शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Budget 2020 : सरकारकडून देशाच्या भूषणावह संस्था विकण्याचा घाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 11:26 IST

अर्थसंकल्पातील वित्तीय तूट दिवसेंदिवस वाढत आहे. ती कमी करण्यासाठी एलआयसीच्या निर्गुंतवणुकीतून पैसा उभारला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारचे हे धोरण देशाच्या विकासाला बाधक ठरणारे आहे.

- अधीर रंजन चौधरी(काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते)गेल्या ७० वर्षांपासून देशाच्या आर्थिक विकासात भर टाकणाऱ्या देशाच्या भूषणावह संस्था विकण्याचा सपाटा या सरकारने लावला आहे. या अर्थसंकल्पात आयुर्विमा महामंडळाचे निर्गुंतवणूक करण्याच्या सूतोवाचाने या सरकारचे धोरण स्पष्ट झाले आहे.पंडित जवाहरलाल नेहरू व पहिले अर्थमंत्री सी.डी. देशमुख यांच्या संकल्पनेतून आयुर्विमा महामंडळाची निर्मिती झाली होती. या आयुर्विमा महामंडळात देशातील सर्वसामान्य माणसांच्या श्रमाचा पैसा गुंतलेला आहे. या गुंतवणुकीमुळे एलआयसी संस्था देशाची गौरवास्पद संस्था म्हणून नावारूपाला आली. या संस्थेवर घाला घालण्याचा प्रयत्न या सरकारने चालविला आहे. यापूर्वी देशाच्या अशाच संस्था या सरकारने मोडीत काढल्या आहेत. बीएसएनएलवर अशाच प्रकारे हातोडा मारण्यात आला आहे. आयुर्विमा महामंडळाची देशाच्या विकासात मोठी भूमिका आहे. करोडो लोकांची गुंतवणूक या महामंडळात झालेली असताना केवळ खासगी इन्शुरन्स कंपन्यांना फायदा पोहोचविण्यासाठी सरकार एलआयसीचे निर्गंुतवणूक करून गौरवास्पद संस्थांचा कणा मोडण्याचे काम करीत आहे.अर्थसंकल्पातील वित्तीय तूट भरून काढण्यासाठी या गौरवास्पद संस्था विकण्याचा घाट या सरकारने घातला आहे. अर्थसंकल्पातील वित्तीय तूट दिवसेंदिवस वाढत आहे. ही वित्तीय तूट कमी करण्यासाठी एलआयसीच्या निर्गुंतवणुकीतून पैसा उभारला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारचे हे धोरण देशाच्या विकासाला बाधक ठरणारे आहे.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य माणसांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कोणतीही तरतूद नाही. या अर्थसंकल्पात कोणताही नवा विचार दिलेला नाही. केवळ काही चांगले करू, असे म्हणून विकास होत नाही. काही चांगले करण्यासाठी कृतीची आवश्यकता असते. ही कृती या अर्थसंकल्पातून स्पष्ट होत नाही. देशाच्या आर्थिक पाहणी अहवालातून केंद्रीय अर्थमंत्र्यांनी थालीनॉमिक्सची संकल्पना मांडली आहे; परंतु ‘थाली’ खरेदी करण्यासाठी लोकांचे खिसे मात्र ‘खाली’ आहेत. केवळ लांबलचक भाषण करून समस्यांचे निराकरण होत नाही. या अर्थसंकल्पातून सरकारच्या धोरणाची कोणतीही दिशा स्पष्ट झालेली नाही. अर्थसंकल्प मांडत असतानाच शेअर बाजार ज्या प्रकारे गडगडला, त्यावरून या सरकारच्या अर्थसंकल्पाचे खरे रूप स्पष्ट झालेआहे.

टॅग्स :budget 2020बजेटcongressकाँग्रेसbudget expert speaksबजेट तज्ञांचा सल्ला