शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बुलडोझर रिपब्लिक; दंगली म्हणजे किरकोळ आग नव्हे तर वणवा असतो, वाटेत येणारी प्रत्येक वस्तू तो भस्मसात करतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 08:59 IST

या दंगली म्हणजे किरकोळ आग नव्हे तर वणवा असतो. वाटेत येणारी प्रत्येक वस्तू, प्रत्येक जीव तो भस्मसात करतो. ते करताना तो जात, धर्म वगैरे काही पाहत नाही. किंबहुना असा वणवा पेटला की, जे इतरांच्या व्यथा-वेदनांवर चेकाळतात त्यांचे आयुष्य, संसारदेखील एक दिवस त्यात बेचिराख होतात. तेव्हा, समाज व देश म्हणून सावध होण्याची गरज आहे. आपण पुन्हा पुन्हा वणव्याशी खेळताे आहोत. 

देशात जातीय, धार्मिक हिंसाचाराच्या गेल्या पाच वर्षांत दिवसाला साधारणपणे दोन अशा चौतीसशे घटना घडल्या. त्यात साडेअठरा हजार लोकांना अटक झाली. परंतु, त्यापैकी केवळ दहा टक्के घटनांमध्येच न्यायालयात दंगलखोरांवर आरोप सिद्ध झाले. अवघे ९८४ दंगलखाेर दोषी ठरले. सर्वाधिक दंगली घडलेल्या बिहारमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण अवघे दोन टक्के आहे. प्रगत म्हणवली जाणारी महाराष्ट्र, हरयाणा ही राज्येही दंगलीबाबत मागे नाहीत. आर्थिक महासत्ता, संपन्न, समृद्ध देश बनू पाहणाऱ्या भारतातील हे वास्तव अत्यंत वेदनादायी आहे. गेले पंधरा दिवस नऊ-दहा राज्यांमध्ये रामनवमी, हनुमानजयंती व इतर सणांच्या निमित्ताने जागोजागी जो हिंसाचार उसळला, तो पाहता आधीच्या घटनांमधून समाज,  सरकार काही धडा शिकले, असे अजिबात दिसत नाही. उलट दंगल उसळलेल्या भागात संचारबंदीच्याच काळात स्थानिक प्रशासन दुसऱ्याच दिवशी बुलडोझर घेऊन पोचते, अतिक्रमणे हटविण्याच्या नावाने विशिष्ट समुदायाला सरसकट दंगलखोर ठरवून प्रार्थनास्थळे, गोरगरिबांची घरे भुईसपाट करते. हातावर पोट असणारे, आयुष्यभर काबाडकष्ट करून कसेबसे डोक्यावर छप्पर मिळवणाऱ्या गरीब बायाबापड्यांचा आक्रोश, तळतळाट बुलडोझरच्या धडधडाटात विरून जातो.

दंगल पेटविणारे, दगडफेक - तोडफोड - जाळपोळ करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून न्यायदेवतेसमोर ते आरोप सिद्ध होण्याची वाट पाहिली जात नाही. मध्य प्रदेशात खरगोन, बडवानीपासून ते कालच्या दिल्लीतल्या जहांगीरपुरीपर्यंत हाच पॅटर्न दिसला. दंगलखोरांना अद्दल घडविण्याची ही मध्ययुगीन पद्धत अगदीच न्यायनिष्ठुर भावनेतून होते, असेही नाही. तसे असते तर आधीच इतर गुन्ह्यात तुरुंगात आहेत त्यांच्यावर एफआयआर किंवा अपघातात दोन्ही हात गमावलेल्यांवर दगडफेकीचा गुन्हा असले, हास्यास्पद प्रकार घडले नसते. स्थानिक प्रशासनाला पुढे करून सरकारनेच असा कायदा हातात घेण्याचे प्रकार घडत असताना न्यायालये शांत का आहेत, असे प्रश्न उपस्थित झाले. तेव्हा, सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिल्लीच्या जहांगीरपुरीतल्या अशाच कथित अतिक्रमण हटावला स्थगिती दिली तर प्रत्यक्ष आदेशाचा कागद घेऊन माकप नेत्या वृंदा करात बुलडोझरपुढे उभ्या राहीपर्यंत न्यायप्रिय अधिकारी लोकांची घरे पाडतच होते. हे सारे विषण्ण करणारे आहेच, पण त्याहून मोठी निराशा ही की देश, राज्ये चालविणारे सत्ताधारी अवतीभोवती हिंसेचा आगडोंब उसळला असतानाही चिडीचूप आहेत.

