शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2020 : गाव, गरीब, मजूर आणि शेतकऱ्यांचा विचार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 12:31 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ ट्रिलियन इकॉनॉमीचे जे स्वप्न पाहिले आहे, त्याचेच प्रतिबिंब अर्थसंकल्पात उमटले आहे.

- नितीन गडकरी

(केंद्रीय परिवहनमंत्री)

एमएसएमई क्षेत्राचा विकासदर ९ टक्के आहे. आम्ही आता निर्यात ४८ वरून ६० टक्क्यांवर नेऊ . गेल्या पाच वर्षांत ११ कोटी रोजगार निर्माण केले. येत्या आर्थिक वर्षात ५ कोटी रोजगार निर्मितीचे लक्ष्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ ट्रिलियन इकॉनॉमीचे जे स्वप्न पाहिले आहे, त्याचेच प्रतिबिंब अर्थसंकल्पात उमटले आहे. पायाभूत क्षेत्राला प्राधान्य मिळाले. माझ्या विभागासाठीही ९ हजार कोटी रुपयांची वाढ करण्यात आली.

प्रामुख्याने एक्स्प्रेस हायवे नेटवर्कची सुरुवात झाली. मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस हायवे आम्ही येणाºया काळात पूर्ण करू. पायाभूत सुविधांमुळे रोजगारनिर्मिती होईल. हवाई, जल वाहतूक, रेल्वे, रस्त्यांचा नवा विचार केला आहे. २०१४ साली पहिल्यांदा सत्ता स्थापन झाली तेव्हा या मंत्रालयासाठी (रस्ते व परिवहन) ३१ हजार कोटी रुपयांची तरतूद होती. आज हा आकडा ९१ हजार कोटी रुपयांवर गेला आहे.

देशाच्या विकासात एमएसएमईचे २९ टक्के योगदान आहे. त्यात ग्रामीण उद्योगाला जास्त प्राधान्य मिळते. त्यासाठी ७०११ कोटी रुपयांची तरतूद होती. यंदा ती ७,५७२ कोटी रुपयांची आहे. टीआरडीएमुळे एमएसएमईला खूप फायदा होईल. रिस्ट्रक्चरिंगचाही मोठा लाभ मिळेल. ‘अ‍ॅप बेस्ड फायनान्शिअल इनव्हॉईस’ हाही क्रांतिकारी निर्णय आहे. लालफितीचा कारभार त्यामुळे संपेल. लघुउद्योगांसाठी टॅक्स ऑडिटची मर्यादा १ कोटींवरून पाच कोटींवर नेल्याने मोठा दिलासा ‘एमएसएमई’ला मिळाला आहे.

फर्निचर व चमड्यांवरील कस्टम ड्यूटी वाढल्याचा मोठा फायदा देशातील लघुउद्योगांना होईल. फूटवेअर व फर्निचरच्या कस्टम ड्यूटीत वाढ केली. फूटवेअर इंडस्ट्रीत १ लाख ४५ हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. त्यापैकी भारतात ८३ हजार कोटी वापरले जातात. ५० हजार कोटी रुपयांची उलाढाल निर्यातीद्वारे होते. भारतात फूटवेअर, लेदर इंडस्ट्री खूप विस्तारली आहे. चीनमधून मोठ्या प्रमाणावर त्यासाठी साहित्य भारतात येते. उदबत्तीवरील कस्टम ड्यूटी वाढविली होती, तेव्हा देशातील या उद्योगास चार हजार कोटींचा लाभ झाला. बूट, चप्पल, फर्निचरवरील कस्टम ड्यूटी वाढल्याचा मोठा फायदा आताही होईल.

एमएसएमई क्षेत्राचा विकासदर ९ टक्के आहे. आम्ही आता निर्यात ४८ वरून ६० टक्क्यांवर नेऊ . गेल्या पाच वर्षांत ११ कोटी रोजगार निर्माण केले. येत्या आर्थिक वर्षात ५ कोटी रोजगार निर्मितीचे लक्ष्य आहे. ग्रामीण उद्योगांची उलाढाल ८५ हजार कोटी रुपयांची होती. ती १ लाख कोटींवर गेली आहे. पुढच्या पाच वर्षांत ५ लाख कोटींची उलाढाल करण्याचा प्रयत्न करू. जिल्हानिहाय निर्यातीचा विचार पहिल्यांदा झाला. लोकांची खरेदीची क्षमता व उत्पादन क्षमता वाढेल. त्यातूनच रोजगार निर्मिती होईल. गाव, गरीब, मजूर व शेतकऱ्यांचा विचार करणारा हा अत्यंत संतुलित अर्थसंकल्प आहे.

टॅग्स :budget 2020बजेटbudget expert speaksबजेट तज्ञांचा सल्लाNitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन