शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
3
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
4
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
5
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
6
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
7
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
8
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
9
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
10
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
11
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
12
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
13
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
14
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
15
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
16
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
17
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
18
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
19
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
20
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड

Budget 2020 : गाव, गरीब, मजूर आणि शेतकऱ्यांचा विचार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 12:31 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ ट्रिलियन इकॉनॉमीचे जे स्वप्न पाहिले आहे, त्याचेच प्रतिबिंब अर्थसंकल्पात उमटले आहे.

- नितीन गडकरी

(केंद्रीय परिवहनमंत्री)

एमएसएमई क्षेत्राचा विकासदर ९ टक्के आहे. आम्ही आता निर्यात ४८ वरून ६० टक्क्यांवर नेऊ . गेल्या पाच वर्षांत ११ कोटी रोजगार निर्माण केले. येत्या आर्थिक वर्षात ५ कोटी रोजगार निर्मितीचे लक्ष्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ ट्रिलियन इकॉनॉमीचे जे स्वप्न पाहिले आहे, त्याचेच प्रतिबिंब अर्थसंकल्पात उमटले आहे. पायाभूत क्षेत्राला प्राधान्य मिळाले. माझ्या विभागासाठीही ९ हजार कोटी रुपयांची वाढ करण्यात आली.

प्रामुख्याने एक्स्प्रेस हायवे नेटवर्कची सुरुवात झाली. मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस हायवे आम्ही येणाºया काळात पूर्ण करू. पायाभूत सुविधांमुळे रोजगारनिर्मिती होईल. हवाई, जल वाहतूक, रेल्वे, रस्त्यांचा नवा विचार केला आहे. २०१४ साली पहिल्यांदा सत्ता स्थापन झाली तेव्हा या मंत्रालयासाठी (रस्ते व परिवहन) ३१ हजार कोटी रुपयांची तरतूद होती. आज हा आकडा ९१ हजार कोटी रुपयांवर गेला आहे.

देशाच्या विकासात एमएसएमईचे २९ टक्के योगदान आहे. त्यात ग्रामीण उद्योगाला जास्त प्राधान्य मिळते. त्यासाठी ७०११ कोटी रुपयांची तरतूद होती. यंदा ती ७,५७२ कोटी रुपयांची आहे. टीआरडीएमुळे एमएसएमईला खूप फायदा होईल. रिस्ट्रक्चरिंगचाही मोठा लाभ मिळेल. ‘अ‍ॅप बेस्ड फायनान्शिअल इनव्हॉईस’ हाही क्रांतिकारी निर्णय आहे. लालफितीचा कारभार त्यामुळे संपेल. लघुउद्योगांसाठी टॅक्स ऑडिटची मर्यादा १ कोटींवरून पाच कोटींवर नेल्याने मोठा दिलासा ‘एमएसएमई’ला मिळाला आहे.

फर्निचर व चमड्यांवरील कस्टम ड्यूटी वाढल्याचा मोठा फायदा देशातील लघुउद्योगांना होईल. फूटवेअर व फर्निचरच्या कस्टम ड्यूटीत वाढ केली. फूटवेअर इंडस्ट्रीत १ लाख ४५ हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. त्यापैकी भारतात ८३ हजार कोटी वापरले जातात. ५० हजार कोटी रुपयांची उलाढाल निर्यातीद्वारे होते. भारतात फूटवेअर, लेदर इंडस्ट्री खूप विस्तारली आहे. चीनमधून मोठ्या प्रमाणावर त्यासाठी साहित्य भारतात येते. उदबत्तीवरील कस्टम ड्यूटी वाढविली होती, तेव्हा देशातील या उद्योगास चार हजार कोटींचा लाभ झाला. बूट, चप्पल, फर्निचरवरील कस्टम ड्यूटी वाढल्याचा मोठा फायदा आताही होईल.

एमएसएमई क्षेत्राचा विकासदर ९ टक्के आहे. आम्ही आता निर्यात ४८ वरून ६० टक्क्यांवर नेऊ . गेल्या पाच वर्षांत ११ कोटी रोजगार निर्माण केले. येत्या आर्थिक वर्षात ५ कोटी रोजगार निर्मितीचे लक्ष्य आहे. ग्रामीण उद्योगांची उलाढाल ८५ हजार कोटी रुपयांची होती. ती १ लाख कोटींवर गेली आहे. पुढच्या पाच वर्षांत ५ लाख कोटींची उलाढाल करण्याचा प्रयत्न करू. जिल्हानिहाय निर्यातीचा विचार पहिल्यांदा झाला. लोकांची खरेदीची क्षमता व उत्पादन क्षमता वाढेल. त्यातूनच रोजगार निर्मिती होईल. गाव, गरीब, मजूर व शेतकऱ्यांचा विचार करणारा हा अत्यंत संतुलित अर्थसंकल्प आहे.

टॅग्स :budget 2020बजेटbudget expert speaksबजेट तज्ञांचा सल्लाNitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन