शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
3
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
4
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
5
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
6
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
7
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
8
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
9
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
10
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
11
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
12
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
13
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
14
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
15
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
16
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
17
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
18
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
19
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
20
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड

Budget 2020 : वित्तमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानांची दखल न घेणे खेदजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 11:52 IST

या अर्थसंकल्पाला १० पैकी किती गुण द्यावेत, असा प्रश्न असेल तेव्हा त्याने दहापैकी एक आणि शून्य गुण मिळवले आहेत.

 - पी. चिदंबरम(माजी केंद्रीय अर्थमंत्रीव काँग्रेसचे ज्येष्ठ नेते)अर्थसंकल्पाने १० पैकी शून्य गुण मिळवले आहेत. मोदी सरकारने अर्थव्यवस्थेला चेतना देणे, विकासाला गती देणे आणि रोजगारनिर्मिती सोडून दिली आहे. अर्थव्यवस्थेसमोर गंभीर स्वरूपाचे आव्हान उभे असल्याचे सरकार सपशेल नाकारत आहे आणि २०२०-२०२१ वर्षात अर्थव्यवस्था जिवंत होईल यावर विश्वास ठेवावा, असे काहीही या अर्थसंकल्पात नाही. पुढील वर्षी सहा ते साडेसहा टक्के विकास दर असेल हा दावा ही चकित करणाराच नाही तर बेजबाबदार आहे. अर्थसंकल्पाला १० पैकी किती गुण द्यावेत, असा प्रश्न असेल तेव्हा त्याने दहापैकी एक आणि शून्य गुण मिळवले आहेत. त्या दोन्हींपैकी एक निवडावा लागेल. सरकारचा सुधारणांवर विश्वास नाही आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुधारणांची प्रत्येक कल्पना आर्थिक पाहणीत फेटाळून लावल्यामुळे सरकारचा संरचना सुधारणांवरही विश्वास नाही. अर्थमंत्र्यांनी आर्थिक पाहणी वाचली का आणि अर्थसंकल्पाच्या भाषणातील आशयाशी मुख्य आर्थिक सल्लागाराचा काही संबंध आहे का याचे उत्तर नाही असेच आहे. अर्थसंकल्पाच्या भाषणात अनेक कल्पना, विभाग आणि कार्यक्रम असून ते ऐकणारा संभ्रमात पडतो व त्याची मती कुंठित होते. अर्थसंकल्प म्हणजे जुन्या कार्यक्रमाची इस्त्री करून आणलेली ही यादी होती. मला तर ही खात्री आहे की, अगदी भाजपचा निष्ठावंत खासदार किंवा पाठीराख्यालादेखील अर्थसंकल्पावरील भाषणातील कोणतेही विधान आणि कल्पना समजली असेल आणि तो ती लोकांपर्यंत पोहोचवेल, असे मला वाटत नाही.एकीकडे सध्या चालू असलेल्या योजना, कार्यक्रम अपयशी ठरले असताना त्यात पुन्हा पैसा ओतून काय हशील होणार? अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन किंवा आर्थिक वृद्धीला गती देण्याची, खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याची किंवा रोजगार निर्माण करण्यासह कार्यक्षमता वाढविण्याची व जागतिक व्यापारात मोठी हिस्सेदारी प्राप्त करण्याची आशाच सरकारने सोडली आहे.भारतीय अर्थव्यवस्थेत मागणी घटली असून गुंतवणुकीचा ओघही आटला, असे असताना वित्त मंत्र्यांनी या आव्हानांची दखलच घेतलेली नाही. हे खेदजनक आहे. अन्नधान्य आणि खतांवरील सबसिडीत घट करण्यात आलेली असताना हा अर्थसंकल्प समाजाची काळजी घेणार आहे, असे कसे म्हणता येईल? कृती करण्याऐवजी उगाच सामाजिक काळजीच्या गोष्टी करण्यासारखा हा प्रकार आहे. नवीन कर सनद आणण्याचे प्रयोजन काय? एकूण देशभरात असा संदेश गेलेला आहे की, या सरकारसाठी तपासाचे अधिकार असणारे प्रत्येक विभाग, खाते जुलूम जबरदस्तीचे, खंडणीचे आणि छळण्याचे साधनच आहे.

टॅग्स :budget 2020बजेटP. Chidambaramपी. चिदंबरमbudget expert speaksबजेट तज्ञांचा सल्ला