शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
3
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
5
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
6
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
7
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
8
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
9
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
10
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
11
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
12
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
13
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
14
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
15
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
16
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
17
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
18
साचलेले प्रश्न, दमलेले कार्यकर्ते, मरगळलेला प्रचार
19
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
20
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी

परदेशातील मुलांच्या वृद्ध आईवडिलांची देखभाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 6:39 AM

गेल्या वीस ते तीस वर्षांपासून अभियांत्रिकी क्षेत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

गेल्या वीस ते तीस वर्षांपासून अभियांत्रिकी क्षेत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये विशेषत: संगणक, अणुविज्ञान, माहिती तंत्रशास्त्र यासारख्या विषयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांत बहुधा नोकºया मिळतात. त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात मुले नोकरीनिमित्त परदेशी जातात व तेथेच काही कालावधीनंतर स्थायिक होतात. चांगली नोकरी, चांगले वातावरण, भरपूर पगार, स्वच्छ परिसर, करिअर करण्यासाठी उपलब्ध संधी, गुणवत्तेला वाव, भरपूर पैसा, चांगले जीवनमान या गोष्टी बहुधा प्रगत राष्ट्रामध्ये नोकरी व व्यवसायासाठी मुलांना आकर्षित करतात. त्यामुळे वृद्ध आईवडील भारतात एकटे पडतात.

मुलांना वारंवार भारतात येणे शक्य होत नाही. वयानुसार वृद्धांचे शारीरिक आजार व मानसिक दुर्बलता वाढीस लागते. नातवंडांसोबत खेळण्याच्या वयात एकटेपणा व आधाराविना जीवन जगणे असह्य होत असते. सुरुवातीच्या काळात नातेवाईक व आप्तांचा आधार मिळतो. मात्र नंतर तो मिळणे कठीण होत जाते. परदेशातील मुलांकडून त्यांना पैशाची आवक असते, पण रुग्णालयात वारंवार नेणे, औषधोपचार करून घेणे, खाण्यापिण्याची सोय होणे, मानसिक व कुटुंबाचे प्रेम मिळणे या गोष्टींपासून ते वंचित होत असल्यामुळे म्हातारपण अजूनच असह्य होते. आज पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरात अशा वृद्ध नागरिकांची देखभाल करणे, त्यांचे खानपान करणे यासाठी विविध संस्थांनी आपले व्यवसाय चालू केले आहेत.

डॉक्टरची वेळ घेणे, दिलेल्या वेळेत वृद्ध लोकांच्या घरी जाऊन त्यांना नियमित दवाखान्यात नेणे, त्यांची डॉक्टरकडून तपासणी करून घेणे, वेळ पडल्यास रुग्णालयात दाखल करणे, औषधी आणून देणे, त्यांना घरी व्यवस्थित पोहोचविणे, रोजचे जेवण पोहोचविणे, नियमित रक्तदाब तपासणे, रक्तातील घटकांची चाचणी करून रिपोर्टचा रेकॉर्ड ठेवणे, आरोग्य व्यवस्था घरी उपलब्ध करून देणे यासारख्या कामासाठी वर्षभराचा करार केला जातो व सेवा दिली जाते. याचे पैसे आॅनलाइन पद्धतीने बºयाचदा मुलांकडून सेवा देणाºया संस्थेच्या खात्यात भरले जातात. काही मुले परदेशातील अमेरिकन, इंग्रजी मुलींशी विवाह करतात. कुटुंबातील जवळीक संपुष्टात येते. व्हिसा व ग्रीनकार्ड अडचणीमुळे काही वेळा वृद्धांना परदेशात जाता येत नाही. काही वृद्ध मुलांकडे परदेशात जातात, पण बºयाच लोकांना काही काळानंतर करमत नाही व स्वत:ला तेथील परिस्थिती व वातावरणाशी जुळवून घेणे शक्य होत नसल्याने पुन्हा भारतात येण्याशिवाय पर्याय नसतो.

काही वेळा तर वृद्धांच्या अंत्यविधीलासुद्धा मुलांना परदेशातून वेळेवर येणे व उपस्थित राहणे शक्य होत नाही. भरपूर पैसा असूनसुद्धा हिरमुसलेले वृद्धापकाळातील आयुष्य जगणे बºयाचदा वृद्धांच्या नशिबी येते. प्रगत वैद्यकशास्त्र व योग्य देखभाल यामुळे माणसाचे आयुष्यमान वाढत आहे. एका अभ्यासानुसार, भारतामध्ये वर्ष २0२५ पर्यंत जवळपास १२५ लक्ष लोक वयाच्या ६0 वर्षांपर्यंत जीवित राहणार आहेत व त्यामुळे त्यांची शुश्रूषा करणे अत्यावश्यक होणार आहे. म्हणूनच भारतात वृद्धांची देखभाल करणे हा व्यवसाय म्हणून उदयास येत आहे व भविष्यात हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात जोमाने वेग धरेल ही वास्तविकता आपल्याला विसरता येणार नाही.- प्रा. डॉ. संदीप ताटेवार । अभियांत्रिकी प्राध्यापक