हा लोककल्याणाचा, प्रगतीचा मार्ग नाही, हे सांगत चिथावणीखोर भाषणे, धार्मिक मिरवणुकांमध्ये शस्त्रे परजणारे, परधर्मीयांना आईबहिणीवरून शिव्या किंवा प्रार्थनास्थळासमोर जमाव जमवून माताभगिनींना बलात्काराचे इशारे देणाऱ्यांना रोखण्यासाठी कोणीच पुढे येत नाही. दंगल पेटविणाऱ्यांचे जीव त्या आगीत कधीच जात नाहीत. ते नामानिराळे राहतात. मरतात ते बिचारे मोलमजूर. छोटेमोठे दुकानदार, रस्त्याकडेला बसून कसल्यातरी जिनसा विकणारे यांचेच त्यात नुकसान होते. महत्त्वाचे म्हणजे दंगलीची टाळी कधीच एका हाताने वाजत नाही. सगळ्याच धर्मांत कट्टरपंथी असतात व ते वरवर एकमेकांच्या अंगावर चालून जात असले तरी आतून एकमेकांना पूरकच वागत असतात. त्यांनाच धर्मरक्षणाच्या नावाखाली अधूनमधून दंगली हव्या असतात. त्या पेटल्या व त्यात निरपराधांचे जीव गेले की धर्म म्हणे जिवंत राहतो. अशा द्वेषाचा, विखाराचा, हिंसेचा, रक्तपाताचा, त्यातून निर्माण होणाऱ्या अस्वस्थतेचा खूप मोठा अडथळा राज्यांच्या, देशाच्या प्रगतीच्या मार्गात उभा राहतो. अशी ठिकाणी गुंतवणूकदार आर्थिक गुंतवणूक करीत नाहीत. परिणामी, रोजगार निर्माण होत नाहीत.

मुलाबाळांच्या शिक्षणाचे, करिअरचे, उज्ज्वल भविष्याचे दरवाजे खुले होत नाहीत. कुपोषण, बालमृत्यू, बाळंतिणीचे हाल अशा आरोग्य समस्या दुर्लक्षित राहतात. बेकारी, गरिबी, दैन्य-दारिद्र्य व दैववाद, धर्मांधतेचे दुष्टचक्र तयार होते. एकूणच समाजाचा विवेक हरवतो आणि हे सारे पुन्हा माणसांना जाती-धर्म, भाषा व प्रांतांच्या आधारावर विद्वेषाकडे व हिंसेकडे घेऊन जाते. या दंगली म्हणजे किरकोळ आग नव्हे तर वणवा असतो. वाटेत येणारी प्रत्येक वस्तू, प्रत्येक जीव तो भस्मसात करतो. ते करताना तो जात, धर्म वगैरे काही पाहत नाही. किंबहुना असा वणवा पेटला की, जे इतरांच्या व्यथा-वेदनांवर चेकाळतात त्यांचे आयुष्य, संसारदेखील एक दिवस त्यात बेचिराख होतात. तेव्हा, समाज व देश म्हणून सावध होण्याची गरज आहे. आपण पुन्हा पुन्हा वणव्याशी खेळताे आहोत.  

टॅग्स :GovernmentसरकारEnchroachmentअतिक्रमणdelhiदिल्ली