शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
3
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
4
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
5
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
6
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
7
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
8
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
9
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
10
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
11
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
12
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
13
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
14
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
15
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
16
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
17
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
18
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
19
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
20
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'

बुवा बनले मंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 01:25 IST

राज्यातील पाच बुवांना राज्यमंत्र्याचा दर्जा देण्याचा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा निर्णय त्यांच्या एकट्याचा नाही. त्याचे देशभरात उमटलेले पडसाद लक्षात घेतले की त्याला पंतप्रधान मोदींसह भाजपाची व संघ परिवाराची संमती असणे समजण्याजोगे आहे.

राज्यातील पाच बुवांना राज्यमंत्र्याचा दर्जा देण्याचा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा निर्णय त्यांच्या एकट्याचा नाही. त्याचे देशभरात उमटलेले पडसाद लक्षात घेतले की त्याला पंतप्रधान मोदींसह भाजपाची व संघ परिवाराची संमती असणे समजण्याजोगे आहे. न समजण्याजोगी बाब, ज्या पाच बुवांची यासाठी निवड करण्यात आली त्यांच्या निवडीचा निकष कोणता ही आहे. मध्य प्रदेशातील नर्मदेचा परिसर हा बुवाबाबांच्या बुजबुजाटाने व्यापला आहे. त्यांच्यातील काहींनी आपण अध्यात्मशक्ती प्राप्त केली असल्याचा दावा मांडला तर काहींनी आपल्या नुसत्या पादतीर्थाने भलेभले रोग दुरुस्त होतात असे सांगितले. मात्र तसे दावे करणारे बुवा आणि बाबा त्या राज्यात काही हजारांहून अधिक आहेत. त्यातील अनेकांना डावलून, काहींना नापास करून आणि काहींकडे दुर्लक्ष करून ही निवड झाली आहे हे निश्चित. कारण सरकारने वा भाजपने या बुवांना कोणा परीक्षेला बसवून त्यांचे अध्यात्मबळ तपासून पाहिल्याचे कोठे प्रकाशित झाले नाही. त्यांचा प्रभाव वा त्यांच्या भगतांचा वर्ग विचारात घेऊन ही निवड झाली म्हणावे तर ती राजकीय ठरण्याचा व या बुवांना येत्या निवडणुकीत वापरून घेण्याचा सरकारचा इरादा असल्याचा आरोप त्यावर ठेवू शकणारी आहे. यातल्या काही बुवांनी नर्मदा धरणाला विरोध केला व त्यासाठी आंदोलन केले असे सांगितले जाते. त्यांचा तो विरोध शमविण्यासाठी त्यांना राज्यमंत्रिपदाची लालूच दिली असल्याचेही त्याचवेळी सांगितले जाते. पण इच्छा व मन जिंकलेल्यांना आणि केवळ ज्ञान व अध्यात्म यांच्या बळावर साधुत्व व धर्मज्ञान मिळविल्याचा दावा करणाऱ्यांना लालूच तरी कशी दाखविता येईल? शिवाय ते धर्मात्मे अशा प्रलोभनांना बळी तरी कसे पडतील? छ.शिवाजी महाराजांनी आपले सारे राज्य तुकोबारायांच्या झोळीत टाकले तेव्हा पांडुरंगचरणीच सारे वैभव पाहणाºया त्या सत्पुरुषाने अत्यंत निरिच्छ मनाने ते दान परत केल्याची कथा महाराष्ट्रात सर्वतोमुखी आहे. मध्य प्रदेशातले बुवाबाबा मराठी संतांहून वेगळे असावे किंवा मराठी संतांना सत्तेचे मोल कळले नसावे असेच या स्थितीत समजावे लागते. मध्य प्रदेशात भाजपचे भगवे सरकार आहे. त्यामुळे त्याने राज्यमंत्रिपद दिलेले पाचही बुवा भगव्या धर्माचे असणे स्वाभाविक आहे. त्या सरकारला व त्याच्या पक्षाला हिंदुत्व आणि हिंदुत्ववाद या विचाराने ग्रासले असल्याने अल्पसंख्य म्हणूनही एखाद्या मुस्लीम मौलवीची किंवा ख्रिश्चन धर्मगुरूची निवड राज्यमंत्री पदासाठी त्याने केली नाही. आतापर्यंत राजकारणच तेवढे धर्माचा आधार वा बुरखा घेत आले. आता धर्मानेच राजकारणाचा पेहराव घेण्याची वेळ आली आहे असे सांगणारा मध्य प्रदेश सरकारचा हा धर्मनिर्णय आहे. बरे, ते राज्य अजून भ्रष्टाचारमुक्त झाले नाही. त्यातला व्यापम घोटाळा तेथील सरकारसह साºया प्रशासनाला घेरून उरला आहे. त्याचमुळे कदाचित त्याचा तपास जमेल तेवढ्या संथगतीने त्या सरकारकडून केला जात आहे. ज्या राज्यात एवढे बुवा, बाबा, आचार्य आणि धर्मपुरुष आहेत त्याने निदान भ्रष्टाचारापासून तरी मुक्त व्हायचे. परंतु तसे न होता ते राज्य या बुवा-बाबांनाच आपल्या तशा करणीत सहभागी करून घेत असेल तर तो ‘भ्रष्टाचाराचे धर्मकारण’ या सदरात जमा होणारा प्रकार आहे. मध्य प्रदेशचे पाच बुवा व्यापम घोटाळ्याचेही भागीदार ठरत असतील तर तो शिवराजसिंग चौहान यांच्या डोक्यावरील नैतिकतेचे ओझे कमी करणारा प्रकार ठरावा. शिवाय हे बुवा आता निवडणूक प्रचारात भाजपच्या बाजूने उतरले तर तोही त्यांच्या पक्षाचा एक अनुषंगिक लाभ ठरावा. पूर्वी भाजपच्या व्यासपीठावर काही आक्रस्ताळ्या साध्व्या दिसत. आता त्यांच्या जागी राज्यमंत्री बनलेले हे बुवा दिसू लागले तर तोही त्या पक्षाच्या राजकीय देखाव्यातील एक बदल म्हणता येईल. जनता तारील हा विश्वास ज्यांना वाटत नाही त्यांना बुवाबाबांची गरज लागली तर तो आपल्याही सहानुभूतीचा विषय व्हावा.