शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

भाजपाचे दांभिक दलितप्रेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 00:03 IST

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीचे एक वैशिष्ट्य असे की, सदर बैठक भाजपाने दिल्लीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात घेऊन दलित समाजास आपण दलितहितैषी, दलितप्रेमी मित्र असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. अर्थातच तो दांभिक आहे.

- बी.व्ही. जोंधळे(आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक)भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीचे एक वैशिष्ट्य असे की, सदर बैठक भाजपाने दिल्लीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात घेऊन दलित समाजास आपण दलितहितैषी, दलितप्रेमी मित्र असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. अर्थातच तो दांभिक आहे.या बैठकीत भाजपा अध्यक्ष अमित शहा म्हणाले की, ‘भाजपा दलित-आदिवासीविरोधी असल्याचा अपप्रचार विरोधी पक्ष करीत असतात. विरोधकांचे हे भाजपाविरोधी मनसुबे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडले पाहिजेत.’ याच बैठकीत दलित-आदिवासी-ओबीसी वर्गांची मते खेचून आणण्यासाठी दलित-अदिवासी-ओबीसी समाजाची संमेलने भरविण्याचाही घाट घातला गेला. एकूणच भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने २०१९ ची लोकसभा आणि दिवाळीनंतर होणाऱ्या चार-पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून दलित-आदिवासी समाजास भुलविण्याचे षड्यंत्र आखण्याचे निश्चित केले आहे, हे उघड आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘अच्छे दिन’चा वादा करून केंद्रात आणि देशाच्या दोन डझन राज्यांत सत्ता मिळविली; पण गेल्या साडेचार वर्षांत लोकांचे ‘अच्छे दिन’ तर दूरच राहिले; मात्र त्यांचे ‘बुरे दिन’ जरूर आले. भयभीत झालेल्या दलित-आदिवासी-अल्पसंख्याक समाजाची तर भाजपाच्या राज्यात खूपच वाईट अवस्था झाली. भाजपा एकीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकांचे भावनात्मक राजकारण करून बाबासाहेबांच्या राज्यघटनेचा आम्हाला अतीव आदर आहे, अशा घोषणा करीत आला. मात्र, दुसरीकडे बाबासाहेबांची राज्यघटना न बदलताही घटनाविरोधी वर्तन करीत आला, याचा भरपूर वाईट अनुभव गेल्या साडेचार वर्षांत दलित-आदिवासी-अल्पसंख्याक समाजाने घेतला आहे.भाजपाच्या सत्ताकाळात गोरक्षणाच्या नावाखाली दलित-मुस्लिमांच्या हत्या करण्यात आल्या. सनातन धर्माच्या प्रस्थापनेसाठी हिंसक मार्गांचा अवलंब करण्यात येऊ लागला. देशाच्या राजधानीत राज्यघटना जाळताना मनुस्मृतीच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात आल्या. घटनेतील लोकशाही, धर्मनिरपेक्षता या सेक्युलर संकल्पना मोडीत काढण्यासाठी आध्यात्मिक पायावरील लोकशाही आणि आध्यात्मिक पायावरील धर्मनिरपेक्षता या पर्यायी संकल्पनांचा बडेजाव माजविण्यात येऊ लागला. विविधतेच्या नावाखाली विषमता जोपासली जाऊ लागली. विवेकवादी विज्ञाननिष्ठ मतांना हिंस्र विरोध होऊ लागला. हिंदू राष्ट्रास नकार देणा-या पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यासारख्या नेत्यांचा ‘सेक्युलर’ वारसा मिटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बाबासाहेबांचे क्रांतिदर्शी सामाजिक विचार दडपून हिंदुत्वाच्या प्रतिक्रांतीचे कारस्थान रचण्यात येत आहे. म. गांधींच्या नावे स्वच्छता अभियान चालवायचे; मात्र गांधीजींचे अहिंसक-सत्याग्रही-मानवतावादी विचार नाकारायचे. धार्मिक बाबा, बुवा, मठाधिपतींना सत्तेत सहभागी करून घ्यायचे, असा सारा घटनाविरोधी प्रकार आज देशात सुरू आहे. या अशा मळभ दाटून आलेल्या पार्श्वभूमीवर म्हणूनच बाबासाहेबांची लोकशाही धर्मनिरपेक्षता वाचविण्यासाठी आंबेडकरवादी पक्ष-संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

टॅग्स :BJPभाजपाSocialसामाजिकnewsबातम्या