शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

भाजपाचे दांभिक दलितप्रेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 00:03 IST

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीचे एक वैशिष्ट्य असे की, सदर बैठक भाजपाने दिल्लीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात घेऊन दलित समाजास आपण दलितहितैषी, दलितप्रेमी मित्र असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. अर्थातच तो दांभिक आहे.

- बी.व्ही. जोंधळे(आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक)भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीचे एक वैशिष्ट्य असे की, सदर बैठक भाजपाने दिल्लीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात घेऊन दलित समाजास आपण दलितहितैषी, दलितप्रेमी मित्र असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. अर्थातच तो दांभिक आहे.या बैठकीत भाजपा अध्यक्ष अमित शहा म्हणाले की, ‘भाजपा दलित-आदिवासीविरोधी असल्याचा अपप्रचार विरोधी पक्ष करीत असतात. विरोधकांचे हे भाजपाविरोधी मनसुबे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडले पाहिजेत.’ याच बैठकीत दलित-आदिवासी-ओबीसी वर्गांची मते खेचून आणण्यासाठी दलित-अदिवासी-ओबीसी समाजाची संमेलने भरविण्याचाही घाट घातला गेला. एकूणच भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने २०१९ ची लोकसभा आणि दिवाळीनंतर होणाऱ्या चार-पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून दलित-आदिवासी समाजास भुलविण्याचे षड्यंत्र आखण्याचे निश्चित केले आहे, हे उघड आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘अच्छे दिन’चा वादा करून केंद्रात आणि देशाच्या दोन डझन राज्यांत सत्ता मिळविली; पण गेल्या साडेचार वर्षांत लोकांचे ‘अच्छे दिन’ तर दूरच राहिले; मात्र त्यांचे ‘बुरे दिन’ जरूर आले. भयभीत झालेल्या दलित-आदिवासी-अल्पसंख्याक समाजाची तर भाजपाच्या राज्यात खूपच वाईट अवस्था झाली. भाजपा एकीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकांचे भावनात्मक राजकारण करून बाबासाहेबांच्या राज्यघटनेचा आम्हाला अतीव आदर आहे, अशा घोषणा करीत आला. मात्र, दुसरीकडे बाबासाहेबांची राज्यघटना न बदलताही घटनाविरोधी वर्तन करीत आला, याचा भरपूर वाईट अनुभव गेल्या साडेचार वर्षांत दलित-आदिवासी-अल्पसंख्याक समाजाने घेतला आहे.भाजपाच्या सत्ताकाळात गोरक्षणाच्या नावाखाली दलित-मुस्लिमांच्या हत्या करण्यात आल्या. सनातन धर्माच्या प्रस्थापनेसाठी हिंसक मार्गांचा अवलंब करण्यात येऊ लागला. देशाच्या राजधानीत राज्यघटना जाळताना मनुस्मृतीच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात आल्या. घटनेतील लोकशाही, धर्मनिरपेक्षता या सेक्युलर संकल्पना मोडीत काढण्यासाठी आध्यात्मिक पायावरील लोकशाही आणि आध्यात्मिक पायावरील धर्मनिरपेक्षता या पर्यायी संकल्पनांचा बडेजाव माजविण्यात येऊ लागला. विविधतेच्या नावाखाली विषमता जोपासली जाऊ लागली. विवेकवादी विज्ञाननिष्ठ मतांना हिंस्र विरोध होऊ लागला. हिंदू राष्ट्रास नकार देणा-या पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यासारख्या नेत्यांचा ‘सेक्युलर’ वारसा मिटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बाबासाहेबांचे क्रांतिदर्शी सामाजिक विचार दडपून हिंदुत्वाच्या प्रतिक्रांतीचे कारस्थान रचण्यात येत आहे. म. गांधींच्या नावे स्वच्छता अभियान चालवायचे; मात्र गांधीजींचे अहिंसक-सत्याग्रही-मानवतावादी विचार नाकारायचे. धार्मिक बाबा, बुवा, मठाधिपतींना सत्तेत सहभागी करून घ्यायचे, असा सारा घटनाविरोधी प्रकार आज देशात सुरू आहे. या अशा मळभ दाटून आलेल्या पार्श्वभूमीवर म्हणूनच बाबासाहेबांची लोकशाही धर्मनिरपेक्षता वाचविण्यासाठी आंबेडकरवादी पक्ष-संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

टॅग्स :BJPभाजपाSocialसामाजिकnewsबातम्या