शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

Budget 2023: भारतीय अर्थव्यवस्थेचं चित्र गुलाबी की आभासी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 05:57 IST

Budget 2023: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रथेनुसार आर्थिक सर्वेक्षण २०२२-२३ सादर केले. हे सर्वेक्षण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचे वार्षिक ‘रिपोर्ट कार्ड’ असते.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रथेनुसार आर्थिक सर्वेक्षण २०२२-२३ सादर केले. हे सर्वेक्षण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचे वार्षिक ‘रिपोर्ट कार्ड’ असते. अर्थव्यवस्थेशी निगडित प्रत्येक क्षेत्राच्या कामगिरीचे मूल्यमापन आणि भविष्याचा वेध, असे त्याचे ढोबळ स्वरूप असते. आर्थिक सर्वेक्षणासंदर्भात खरी उत्सुकता असते ती सकल देशांतर्गत उत्पन्न म्हणजेच जीडीपीमधील वाढीच्या अंदाजाची! जीडीपीची गतवर्षीच्या तुलनेतील टक्केवारीतील वाढ म्हणजेच विकास दर! विकास दर जेवढा जास्त, तेवढी त्या देशाची भौतिक प्रगती होणार, सर्वसामान्य नागरिकांच्या हाती तेवढा जास्त पैसा खुळखुळणार, असे मानतात. चीन आणि इतर काही देशांत कोविड महासाथीने नव्याने घातलेले थैमान, त्यामुळे चीनमध्ये घसरलेले औद्योगिक उत्पादन, रशिया-युक्रेन युद्धामुळे व्यक्त होत असलेली तिसऱ्या महायुद्धाची भीती, तैवानच्या सार्वभौमत्वावरून अधूनमधून तीव्र होणारा अमेरिका-चीन संघर्ष, मध्यपूर्वेतील विभिन्न चकमकी, इत्यादी कारणांस्तव जगावर महामंदीचे संकट घोंगावू लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर भारताचीअर्थव्यवस्था कशी कामगिरी करणार, यासंदर्भातील उत्सुकता यावर्षी जरा जास्तच ताणली होती. सुदैवाने चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये विकास दरात फार मोठी घसरण होणार नाही आणि भारतीयअर्थव्यवस्था जगात सर्वाधिक गतीने वाढेल, असा आशावाद आर्थिक सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे.

आकडेवारीच्या भाषेतच सांगायचे झाल्यास २०२२-२३ मध्ये विकास दर सात टक्के असेल, तर २०२३-२४ मध्ये तो ६.५ टक्के एवढा असेल, असे आर्थिक सर्वेक्षण सांगते. भारत सरकारचे आर्थिक सर्वेक्षण सादर झाले त्याच दिवशी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आयएमएफनेही जागतिक अर्थव्यवस्थेसंदर्भातील अंदाज व्यक्त करणारा अहवाल जारी केला. त्यानुसार २०२३-२४ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था केवळ २.९ टक्क्यांनी वाढणार असली, तरी भारतीय अर्थव्यवस्था मात्र ६.१ टक्क्यांनी वाढेल. म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीसंदर्भातील भारत सरकार आणि आयएमएफच्या अंदाजात ०.४ टक्क्यांची तफावत आहे; परंतु ती तेवढी चिंतेची बाब नाही. दोन संस्थांच्या आकडेमोडीच्या पद्धतीमधील फरकामुळे तेवढी तफावत असू शकते. खरी चिंता आहे ती विकास दरात सातत्याने होत असलेल्या घसरणीची! भारत सरकारच्याच आर्थिक सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार, २०२१-२२ मध्ये अर्थव्यवस्था ८.७ टक्क्यांनी वाढली होती, २०२२-२३ मध्ये सात टक्क्यांनी वाढणार आहे आणि आगामी वर्षात म्हणजे २०२३-२४ मध्ये ६.५ टक्क्यांनी वाढणार आहे. याचाच अर्थ गत तीन वर्षांपासून अर्थव्यवस्था घसरणीला लागली आहे.

आगामी काही वर्षांत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था व्हायचे असेल, देशातील पायाभूत सुविधांचा झपाट्याने विकास करायचा असेल, बेरोजगारी व महागाई आटोक्यात ठेवायची असेल, सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचवायचे असेल, तर विकास दरातील घसरण रोखणे आणि आगामी काही वर्षे तो किमान आठ ते नऊ टक्क्यांच्या घरात कायम राखणे गरजेचे आहे. चीनने गत काही दशकांत केलेल्या प्रगतीचे गमक सरासरी दहा टक्क्यांच्या घरात राखलेला विकास दर हेच आहे. भारत त्या बाबतीत कमी पडत आहे, हे मान्य करावे लागेल. दरवर्षीच आर्थिक सर्वेक्षणात अर्थव्यवस्थेसंदर्भात गुलाबी चित्र रंगविण्यात येत असते. तो परिपाठ यावर्षीही कायम आहे.

मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांच्यानुसार, अर्थव्यवस्था कोविड महासाथीतून सावरली असून, दशकाच्या उर्वरित कालखंडात उत्तम कामगिरी बजावण्यासाठी सिद्ध झाली आहे, बँकांच्या ताळेबंदात सुधारणा होत आहे, बेरोजगारीचा दर घसरला आहे, महागाईचा दर रिझर्व्ह बँकेद्वारा निर्धारित मर्यादेबाहेर राहणार असला तरी फार आटोक्याबाहेर नसेल. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील प्रत्येक वर्षात आर्थिक सर्वेक्षण आणि अर्थसंकल्पात असेच गुलाबी चित्र रंगविण्यात आले आहे, मग सरकार कोणत्याही पक्षाचे असो, पंतप्रधान व अर्थमंत्री कुणीही असो! वर्षाच्या प्रारंभीचे हे गुलाबी चित्र वर्ष संपता संपता आभासी का वाटू लागते, महागाई, बेरोजगारी नेहमीच बेकाबू का झालेली असते, गरिबांना हातातोंडाची गाठ पडणे कठीण होत असताना श्रीमंत अधिक श्रीमंत का होतात, हे सर्वसामान्यांना वर्षानुवर्षांपासून पडलेले कोडे मात्र कोणत्याही आर्थिक सर्वेक्षणातून अथवा अर्थसंकल्पातून काही केल्या सुटत नाही!

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2023IndiaभारतEconomyअर्थव्यवस्था