपल्याला स्मरण करून देतो की गेलेला काळ हा फक्त इतिहास आहे, पण येणारी शताब्दी हे आपले कर्तव्य आहे. जर प्रत्येक भारतीयाने आपल्या अंतःकरणात संघाच्या संस्कारांचा दीप प्रज्वलित केला तर कोणतीही शक्ती भारताला विश्वगुरु होण्यापासून रोखू शकणार नाही.  भारत माता की जय!

English
हिंदी सारांश
Web Title : RSS Centenary: A Century of Nation-Building, World's Largest Cultural Organization

Web Summary : RSS, born from Indian spirit, promotes unity and character. Eighty-three thousand branches serve in education, health, disaster relief. It shaped leaders like Vajpayee and Modi, emphasizing cultural values amid globalization. The centenary marks a pledge for social harmony and national progress.
टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघyogi adityanathयोगी आदित्यनाथ