शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

Budget 2023: भारतीय अर्थव्यवस्थेचं चित्र गुलाबी की आभासी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 05:57 IST

Budget 2023: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रथेनुसार आर्थिक सर्वेक्षण २०२२-२३ सादर केले. हे सर्वेक्षण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचे वार्षिक ‘रिपोर्ट कार्ड’ असते.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रथेनुसार आर्थिक सर्वेक्षण २०२२-२३ सादर केले. हे सर्वेक्षण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचे वार्षिक ‘रिपोर्ट कार्ड’ असते. अर्थव्यवस्थेशी निगडित प्रत्येक क्षेत्राच्या कामगिरीचे मूल्यमापन आणि भविष्याचा वेध, असे त्याचे ढोबळ स्वरूप असते. आर्थिक सर्वेक्षणासंदर्भात खरी उत्सुकता असते ती सकल देशांतर्गत उत्पन्न म्हणजेच जीडीपीमधील वाढीच्या अंदाजाची! जीडीपीची गतवर्षीच्या तुलनेतील टक्केवारीतील वाढ म्हणजेच विकास दर! विकास दर जेवढा जास्त, तेवढी त्या देशाची भौतिक प्रगती होणार, सर्वसामान्य नागरिकांच्या हाती तेवढा जास्त पैसा खुळखुळणार, असे मानतात. चीन आणि इतर काही देशांत कोविड महासाथीने नव्याने घातलेले थैमान, त्यामुळे चीनमध्ये घसरलेले औद्योगिक उत्पादन, रशिया-युक्रेन युद्धामुळे व्यक्त होत असलेली तिसऱ्या महायुद्धाची भीती, तैवानच्या सार्वभौमत्वावरून अधूनमधून तीव्र होणारा अमेरिका-चीन संघर्ष, मध्यपूर्वेतील विभिन्न चकमकी, इत्यादी कारणांस्तव जगावर महामंदीचे संकट घोंगावू लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर भारताचीअर्थव्यवस्था कशी कामगिरी करणार, यासंदर्भातील उत्सुकता यावर्षी जरा जास्तच ताणली होती. सुदैवाने चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये विकास दरात फार मोठी घसरण होणार नाही आणि भारतीयअर्थव्यवस्था जगात सर्वाधिक गतीने वाढेल, असा आशावाद आर्थिक सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे.

आकडेवारीच्या भाषेतच सांगायचे झाल्यास २०२२-२३ मध्ये विकास दर सात टक्के असेल, तर २०२३-२४ मध्ये तो ६.५ टक्के एवढा असेल, असे आर्थिक सर्वेक्षण सांगते. भारत सरकारचे आर्थिक सर्वेक्षण सादर झाले त्याच दिवशी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आयएमएफनेही जागतिक अर्थव्यवस्थेसंदर्भातील अंदाज व्यक्त करणारा अहवाल जारी केला. त्यानुसार २०२३-२४ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था केवळ २.९ टक्क्यांनी वाढणार असली, तरी भारतीय अर्थव्यवस्था मात्र ६.१ टक्क्यांनी वाढेल. म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीसंदर्भातील भारत सरकार आणि आयएमएफच्या अंदाजात ०.४ टक्क्यांची तफावत आहे; परंतु ती तेवढी चिंतेची बाब नाही. दोन संस्थांच्या आकडेमोडीच्या पद्धतीमधील फरकामुळे तेवढी तफावत असू शकते. खरी चिंता आहे ती विकास दरात सातत्याने होत असलेल्या घसरणीची! भारत सरकारच्याच आर्थिक सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार, २०२१-२२ मध्ये अर्थव्यवस्था ८.७ टक्क्यांनी वाढली होती, २०२२-२३ मध्ये सात टक्क्यांनी वाढणार आहे आणि आगामी वर्षात म्हणजे २०२३-२४ मध्ये ६.५ टक्क्यांनी वाढणार आहे. याचाच अर्थ गत तीन वर्षांपासून अर्थव्यवस्था घसरणीला लागली आहे.

आगामी काही वर्षांत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था व्हायचे असेल, देशातील पायाभूत सुविधांचा झपाट्याने विकास करायचा असेल, बेरोजगारी व महागाई आटोक्यात ठेवायची असेल, सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचवायचे असेल, तर विकास दरातील घसरण रोखणे आणि आगामी काही वर्षे तो किमान आठ ते नऊ टक्क्यांच्या घरात कायम राखणे गरजेचे आहे. चीनने गत काही दशकांत केलेल्या प्रगतीचे गमक सरासरी दहा टक्क्यांच्या घरात राखलेला विकास दर हेच आहे. भारत त्या बाबतीत कमी पडत आहे, हे मान्य करावे लागेल. दरवर्षीच आर्थिक सर्वेक्षणात अर्थव्यवस्थेसंदर्भात गुलाबी चित्र रंगविण्यात येत असते. तो परिपाठ यावर्षीही कायम आहे.

मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांच्यानुसार, अर्थव्यवस्था कोविड महासाथीतून सावरली असून, दशकाच्या उर्वरित कालखंडात उत्तम कामगिरी बजावण्यासाठी सिद्ध झाली आहे, बँकांच्या ताळेबंदात सुधारणा होत आहे, बेरोजगारीचा दर घसरला आहे, महागाईचा दर रिझर्व्ह बँकेद्वारा निर्धारित मर्यादेबाहेर राहणार असला तरी फार आटोक्याबाहेर नसेल. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील प्रत्येक वर्षात आर्थिक सर्वेक्षण आणि अर्थसंकल्पात असेच गुलाबी चित्र रंगविण्यात आले आहे, मग सरकार कोणत्याही पक्षाचे असो, पंतप्रधान व अर्थमंत्री कुणीही असो! वर्षाच्या प्रारंभीचे हे गुलाबी चित्र वर्ष संपता संपता आभासी का वाटू लागते, महागाई, बेरोजगारी नेहमीच बेकाबू का झालेली असते, गरिबांना हातातोंडाची गाठ पडणे कठीण होत असताना श्रीमंत अधिक श्रीमंत का होतात, हे सर्वसामान्यांना वर्षानुवर्षांपासून पडलेले कोडे मात्र कोणत्याही आर्थिक सर्वेक्षणातून अथवा अर्थसंकल्पातून काही केल्या सुटत नाही!

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2023IndiaभारतEconomyअर्थव्यवस्था