शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

संघाचा व्यापक दृष्टिकोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 06:45 IST

अलीकडच्या काळात काही घटना अन् सरसंघचालकांची सूचक विधाने यांचे बारकाईने अवलोकन केले, तर संघामध्ये केवळ गणवेशाचेच नव्हे, तर वैचारिक परिवर्तनही घडत असल्याची किंचितशी प्रचिती येते.

विज्ञान भवनात ‘भविष्यातला भारत अन् रा.स्व.संघाचा दृष्टिकोन’ हा विषय केंद्रस्थानी ठेवून, रा.स्व.संघाचे ३ दिवसांचे वैचारिक मंथन दिल्लीत सुरू आहे. सरसंघचालक मोहनराव भागवतांनी आपल्या भाषणात पहिल्याच दिवशी काँग्रेसचा गौरवपूर्ण उल्लेख केला. भागवतांचे काँग्रेसबद्दलचे प्रशंसोद्गार ही संघाला झालेली वैचारिक उपरती की, भारताच्या वैचारिक जडणघडणीत ज्यांचे स्थान कायम अविभाज्य राहिले, त्या महात्मा गांधी व पंडित नेहरूंच्या विचारांना, संघाच्या व्यासपीठावरून वर्षानुवर्षे कडाडून विरोध केल्याचे पापक्षालन? नेमके कारण काय, याचा खुलासा भागवतच करू शकतील. लोकमान्य टिळकांच्या प्रभावामुळे संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार १९२0 च्या सुमारास काँग्रेस चळवळीत क्रियाशील होते. स्वातंत्र्य मिळण्याच्या २५ वर्षे आधी काँग्रेस चळवळीचा मार्ग सोडून त्यांनी वेगळी वाट धरली. हिंदू राष्ट्रवादाचा पुरस्कार करीत, हेडगेवारांनी २७ सप्टेंबर १९२५ रोजी रा. स्व. संघाची स्थापना केली. पुढल्या सप्ताहात स्थापनेची ९३ वर्षे पूर्ण करून संघ ९४व्या वर्षात पदार्पण करणार आहे. या निमित्ताने बऱ्याच उशिराने का होईना, सरसंघचालक भागवतांना स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेसच्या अलौकिक योगदानाचे महत्त्व जाहीरपणे सांगावेसे वाटले, त्याबद्दल ते नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत. आजवरचा इतिहास पाहिला, तर वैचारिक स्पष्टता अन् पारदर्शकतेचे संघाला वावडेच आहे. संघाच्या अवतीभवती वैचारिक धुक्याचे प्रमाण जितके अधिक, तितके वास्तवापासून संघाला नामानिराळे ठेवणे सोयीचे, असा संघाचा आजवरचा पवित्रा आहे. म्हणूनच भाजपाच्या प्रत्येक कृतीशी संघाला जोडले जाऊ नये, असा कायम अट्टाहास असतो. संघाला सांस्कृतिक संघटनेच्या मखरात त्यासाठीच ठेवण्यात आले. तरीही देशात कोणतीही निवडणूक आली की, भाजपाच्या विजयासाठी संघाचे हजारो कार्यकर्ते मैदानात उतरल्याच्या बातम्या झळकू लागतात. संघाने या बातम्यांचे कधीही खंडन केल्याचे दिसले नाही. देशासमोर आपली भूमिका स्पष्टपणे मांडण्यात यापुढे संघ कधीही कचरणार नाही, असा पक्का निर्धार सरसंघचालकांनी केलेला दिसतो. इतकेच नव्हे, तर केंद्र सरकार व भाजपापेक्षा संघाची शक्ती कितीतरी विशाल आहे. भाजपाचे सारे राजकारण आणि धोरण यावर संघाचेच अधिपत्य आहे, याची स्पष्ट जाणीवही पंतप्रधान मोदी अन् पक्षाध्यक्ष अमित शहांना भागवत बहुदा करून देऊ इच्छितात. ‘काँग्रेसमुक्त भारत’ या मोदी-शहांच्या घोषणेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, असे राजकीय वाक्प्रचार ही संघाची संस्कृती नाही, असे मध्यंतरी भागवतांनी सुनावलेच होते. अलीकडच्या काळात काही घटना अन् सरसंघचालकांची सूचक विधाने यांचे बारकाईने अवलोकन केले, तर संघामध्ये केवळ गणवेशाचेच नव्हे, तर वैचारिक परिवर्तनही घडत असल्याची किंचितशी प्रचिती येते. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचे भाषण संघाच्या नागपूरच्या मुख्यालयात आयोजित करून त्याचा पूर्वार्ध झाला. संघाने आपला दृष्टिकोन अन् पवित्रा खरोखर व्यापक करण्याचे मनापासून ठरविले असेल, तर केवळ हिंदुत्वाचा पुरस्कार करून संघाला व्यापक होता येणार नाही. नोटाबंदीसारख्या प्रयोगांद्वारे देशाच्या अर्थकारणात जी संकटे निर्माण झाली, त्याबद्दल संघाची भूमिका काय? बेरोजगारीची समस्या, संधीची समानता अन् आरक्षण याबाबत संघाचा दृष्टिकोन काय? अशा विषयांबाबतही संघाने स्पष्टपणे आपली भूमिका मांडणे गरजेचे आहे. लक्ष्य समान असले, तरी संघपरिवाराच्या अनेक शाखा आपापले मार्ग निवडून स्वतंत्रपणे कार्य करीत असतात. बजरंग दल अथवा विहिंपच्या टोकाच्या भूमिकांमुळे जर देशात कुठे हिंसाचार घडला, तर त्याची जबाबदारी संघाने घेतल्याचे कधीच दिसले नाही. संघाला यापुढे अशा घटनांपासून स्वत:ला नामानिराळे ठेवता येणार नाही. व्यापकतेचा विचार बोलणे सोपे, मात्र त्याचे अनुसरण अवघड असते. दिल्लीच्या मंथनात व्यापकतेचा हा विचार संघात कितपत रुजतो, ते पाहायचे.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRSS Headquartersराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीMohan Bhagwatमोहन भागवतcongressकाँग्रेस