शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबाजारी शेतकऱ्याचा जोडधंद्याचा मंत्र उभारी देणारा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 03:58 IST

नापिकी तसेच पेरणी-लागवडीचा खर्चही वसूल न होणा-या बाजारभावामुळे मेटाकुटीस आलेले शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबत असताना, नाशिक जिल्ह्यातील एका कर्जबाजारी शेतक-याने निराश न होता स्वकृतीतून दिलेला जोडधंद्याचा मंत्र अन्य शेतकरीबांधवांसाठी निश्चितच उभारी देणारा म्हणावा लागेल.

- संजय वाघनापिकी तसेच पेरणी-लागवडीचा खर्चही वसूल न होणा-या बाजारभावामुळे मेटाकुटीस आलेले शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबत असताना, नाशिक जिल्ह्यातील एका कर्जबाजारी शेतक-याने निराश न होता स्वकृतीतून दिलेला जोडधंद्याचा मंत्र अन्य शेतकरीबांधवांसाठी निश्चितच उभारी देणारा म्हणावा लागेल.‘उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी’ असे म्हणण्याचे दिवस कधीच इतिहासजमा झालेत. एकवेळ अशी होती की, शेती व्यवसायाकडे सन्मानाने पाहिले जायचे. ती स्थिती आता राहिलेली नाही. शेती करणारा जीवनसाथी नाकारण्याइतपत मानसिकता हल्लीच्या युवतींची झाल्याचे दिसून येते. त्यास कारणेही तशीच आहेत. शेती हा बेभरवशाचा व्यवसाय झाला आहे. पिकले तर विकले जात नाही, आणि विकले तर पुरेसा भाव मिळत नाही. अशा अवस्थेत शेतकरी वर्ग कसा तग धरेल, हा खरा प्रश्न आहे. अतिवृष्टी, अनावृष्टी, गारपीट, अवकाळी पाऊस, पिकांवरील रोग, नापिकी तसेच उत्पादन खर्चही वसूल न होणे या कारणांमुळे व्यथित झालेल्या अनेक शेतकºयांनी कर्जाला वैतागून आत्महत्येची वाट धरली आहे. १९९५ ते २०१५ या २० वर्षांच्या कालावधीत देशातील सुमारे सव्वातीन लाख शेतकºयांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात असून, त्यातील ४५ टक्के प्रमाण एकट्या महाराष्टÑातील आहे. देश कृषिप्रधान असल्याचे मोठ्या गौरवाने केवळ म्हटले जाते, मात्र शेतकरीहिताचे निर्णय घेताना त्याची प्रचिती येत नाही. कर्जमाफी आणि हमीभाव या तशा जुन्याच मागण्या आहेत. या मागण्या मान्य केल्या तरी शेतकºयांच्या गळ्यातील फास बºयापैकी सैल झाल्यावाचून राहणार नाही. हे होईल तेव्हा होईल, परंतु पूर्णत: शासनाच्या भरवशावर अवलंबून न राहता आपल्या जगण्याचा मार्ग शेतकºयांनीच सुकर करण्याची वेळ आली आहे. केवळ कर्जापायी आपला लाखमोलाचा जीव झाडाला टांगून घेण्याइतपत टोकाची भूमिका घेण्यात नुकसान कुटुंबीयांचेच होणार आहे. कर्ज झाले म्हणून आत्महत्या करण्यापेक्षा कर्ज होणार नाही, याची काळजी घेतली तरी शेतकºयांचे आयुष्य वाढू शकेल. नेमका हाच धागा पकडून नाशिक जिल्ह्यातील खेरवाडी या छोट्याशा गावातील दिनकर वाकेराव संगमनेरे या अल्पभूधारक शेतकºयाने अन्य कर्जबाजारी शेतकºयांसमोर वेगळा असा आदर्श उभा केला आहे. त्यांच्याकडे तीन बिघे जमीन असून, शेतमालाला भाव नसल्यामुळे चार-पाच वर्षांत प्रपंचापोटी साडेसात लाखांचे कर्ज झाले. त्या कर्जामुळे वैफल्यग्रस्त अवस्थेत अप्रिय निर्णय न घेता त्यांनी जोडधंद्याचा विचार केला. मोटारसायकलीवर बेकरी पदार्थ घेऊन परिसरातील खेड्यापाड्यात विक्री सुरू केली. त्यास उत्तम प्रतिसादही लाभू लागला आहे. त्यांनी मोटारसायकलीच्या पाठीमागे एक फलक लावला आणि त्यावर लिहिले, ‘मी एक शेतकरी, कर्ज फेडण्यास असमर्थ म्हणून मी हताश नाही झालो. पोटाची खळगी भरण्याकरिता जसा व्यवसाय निवडला, त्याचप्रमाणे माझ्या असंख्य शेतकरी बांधवांना माझे हेच सांगणे आहे की, आपण कोणत्याही व्यवसायाबद्दलची संकल्पना मनात रुजवा आणि सुरुवात करा. परंतु चुकून आत्महत्या करू नका. माणूस म्हणून जगा आणि माणूस म्हणून जगू द्या.’ एका कर्जबाजारी शेतकºयाचा त्याच्याच जातकुळीतील शेतकºयांना फलकाद्वारे उभारी देणारा हा मंत्र निश्चितच वाखाणण्याजोगा असून, स्वावलंबी बनविणारा आहे. याच वाटेवरून चालण्याचा प्रयत्न जरी केला तरी आत्महत्येचा विचार कुणाच्याच मनाला शिवणार नाही.

टॅग्स :Farmerशेतकरी