शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

भाजपकडून धर्माच्या कार्डाचा वापर झालाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 04:43 IST

भाजपच्या अधिकृत टि्वटर हॅन्डलवरून भाजपच्या अध्यक्षांच्या भाषणातील एक परिच्छेद टाकण्यात आला.

- संतोष देसाईभाजपच्या अधिकृत टिष्ट्वटर हॅन्डलवरून भाजपच्या अध्यक्षांच्या भाषणातील एक परिच्छेद टाकण्यात आला. त्यात पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे की, आमचा पक्ष जर सत्तेत आला तर तो संपूर्ण देशासाठी नागरिकत्वाचा कायदा लागू करील, तसेच हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माचे सोडून इतर धर्माच्या घुसखोरांना शोधून त्यांच्याच विरुद्ध कारवाई करील. निरनिराळ्या धर्माच्या लोकांविषयी पक्षाची भूमिका काय आहे हे त्यातून स्पष्टच झाले आहे. राष्ट्रीय भूमिकेतून सर्व घुसखोरांविरुद्ध कारवाई करण्याविषयी आक्षेप घेण्याचे कारण नाही. पण त्यांना धर्माच्या आधारावर वेगळे करून मुस्लीम व ख्रिश्चन समाजाला वेगळी वागणूक देण्यात विशिष्ट धर्माची सत्ता मान्य करण्याचा दृष्टिकोन स्पष्टच दिसतो. या यादीत बौद्ध धर्माच्या लोकांचा समावेश करण्यामागे राजकीय भूमिकाही दिसून येते. तसेच घुसखोरांना भारतीय नागरिकत्व नाकारताना सरकारचे मित्र कोण आणि शत्रू कोण हे निश्चित करण्याची कृती दिसून येते. कारण देशातील अनेक घुसखोर हे शेजारी राष्ट्रातील बौद्धही असू शकतात!पण पक्षाला धार्मिक भेदभाव करायचे आहेत, यात नवल वाटण्यासारखे काही नाही. फक्त अशा तºहेने वक्तव्य करण्याचे धाडस पक्षाध्यक्षांनी दाखवणे हे आश्चर्यकारक आहे. यापूर्वीच्या नेतृत्वाने हीच गोष्ट आडवळणाने सुचविली होती. या वेळी त्यात स्पष्टता आहे. या वक्तव्याची मतदारांमध्ये काय प्रतिक्रिया उमटते ते पाहणे उद्बोधक ठरेल. समाजातील एका गटाचा या भूमिकेला पाठिंबा आहे. त्यात घुसखोरांमुळे प्रभावित झालेले, त्यांच्या विकासाच्या संधी गमावलेले हिंदू लोक आहेत. पण या भूमिकेला कडाडून विरोध करणाराही एक गट आहे. त्यांना ही भूमिका फाजील धर्माभिमानी आहे आणि या भूमिकेने घटनेच्या मूलभूत तत्त्वांना हरताळ फासला जातो असे वाटते. पण या दोघांचा सुवर्णमध्य साधणारेही काही लोक आहेत. हे लोक शहरात मोठ्या प्रमाणात दिसून येतात. ते उदार मतांचे असतात व त्यांनी यापूर्वी अन्य पक्षांची पाठराखण केलेली असते.सध्याच्या सरकारचे गुणगान करताना ते मोदींच्या नेतृत्वगुणाचे कौतुक करतात. जगात त्यांनी भारताची प्रतिमा कशी उंचावली आहे याचे गुणगान गातात. ते राहुल गांधींविरुद्ध भूमिका घेतात. त्यांच्या घराणेशाहीवर टीका करतात आणि पूर्वीच्या सरकारच्या काळात भ्रष्टाचाराला कशी मोकळीक मिळाली होती. मायावती जर पंतप्रधान झाल्या तर काय होईल याची त्यांना भीती वाटत असते. आघाडीचे सरकार आलेच तर ते मोदींच्या नेतृत्वात यावे अशी त्यांची भूमिका असते. त्यांच्या विचारांविषयी मतैक्य किंवा मतभिन्नता असू शकते. पण त्यामुळे राजकीय पर्यायांचे मूल्यांकन करणे सोपे जाते.

पण लोकांसमोर धार्मिक ध्रुवीकरण होत असल्याचा विषय आपण मांडला तर त्यावर ते मौन पाळतात! तो विषय त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा नसतो. ते जेव्हा सरकारवर टीका करतात - जसे नोटाबंदीचा निर्णय पूर्ण विचारांती घेतला नाही किंवा खऱ्या सुधारणांचा विचारच केला जात नाही तेव्हा गोरक्षकांकडून कायदा हातात घेतला जातो किंवा भेदभाव करण्यात येतो हा विचार त्यांना स्पर्श करीत नाही. तो विषय त्यांच्यावर लादलाच तर ते त्याला फारसे महत्त्व देत नाही (लहान गोष्टींना वाढवून सादर करण्याचे मीडियाचे काम आहे!) किंवा प्रत्येक पक्षात काही माथेफिरू असतातच. त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला हवे किंवा अशा गोष्टी समाजात घडतच असतात, असे म्हणत त्याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला देतात! (निवडणुकीच्या काळात निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी असे काहीतरी बोलावेच लागते, वास्तविक त्यांच्या मनात तसे काही नसते इ.इ.)
आपण काही सर्वगुणसंपन्न जगात वावरत नसतो आणि आपल्यासमोर पर्याय तरी कोणता असतो. जगात इस्लाम हाच सर्व तºहेच्या दहशतवादाचे मूळ आहे, असे म्हणत ते स्वत:च्या वागणुकीचे समर्थन करीत असतात! सगळ्यात मूलभूत विषय हा असतो की निवडणुकीत निवड करण्यासाठी या गोष्टी त्यांच्या लेखी फारशा महत्त्वाच्या नसतात! तो विषय दुसºया जगाशी संबंधित असतो आणि त्याचा संबंध इतर लोकांशी असतो. इतर अनेक विषय महत्त्वाचे असतात, ते वगळून हा विषय हाती घेणे हे त्यांच्यादृष्टीने विषयांतर असते. तो अन्य कुणाचा तरी प्रश्न असतो आणि महत्त्वाच्या विषयांना डावलून त्या विषयाकडे लक्ष पुरवणे फारसे महत्त्वाचे नसते. हे महत्त्वाचे विषय म्हणजे आर्थिक विकास, जगामध्ये भारताचे रँकिंग, भ्रष्टाचार आणि एक क्षुल्लक वाटणारा नेता! धर्माचा विषय काढला की ते घाईघाईत असे विषय समोर करतात. त्यांना नको असलेले विषय टाळण्यासाठी त्यांना हीच भूमिका घ्यावी लागते!अमित शहा यांचे वक्तव्य असो की अली/बजरंग बलीबाबत योगी आदित्यनाथ यांनी केलेले भाष्य असो, त्यातून समाजासमाजात धार्मिक आधारावर भेद करण्यात येत आहे हे जाणवत असते. आजच्या काळाचे ते वास्तव आहे. हे काही निवडणुकीपुरते वापरलेले तंत्र नसते तर सत्तारूढ पक्षाच्या विश्वासाचा तो आधार असतो. अनेकांना त्यात काही नावीन्य आहे असे वाटत नाही. पण जे मध्यममार्गी आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की त्यांना मान्य असो वा नसो, मत धर्मभेदाच्या विरोधात द्यायचे हे त्यांनी निश्चित करायला हवे. त्यापासून त्यांना दूर जाता येणार नाही!(राजकीय विश्लेषक)

टॅग्स :BJPभाजपा