शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बुलडोझर थांबत नसतो...! आंदोलक शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या मंत्र्यांच्या मुलाचं घर दिसत नाही का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 06:29 IST

उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांचा बहुचर्चित बुलडोझर आता मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्यांच्या घरांवर चालून जात आहे.

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयीच्या टिप्पणीमुळे देशात तापलेले वातावरण शांत होण्याचे नाव घेईना. आखाती देशांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा व दिल्लीतील नेते नवीनकुमार जिंदल यांच्या विधानांवर तीव्र आक्षेप घेतल्यानंतर दोघांवर कारवाई झाली. दोघांनाही पक्षातून निलंबित करण्यात आले. त्यानंतर गेल्या शुक्रवारी साप्ताहिक प्रार्थनेनंतर देशात जागोजागी अल्पसंख्याक समाज निषेधासाठी रस्त्यावर आला. रांची, कानपूर, प्रयागराज आदी ठिकाणी हिंसाचार घडला. रांची येथे दोघांचे बळी गेले. पोलिसांवर ठरवून गोळीबाराचा आरोप झाला. काही ठिकाणी नुपूर शर्मा यांच्या पुतळ्याला प्रतीकात्मक फाशी देण्यात आली. ईशनिंदेसाठी त्यांना कठोर शिक्षेची मागणी होत आहे.

त्याचवेळी उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांचा बहुचर्चित बुलडोझर आता मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्यांच्या घरांवर चालून जात आहे. प्रयागराज येथील जावेद मोहम्मद यांचे दोन मजली घर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने बुलडोझरच्या मदतीने पाडून टाकले. जावेद यांची मुलगी आफ्रीन फातिमा दिल्लीतील जवाहरलाल राष्ट्रीय विद्यापीठातील विद्यार्थी नेता आहे व नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनात ती सक्रिय होती. आताच्या मोर्चातही तिची भूमिका होती, असा आरोप आहे. या बुलडोझर नीतीने काही मूलभूत प्रश्न निर्माण झाले आहेत. रस्त्यावर उतरून शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या, दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाई करायला हवी, न्यायालयात कठोर शिक्षाही व्हायला हवी; परंतु केवळ संशयावरून त्यांची घरे पाडणे किती योग्य आहे?

घरातल्या एकाने मोर्चात भाग घेतला म्हणून त्या कुटुंबातल्या इतरांनाही शिक्षा करण्याचा अधिकार पोलिसांना व मुलकी प्रशासनातील अधिकाऱ्यांना कुणी दिला? घराचे बांधकाम अवैध असेल, अतिक्रमणात असेल तर त्या बेकायदेशीर बांधकामाची आठवण प्रशासनाला नेमकी आताच कशी झाली? न्यायालयाचे अधिकार असे मुलकी प्रशासनाकडून हातात घेतले जात असताना न्यायालये काय करीत आहेत? एकूणच समाजाच्या संवेदना बधिर झाल्या आहेत का? योगींच्या राज्यात बुलडोझर नेमका विशिष्ट समुदायाच्याच लोकांच्या घरावर कसा चालून जातो? आंदोलक शेतकऱ्यांचा बळी घेणारा मंत्र्यांचा मुलगा किंवा अन्य कुणाची घरे कधी या बुलडोझरला कशी दिसत नाहीत?

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भाजप प्रवक्त्यांच्या विधानांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारवर आखाती देशांपुढे नमते घेण्याची नामुष्की ओढवल्यानंतरही देश काही धडा शिकला नाही का? या घटनांनी आपण त्या देशांच्या हाती आपसूक कोलीत देत आहोत, याचेही भान सत्तेतल्या मंडळींना नाही. असेच बुलडोझर एप्रिल महिन्यात मध्य प्रदेशात खरगोन व बडवानी येथे दंगल उसळल्यानंतर शिवराजसिंह चौहान सरकारनेही आरोपींच्या घरांवर चालविले. ती घरे अतिक्रमित ठरवून पाडली. त्याआधी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारविरुद्ध कंगना राणावत बोलल्यानंतर मुंबई महापालिकेला तिच्या घरातील अवैध बांधकामाची आठवण झाली व बुलडोझर चालविला गेला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे, अपक्ष खासदार नवनीत राणा व आमदार रवि राणा यांनी सरकारविरुद्ध वक्तव्ये व आंदोलन केल्यानंतर त्यांना अवैध बांधकामाच्या नोटिसा दिल्या गेल्या. थोडक्यात, आमच्याविरुद्ध बोलाल, आंदोलन कराल तर आम्ही तुमची घरे पाडून रस्त्यावर आणू, अशा प्रकारची ही दंडेलशाही आहे. त्यामागे बहुसंख्याकवादाची मानसिकता आहे. एकदा जाती, धर्माच्या आधारे बहुमतात असलेल्यांच्या मर्जीने कायदा राबविला जाऊ लागला की त्याला कुठलीही मर्यादा राहात नाही. झुंडीने कायद्याची दिशा निश्चित करण्याचा हा प्रकार आहे. अल्पमतातील विचार, म्हणणे भले सत्य असले तरी ते या झुंडशाहीपुढे चिरडले जाते. त्यावरही बुलडोझर चालविला जातो. बुलडोझर ही अपवादात्मक घटना नाही तर तो सत्तेच्या वापराचा प्रकार आहे. सत्तेत असलेल्यांच्या विरोधात मोर्चा काढला, निदर्शने व घोषणाबाजी केली, काही समाजकंटकांनी दगडफेक केली म्हणून त्यांच्या घरांवर बुलडोझर चालविण्यात येत असेल तर पुढे अशा रीतीने अन्यायाविरुद्ध रस्त्यावर येणाऱ्या प्रत्येकाच्याच वाट्याला हे येणार आहे. आज केवळ विशिष्ट समुदायाच्या घरांवरच बुलडोझर चालला म्हणून जे खुश आहेत किंवा गप्प आहेत, त्यांचाही नंबर कधीतरी या मालिकेत लागू शकतो. कारण, असा बुलडोझर कधी थांबत नसतो..

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपा