शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

भाजपचा ईशान्य विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:52 IST

उत्तर-पूर्वेकडील मेघालय, त्रिपुरा व नागालँड या तीन राज्यांपैकी त्रिपुरा व नागालँडमधील विधानसभेत बहुमत मिळवून भारतीय जनता पक्षाने आपल्या विजयाची मुहूर्तमेढ त्या प्रदेशात मजबूत बनविली आहे. नागालँड हे राज्य दीर्घकाळ काँग्रेसच्या ताब्यात राहिल्यानंतर मधली बरीच वर्षे तेथे प्रादेशिक पक्षांची सरकारे आली.

उत्तर-पूर्वेकडील मेघालय, त्रिपुरा व नागालँड या तीन राज्यांपैकी त्रिपुरा व नागालँडमधील विधानसभेत बहुमत मिळवून भारतीय जनता पक्षाने आपल्या विजयाची मुहूर्तमेढ त्या प्रदेशात मजबूत बनविली आहे. नागालँड हे राज्य दीर्घकाळ काँग्रेसच्या ताब्यात राहिल्यानंतर मधली बरीच वर्षे तेथे प्रादेशिक पक्षांची सरकारे आली. हे प्रादेशिक पक्ष प्रामुख्याने जमातींच्या आधारावर उभे राहिले होते. त्यांचा पराभव होणे व तेथे पुन: एकवार एका राष्ट्रीय पक्षाचे सरकार सत्तारूढ होणे ही एकात्म राष्ट्राच्या दिशेने महत्त्वाची व स्वागतार्ह ठरणारी बाब आहे. नागालँड हे तसेही कमालीचे अस्वस्थ व अशांत राज्य राहिले आहे. जमातींचे प्रमुख व राज्याचे सरकार यांच्यातील तौलनिक बळाच्या भरवशावरच तेथील राजकारण आपली वाटचाल करीत आले आहे. भाजपच्या विजयामुळे तेथे पुढील पाच वर्षे स्थिर सरकार राहू शकले तर ती देशाच्या मजबुतीच्या दृष्टीनेही महत्त्वाची बाब ठरेल. भाजपचा त्रिपुरामधील विजय मात्र सर्वांना धक्का देणारा व चकित करणारा ठरला आहे. माणिक सरकार यांच्या नेतृत्वातील तेथील डाव्या कम्युनिस्ट पक्षाचे सरकार कमालीचे लोकाभिमुख व भ्रष्टाचारमुक्त राहिले आहे. माणिक सरकार हे देशातील सर्वात गरीब मुख्यमंत्री म्हणून ख्याती पावलेले व आपल्या निवासस्थानापासून कार्यालयापर्यंत पायीच चालत जाणारे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांचे सरकार जेवढे लोकप्रिय तेवढेच स्थिरही होते. प्रगतीच्या क्षेत्रातील त्यांची गती मात्र म्हणावी तेवढी मोठी नव्हती. देशातील सर्वाधिक साक्षर राज्यात नावाप्रमाणे त्रिपुरा हे आर्थिक आणि औद्योगिक विकासात काहीशा मंद गतीने चालले. शिवाय माणिक सरकारला दीर्घकाळ सत्तेत असल्याने येणारी ‘अ‍ॅन्टी इन्कम्बन्सी’ अनुभवावी लागली. भाजप हा तेथे नव्याने आलेला पक्ष आहे आणि त्याचा अनुभव घ्यावा असे तेथील जनतेला वाटणे स्वाभाविक समजावे असेही आहे. या राज्यातील पराभवाने प्रकाश करातांच्या एकारलेल्या राजकारणाचा बंगालपाठोपाठ दुसरा पराभवही केला आहे. लोकहित व लोकाभिमुख नेत्यांना मागे ठेवणे व पक्षाची सारी सूत्रे स्वत:च्या हाती राहतील या त्यांच्या व्यक्तिगत व महत्त्वाकांक्षी वृत्तीचाही तो पराभव आहे. आता त्या पक्षाची सत्ता केवळ केरळ या एकाच राज्यात राहिली आहे. भाजपाचा विजयाचा हा वारू मेघालयात मात्र काँग्रेसने अडविला आहे. त्या राज्यात काँग्रेस हा सर्वाधिक संख्येने निवडून आलेला पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. आसाम, अरुणाचल, नागालँड आणि त्रिपुरा या सभोवतीच्या सर्व राज्यांत भाजपचे झेंडे उंचावत असताना मेघालयाने काँग्रेसच्या नेतृत्वाला शिरोधार्ह मानले आहे. मेघालय हेही जमातींचेच राज्य आहे. ते सर्वाधिक साक्षर राज्यांपैकी एक असले व समृद्धतेतही अग्रेसर असले तरी त्यातली जनता जमातींमध्ये विभागली आहे. त्यातला जमातवाद मजबूतही आहे. काँग्रेस व संगमा यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव या जमातींवर राहिला आणि तेथील प्रमुख जमाती आपल्याशी जुळल्या असतील असेच राजकारण काँग्रेसने तेथे केले. काँग्रेसचे नेतृत्व सामर्थ्यवान असले तरी देशातील त्याची संघटना विस्कळीत व खिळखिळी झाली आहे. पक्षाचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांना पक्ष कार्यासाठी अजून फारसा वेळ मिळाला नाही. तरीही या पक्षाची स्थानिक यंत्रणा भाजपच्या मुसंडीला आवर घालण्यात कमी पडली, हे स्पष्टपणे सांगितलेच पाहिजे. आपली प्रतिमा राष्ट्रीय राखायची तर केवळ पंजाब, कर्नाटक वा दिल्लीनजीकचे प्रदेश ताब्यात ठेवून त्यास चालणार नाही. राजस्थान, गुजरात किंवा मध्य प्रदेशातील पोटनिवडणुका जिंकणेही त्यासाठी पुरेसे नाही. त्या पक्षाला आपली क्षमता, स्थानिक यंत्रणा बळकट करणे व स्थानिक नेतृत्वाला बळ देणेच आवश्यक ठरणारे आणि तारणारे आहे.

टॅग्स :BJPभाजपाTripura Election Results 2018त्रिपुरा निवडणूक निकाल 2018