शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
3
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
4
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
5
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
6
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
7
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
8
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
9
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
10
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
11
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
12
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
13
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
14
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
15
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
16
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
17
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
18
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
19
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
20
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबाजारी शेतकऱ्याचा जोडधंद्याचा मंत्र उभारी देणारा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 03:58 IST

नापिकी तसेच पेरणी-लागवडीचा खर्चही वसूल न होणा-या बाजारभावामुळे मेटाकुटीस आलेले शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबत असताना, नाशिक जिल्ह्यातील एका कर्जबाजारी शेतक-याने निराश न होता स्वकृतीतून दिलेला जोडधंद्याचा मंत्र अन्य शेतकरीबांधवांसाठी निश्चितच उभारी देणारा म्हणावा लागेल.

- संजय वाघनापिकी तसेच पेरणी-लागवडीचा खर्चही वसूल न होणा-या बाजारभावामुळे मेटाकुटीस आलेले शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबत असताना, नाशिक जिल्ह्यातील एका कर्जबाजारी शेतक-याने निराश न होता स्वकृतीतून दिलेला जोडधंद्याचा मंत्र अन्य शेतकरीबांधवांसाठी निश्चितच उभारी देणारा म्हणावा लागेल.‘उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी’ असे म्हणण्याचे दिवस कधीच इतिहासजमा झालेत. एकवेळ अशी होती की, शेती व्यवसायाकडे सन्मानाने पाहिले जायचे. ती स्थिती आता राहिलेली नाही. शेती करणारा जीवनसाथी नाकारण्याइतपत मानसिकता हल्लीच्या युवतींची झाल्याचे दिसून येते. त्यास कारणेही तशीच आहेत. शेती हा बेभरवशाचा व्यवसाय झाला आहे. पिकले तर विकले जात नाही, आणि विकले तर पुरेसा भाव मिळत नाही. अशा अवस्थेत शेतकरी वर्ग कसा तग धरेल, हा खरा प्रश्न आहे. अतिवृष्टी, अनावृष्टी, गारपीट, अवकाळी पाऊस, पिकांवरील रोग, नापिकी तसेच उत्पादन खर्चही वसूल न होणे या कारणांमुळे व्यथित झालेल्या अनेक शेतकºयांनी कर्जाला वैतागून आत्महत्येची वाट धरली आहे. १९९५ ते २०१५ या २० वर्षांच्या कालावधीत देशातील सुमारे सव्वातीन लाख शेतकºयांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात असून, त्यातील ४५ टक्के प्रमाण एकट्या महाराष्टÑातील आहे. देश कृषिप्रधान असल्याचे मोठ्या गौरवाने केवळ म्हटले जाते, मात्र शेतकरीहिताचे निर्णय घेताना त्याची प्रचिती येत नाही. कर्जमाफी आणि हमीभाव या तशा जुन्याच मागण्या आहेत. या मागण्या मान्य केल्या तरी शेतकºयांच्या गळ्यातील फास बºयापैकी सैल झाल्यावाचून राहणार नाही. हे होईल तेव्हा होईल, परंतु पूर्णत: शासनाच्या भरवशावर अवलंबून न राहता आपल्या जगण्याचा मार्ग शेतकºयांनीच सुकर करण्याची वेळ आली आहे. केवळ कर्जापायी आपला लाखमोलाचा जीव झाडाला टांगून घेण्याइतपत टोकाची भूमिका घेण्यात नुकसान कुटुंबीयांचेच होणार आहे. कर्ज झाले म्हणून आत्महत्या करण्यापेक्षा कर्ज होणार नाही, याची काळजी घेतली तरी शेतकºयांचे आयुष्य वाढू शकेल. नेमका हाच धागा पकडून नाशिक जिल्ह्यातील खेरवाडी या छोट्याशा गावातील दिनकर वाकेराव संगमनेरे या अल्पभूधारक शेतकºयाने अन्य कर्जबाजारी शेतकºयांसमोर वेगळा असा आदर्श उभा केला आहे. त्यांच्याकडे तीन बिघे जमीन असून, शेतमालाला भाव नसल्यामुळे चार-पाच वर्षांत प्रपंचापोटी साडेसात लाखांचे कर्ज झाले. त्या कर्जामुळे वैफल्यग्रस्त अवस्थेत अप्रिय निर्णय न घेता त्यांनी जोडधंद्याचा विचार केला. मोटारसायकलीवर बेकरी पदार्थ घेऊन परिसरातील खेड्यापाड्यात विक्री सुरू केली. त्यास उत्तम प्रतिसादही लाभू लागला आहे. त्यांनी मोटारसायकलीच्या पाठीमागे एक फलक लावला आणि त्यावर लिहिले, ‘मी एक शेतकरी, कर्ज फेडण्यास असमर्थ म्हणून मी हताश नाही झालो. पोटाची खळगी भरण्याकरिता जसा व्यवसाय निवडला, त्याचप्रमाणे माझ्या असंख्य शेतकरी बांधवांना माझे हेच सांगणे आहे की, आपण कोणत्याही व्यवसायाबद्दलची संकल्पना मनात रुजवा आणि सुरुवात करा. परंतु चुकून आत्महत्या करू नका. माणूस म्हणून जगा आणि माणूस म्हणून जगू द्या.’ एका कर्जबाजारी शेतकºयाचा त्याच्याच जातकुळीतील शेतकºयांना फलकाद्वारे उभारी देणारा हा मंत्र निश्चितच वाखाणण्याजोगा असून, स्वावलंबी बनविणारा आहे. याच वाटेवरून चालण्याचा प्रयत्न जरी केला तरी आत्महत्येचा विचार कुणाच्याच मनाला शिवणार नाही.

टॅग्स :Farmerशेतकरी