शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

Budget 2020 : वित्तमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानांची दखल न घेणे खेदजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 11:52 IST

या अर्थसंकल्पाला १० पैकी किती गुण द्यावेत, असा प्रश्न असेल तेव्हा त्याने दहापैकी एक आणि शून्य गुण मिळवले आहेत.

 - पी. चिदंबरम(माजी केंद्रीय अर्थमंत्रीव काँग्रेसचे ज्येष्ठ नेते)अर्थसंकल्पाने १० पैकी शून्य गुण मिळवले आहेत. मोदी सरकारने अर्थव्यवस्थेला चेतना देणे, विकासाला गती देणे आणि रोजगारनिर्मिती सोडून दिली आहे. अर्थव्यवस्थेसमोर गंभीर स्वरूपाचे आव्हान उभे असल्याचे सरकार सपशेल नाकारत आहे आणि २०२०-२०२१ वर्षात अर्थव्यवस्था जिवंत होईल यावर विश्वास ठेवावा, असे काहीही या अर्थसंकल्पात नाही. पुढील वर्षी सहा ते साडेसहा टक्के विकास दर असेल हा दावा ही चकित करणाराच नाही तर बेजबाबदार आहे. अर्थसंकल्पाला १० पैकी किती गुण द्यावेत, असा प्रश्न असेल तेव्हा त्याने दहापैकी एक आणि शून्य गुण मिळवले आहेत. त्या दोन्हींपैकी एक निवडावा लागेल. सरकारचा सुधारणांवर विश्वास नाही आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुधारणांची प्रत्येक कल्पना आर्थिक पाहणीत फेटाळून लावल्यामुळे सरकारचा संरचना सुधारणांवरही विश्वास नाही. अर्थमंत्र्यांनी आर्थिक पाहणी वाचली का आणि अर्थसंकल्पाच्या भाषणातील आशयाशी मुख्य आर्थिक सल्लागाराचा काही संबंध आहे का याचे उत्तर नाही असेच आहे. अर्थसंकल्पाच्या भाषणात अनेक कल्पना, विभाग आणि कार्यक्रम असून ते ऐकणारा संभ्रमात पडतो व त्याची मती कुंठित होते. अर्थसंकल्प म्हणजे जुन्या कार्यक्रमाची इस्त्री करून आणलेली ही यादी होती. मला तर ही खात्री आहे की, अगदी भाजपचा निष्ठावंत खासदार किंवा पाठीराख्यालादेखील अर्थसंकल्पावरील भाषणातील कोणतेही विधान आणि कल्पना समजली असेल आणि तो ती लोकांपर्यंत पोहोचवेल, असे मला वाटत नाही.एकीकडे सध्या चालू असलेल्या योजना, कार्यक्रम अपयशी ठरले असताना त्यात पुन्हा पैसा ओतून काय हशील होणार? अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन किंवा आर्थिक वृद्धीला गती देण्याची, खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याची किंवा रोजगार निर्माण करण्यासह कार्यक्षमता वाढविण्याची व जागतिक व्यापारात मोठी हिस्सेदारी प्राप्त करण्याची आशाच सरकारने सोडली आहे.भारतीय अर्थव्यवस्थेत मागणी घटली असून गुंतवणुकीचा ओघही आटला, असे असताना वित्त मंत्र्यांनी या आव्हानांची दखलच घेतलेली नाही. हे खेदजनक आहे. अन्नधान्य आणि खतांवरील सबसिडीत घट करण्यात आलेली असताना हा अर्थसंकल्प समाजाची काळजी घेणार आहे, असे कसे म्हणता येईल? कृती करण्याऐवजी उगाच सामाजिक काळजीच्या गोष्टी करण्यासारखा हा प्रकार आहे. नवीन कर सनद आणण्याचे प्रयोजन काय? एकूण देशभरात असा संदेश गेलेला आहे की, या सरकारसाठी तपासाचे अधिकार असणारे प्रत्येक विभाग, खाते जुलूम जबरदस्तीचे, खंडणीचे आणि छळण्याचे साधनच आहे.

टॅग्स :budget 2020बजेटP. Chidambaramपी. चिदंबरमbudget expert speaksबजेट तज्ञांचा सल्ला