शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

Budget 2021: घराबाहेर पडायला प्रोत्साहन हवं.. आणि दिलासाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 03:53 IST

Budget 2021: न्यू नॉर्मल काळात देशांतर्गत पर्यटनाला, आतिथ्य (हॉस्पिटॅलिटी) क्षेत्राला सरकारने अधिक चालना दिली, तर रोजगारनिर्मितीला बळच मिळेल!

- वीणा पाटील(व्यवस्थापकीय संचालक,  वीणा वर्ल्ड) कोविडोत्तर काळात पर्यटन व्यवसाय उभा राहायचा, तर सरकारने हा व्यवसाय करणाऱ्यांना उचलून पैसे द्यावेत असं माझं म्हणणं नाही. पैसे नकोतच,  अपेक्षा आहे ती पोषक-पूरक वातावरणाची. शक्य तर काही सूट आणि दिलासा हवा आहे. अन्न-वस्र-निवारा-शिक्षण यानंतर माणसांच्या आयुष्यात पर्यटन येतं हे मान्य. ती काही माणसांची प्राथमिक गरज नाही; मात्र लॉकडाऊनच्या काळात घरात बसलेल्या माणसांना आता सुरक्षिततेचे नियम पाळून बाहेर जाण्याची इच्छा आहे. ती त्यांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याचीही गरज आहे. आणि या साऱ्यात एक संधीही आहे- ‘देखो अपना देश’. कोरोनापूर्व काळात आम्ही पर्यटन क्षेत्रातले लोकही ग्राहकांची विदेशात जाण्याची स्वप्नं  पूर्ण करत होतो, मात्र या साऱ्यात आपल्या देशात पर्यटनाच्या जितक्या शक्यता, संधी आणि व्यवसाय आहे त्या दुर्लक्षित राहिल्या. आता या न्यू नॉर्मल काळात देशांतर्गत पर्यटनाला, हॉटेल आणि आतिथ्य (हॉस्पिटॅलिटी) क्षेत्राला सरकार अधिक चालना देऊ शकतं, ते देण्याचीच गरज आहे. आम्ही आमच्या परीने व्यवसाय सुरू केलाच आहे; मात्र व्यक्तिगत, व्यावसायिक स्तरावरच्या त्या प्रयत्नांना पोषक वातावरण तयार करून देण्याची तयारी सरकारने दर्शवली पाहिजे. त्यासाठी पाठबळ दिलं पाहिजे. कोरोना काळातले सर्व सुरक्षाविषयक नियम पाळून सुरू झालेले पर्यटन आणि हॉटेल व्यवसाय- या दोन्हीचा व्यवसाय करण्याचा खर्च वाढलेला आहे. त्यात इंधनाच्या किमती वाढत असल्याने वाहतूक खर्च वाढतो. त्यामुळे आम्ही गट पर्यटनाच्या किमती कितीही कमी करायच्या म्हटल्या तरी त्याला मर्यादा आहेत. त्यामुळे सरकारनेच पर्यटनाला चालना म्हणून ‘देखो अपना देश’ या सूत्रानुसार देशांतर्गत पर्यटनासाठी काही सोयी - सवलती द्यायला हव्यात. त्याचा फायदा पर्यटक आणि व्यवसाय करणारे दोघांना होऊ शकतो. भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात पर्यटनाचा वाटा ८ टक्के आहे आणि हा व्यवसाय सुमारे दहा टक्के रोजगार निर्मिती करतो. त्यामुळे रोजगारनिर्मिती आणि महसूल यासाठीही सरकारने पर्यटनाच्या सर्व शक्यतांचा विचार अधिक व्यापक करण्याची गरज आहे. या अर्थसंकल्पाकडून आमच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत?१. पर्यटन उद्योग मार्गावर यायला अजून दोन वर्षे तरी किमान लागतील असे आजचे चित्र आहे. त्यामुळे सरकारने पर्यटन व्यावसायिकांना कर सवलत द्यावी. कर भरण्याच्या मुदतीत सवलत दिली तर त्याचा व्यावसायिकांना थेट लाभही होईल आणि पर्यटन क्षेत्रालाही. २. देखो अपना देश या सूत्राद्वारे देशांतर्गत पर्यटनाविषयी अधिक जनजागृती होऊन देश पाहण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे.  त्यामुळे रोजगारही वाढेल आणि अर्थव्यवस्थेलाही चालना मिळल.३. देशात एकाच पर्यटन धोरणाचा विचार करण्याची गरज आहे. प्रत्येक राज्याचे कोरोना चाचण्यांचे नियम वेगळे आहेत, ते बदलण्याची शक्यता आणि त्यासाठीचा खर्चही गृहीत धरावा लागतो. त्याऐवजी देशभर सर्वदूर एकच पर्यटन धोरण, त्यासाठीचे नियम असणे अधिक सोयीचे ठरेल.४. सरकारी कर्मचाऱ्यांनी जर एलटीसी घेतली, एका वर्षात दोनदा देशांतर्गत पर्यटन केलं तर त्यांनाही त्या खर्चावर काही करसवलत देण्यात यावी, त्यातूनही देशांतर्गत पर्यटनाला चालना मिळेल.५. पर्यटन व्यवसायासाठी कर रचना अधिक सुलभ करायला हवी, पर्यटन हा काही संघटित क्षेत्रातला व्यवसाय नाही त्यामुळे हा उद्योग संघटित क्षेत्रात कसा करता येईल याचाही नव्या पर्यटन धोरणात आणि कोविडनंतरच्या न्यू नॉर्मल काळात विचार व्हायला हवा. ६. देशांतर्गत पर्यटन व्यवसाय वाढीच्या अनेक शक्यता आहेत, कोविड काळानंतर आता विदेश प्रवास मर्यादित असताना देशांतर्गत पर्यटन वाढीस पूरक-पोषक अर्थसंकल्पाची यंदा अपेक्षा आहे. त्याचा लाभ पर्यटनासह हॉटेल आणि आतिथ्य (हॉस्पिटॅलिटी) व्यवसायाला मिळून जलद रोजगार निर्मितीसाठीही होऊ शकेल.

टॅग्स :tourismपर्यटनIndiaभारतbudget 2021बजेट 2021