शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

‘धनुष्य’वाल्यांची अ‍ॅलर्जी

By सचिन जवळकोटे | Updated: March 15, 2018 00:17 IST

गेल्या काही दिवसांपासून ‘मातोश्री’वर प्रचंड अस्वस्थता पसरलेली. चार वर्षांत अशोकराव नांदेडकर अन् पृथ्वीबाबा क-हाडकर यांचेही चेहरे एवढे कधी सुकले नसतील, एवढ्या वेदना ‘मातोश्री’वरील लाल बत्तीवाल्या सरदारांच्या तोंडावर दिसू लागलेल्या.

गेल्या काही दिवसांपासून ‘मातोश्री’वर प्रचंड अस्वस्थता पसरलेली. चार वर्षांत अशोकराव नांदेडकर अन् पृथ्वीबाबा क-हाडकर यांचेही चेहरे एवढे कधी सुकले नसतील, एवढ्या वेदना ‘मातोश्री’वरील लाल बत्तीवाल्या सरदारांच्या तोंडावर दिसू लागलेल्या. अनेकांचं वजन अकस्मातपणे घटत चाललेलं. भल्या-भल्यांची नाडी ओळखण्यात माहीर असलेल्या मिलिंदालाही म्हणे या दुखण्याचं मूळ सापडेनासं झालेलं.पाठीमागं हात बांधून विमनस्क अवस्थेत येरझाऱ्या घालणाºया उद्धोंनी हाक मारताच सुरुवातीला रडत-खडत रामदास भाई आले. महाबळेश्वरला साहेबांना कानठळ्या बसताच एका क्षणात भलं-मोठं हॉटेल बंद करताना त्यांनी जो उत्साह दाखविला होता, त्याच्या दहा टक्केही एनर्जी या क्षणी त्यांच्यात कुठं दिसत नव्हता. त्यांच्या पाठोपाठ विस्कटलेली दाढी कुरवाळत एकनाथ भाईही आले. ‘तुम्ही सीएम् व्हाल,’ असा आशीर्वाद मनोहरपंतांनी देऊनही त्यांच्या चेहºयावर म्हणावा तसा आनंद दिसत नव्हता. सुभाषरावही नेहमीच्या गंभीर चेहºयानंच आले. ‘मातोश्री’वरच्या अनेक स्थित्यंतराचा अनुभव गाठीशी असल्यानं त्यांच्या चेहºयावरची रेषाही बदलली नसली तरी काहीतरी प्रॉब्लेम झालाय, हे कळत होतं.दिवाकररावही पाठीत वाकूनच आत आले. एसटीतल्या खासगीकरणाचा प्लॅन एवढा जड असू शकत नाही, हे माहीत असल्यानं त्यांच्याही दुखण्याचा कुणालाच शोध लागेना. त्यानंतर दीपक डॉक्टरही एखाद्या रुग्णासारखंच थकल्या अवस्थेत आले. सातारी अधिकाºयांना पुरंदरच्या निवासस्थानी बोलावून तेथून परजिल्ह्यावर कंट्रोल करू पाहणारे विजयबापूही केविलवाण्या चेहºयानंच प्रवेशले.या साºयांना वेगवेगळ्या स्पेशालिस्ट डॉक्टरांनी तपासलं. सारे रिपोर्ट नॉर्मल आल्यामुळं या साºयांचं दुखणं समजतच नव्हतं. उद्धोंची घालमेल वाढतच चाललेली. कुणीतरी मांत्रिकाचा उतारा देण्याचा सल्ला दिला. मात्र, नारायणदादांच्या लाल दिव्याचं भविष्य खोटं भरल्यापासून कोकणातले बहुतांश भगत म्हणे गायब झालेले.‘एकीकडं ओरडून ओरडून माझा घसा बसला तरी हरकत नाही; परंतु तुम्ही सारे व्यवस्थित खाऽऽ प्याऽऽ,’ असा सल्ला आपण आपल्या लाल बत्तीवाल्यांना देऊनही हे सारे खराब का होत चाललेत, याचं कोडं काही उद्धोंना सुटत नव्हतं. अनेक राजकीय तज्ज्ञही येऊन हात हालवत परतले. आता मात्र या घटनेची चर्चा सर्वत्र सुरू झाली. नितीनराव डोंबिवलीत बोलल्यानंतर जेवढा गदारोळ उडाला, त्याहीपेक्षा जास्त ‘धनुष्यवाल्यांचा अनामिक आजार’ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकारामुळं थोरले काका बारामतीकरही गोंधळले. चॅनेलवाल्यांसमोर धनंजय बीडकरांचं नाव घेण्याऐवजी धनंजय कोल्हापूरकरांचा उल्लेख करू लागले.पाहता-पाहता ही बातमी जगभरात पोहोचली. चंद्राबाबूंच्याही कानावर पडली. ते मात्र हळूच हसले. त्यांनी थेट उद्धोंना मोबाईल लावला... अन् या आजारामागचं खरं कारण सांगितलं, ‘गेल्या अनेक महिन्यांपासून तुमचे सारे सरदार खिशात राजीनाम्याचा कागद घेऊन फिरत असल्यानं त्याचं इन्फेक्शन झालंय. एक तर ही बुरशी लागलेली कागदं ताबडतोब कचरा कुंडीत फेकून द्या किंवा देवेंद्रपंतांकडं तरी पाठवा.’

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे