शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2018 : स्थितीवादी अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 00:46 IST

निश्चलनीकरणानंतर अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांत (उदा. उत्पादन क्षेत्र, सेवा क्षेत्र, किरकोळ क्षेत्र) आलेली अवरुद्धता व त्यामुळे एकूण अर्थव्यवस्थेत आलेली ग्लानी दूर करण्यासाठी सरकारकडून काही ठोस उपाय अपेक्षित होते. दुसरीकडे अर्थसंकल्पातील वाढती तूट आणि त्यामुळे होणारी चलनवाढ - भाववाढ या प्रश्नाला सरकारने हात घालणे अपेक्षित होते.

- देविदास तुळजापूरकर(जॉइंट सेक्रेटरी, आॅल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन)निश्चलनीकरणानंतर अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांत (उदा. उत्पादन क्षेत्र, सेवा क्षेत्र, किरकोळ क्षेत्र) आलेली अवरुद्धता व त्यामुळे एकूण अर्थव्यवस्थेत आलेली ग्लानी दूर करण्यासाठी सरकारकडून काही ठोस उपाय अपेक्षित होते. दुसरीकडे अर्थसंकल्पातील वाढती तूट आणि त्यामुळे होणारी चलनवाढ - भाववाढ या प्रश्नाला सरकारने हात घालणे अपेक्षित होते. कारण भाववाढीमुळे असंघटित क्षेत्रातील कामगार व ज्याचे हातावर पोट अवलंबून आहे असा सामान्य माणूसच भरडला जातो, या अर्थसंकल्पात त्या प्रश्नाला पूर्णत: बगल दिली आहे. वाढती आर्थिक विषमता, वाढती बेरोजगारी या दिशेने सरकारने कुठलेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे अर्थव्यवस्थेला मागे नेणारा असा हा स्थितीवादी जैसे थे अर्थसंकल्प आहे.पराकोटीची आर्थिक विषमता असल्याच्या काळात मात करायची झाली तर श्रीमंतांच्या खिशात हात घालून पैसा बाहेर काढून तो गरिबाच्या खिशात टाकला तरच हे शक्य आहे. पण श्रीमंतांना नाराज कोण करणार आणि सत्तेत राहायचे असेल तर ते परवडेल कसे? दुसरा मोठा प्रश्न आहे रोजगारनिर्मितीचा. यासाठी उत्पादन क्षेत्राला उभारी यायला हवी, ज्यात भारतातील उत्पादन क्षेत्र चीनच्या स्पर्धेत टिकाव कसा धरेल? यासाठी सरकारचा हस्तक्षेप हवा, पण सरकार तसे करताना दिसत नाही. शेती क्षेत्राचे पुनरुज्जीवन झाले तर रोजगार शेतीत टिकेल, पण त्यासाठी सर्वांगीण उपाययोजना व्हायला हवी. स्वामिनाथन समितीच्या सर्वांगीण शिफारशीची एकत्रित अंमलबजावणी केली जावी, पण सरकारचा दृष्टिकोन आजचा दिवस उद्यावर ढकला असाच आहे. किमान आधारभूत किंमत या प्रश्नाला सरकारने हात घातला आहे; पण यामुळे एकूण प्रश्नाचे निराकरण होत नाही. शेतीला दिल्या जाणाºया कर्जात दरवर्षी वाढ करण्यात येते; तशी याही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे, पण हे कर्ज वाटणार कोण? ग्रामीण पतपुरवठा व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. जिल्हा सहकारी बँका दिवाळखोरीत निघाल्या आहेत. प्रादेशिक ग्रामीण बँका कमकुवत झाल्या आहेत आणि व्यापारी बँका ग्रामीण भागातून काढता पाय घेत आहेत. याची जागा बिगर बँकिंग वित्तीय संस्था मायक्रो क्रेडिट संस्था म्हणजे आधुनिक सावकार घेत आहे, जे शेतकºयांना नडल्याशिवाय राहणार आहेत का? या पार्श्वभूमीवर शेतीचे पुनरुज्जीवन कसे होणार?निश्चलनीकरणानंतर मोठ्या प्रमाणावर लोकांचा काळा पैसा अर्थव्यवस्थेत आला, ज्यावर आता कर लागू होईल आणि यामुळेच मध्यमवर्गाला असे वाटत होते की या अर्थसंकल्पात आयकरासाठीच्या कररचनेत सूट मिळेल. पण याबाबत घोर निराशा झाली आणि तीदेखील निवडणुकीकडे वाटचाल करणाºया अर्थसंकल्पात. हाच तो बोलघेवडा वर्ग आहे ज्याने या सरकारला निवडून दिले आहे. सरकारचे हे दु:साहसच म्हणायला हवे. म्हणूनच हा अर्थसंकल्प स्थितीवादी आहे, वरपांगी आहे. सकृतदर्शनी समाजाच्या विविध घटकांना कुरवाळणारा, फिल गुडचा आभास निर्माण करणारा आहे. याच फिल गुडने याच सरकारचा इतिहासात घात केला होता.

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८Budgetअर्थसंकल्पArun Jaitleyअरूण जेटली