शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

भाजपाचे दांभिक दलितप्रेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 00:03 IST

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीचे एक वैशिष्ट्य असे की, सदर बैठक भाजपाने दिल्लीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात घेऊन दलित समाजास आपण दलितहितैषी, दलितप्रेमी मित्र असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. अर्थातच तो दांभिक आहे.

- बी.व्ही. जोंधळे(आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक)भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीचे एक वैशिष्ट्य असे की, सदर बैठक भाजपाने दिल्लीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात घेऊन दलित समाजास आपण दलितहितैषी, दलितप्रेमी मित्र असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. अर्थातच तो दांभिक आहे.या बैठकीत भाजपा अध्यक्ष अमित शहा म्हणाले की, ‘भाजपा दलित-आदिवासीविरोधी असल्याचा अपप्रचार विरोधी पक्ष करीत असतात. विरोधकांचे हे भाजपाविरोधी मनसुबे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडले पाहिजेत.’ याच बैठकीत दलित-आदिवासी-ओबीसी वर्गांची मते खेचून आणण्यासाठी दलित-अदिवासी-ओबीसी समाजाची संमेलने भरविण्याचाही घाट घातला गेला. एकूणच भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने २०१९ ची लोकसभा आणि दिवाळीनंतर होणाऱ्या चार-पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून दलित-आदिवासी समाजास भुलविण्याचे षड्यंत्र आखण्याचे निश्चित केले आहे, हे उघड आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘अच्छे दिन’चा वादा करून केंद्रात आणि देशाच्या दोन डझन राज्यांत सत्ता मिळविली; पण गेल्या साडेचार वर्षांत लोकांचे ‘अच्छे दिन’ तर दूरच राहिले; मात्र त्यांचे ‘बुरे दिन’ जरूर आले. भयभीत झालेल्या दलित-आदिवासी-अल्पसंख्याक समाजाची तर भाजपाच्या राज्यात खूपच वाईट अवस्था झाली. भाजपा एकीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकांचे भावनात्मक राजकारण करून बाबासाहेबांच्या राज्यघटनेचा आम्हाला अतीव आदर आहे, अशा घोषणा करीत आला. मात्र, दुसरीकडे बाबासाहेबांची राज्यघटना न बदलताही घटनाविरोधी वर्तन करीत आला, याचा भरपूर वाईट अनुभव गेल्या साडेचार वर्षांत दलित-आदिवासी-अल्पसंख्याक समाजाने घेतला आहे.भाजपाच्या सत्ताकाळात गोरक्षणाच्या नावाखाली दलित-मुस्लिमांच्या हत्या करण्यात आल्या. सनातन धर्माच्या प्रस्थापनेसाठी हिंसक मार्गांचा अवलंब करण्यात येऊ लागला. देशाच्या राजधानीत राज्यघटना जाळताना मनुस्मृतीच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात आल्या. घटनेतील लोकशाही, धर्मनिरपेक्षता या सेक्युलर संकल्पना मोडीत काढण्यासाठी आध्यात्मिक पायावरील लोकशाही आणि आध्यात्मिक पायावरील धर्मनिरपेक्षता या पर्यायी संकल्पनांचा बडेजाव माजविण्यात येऊ लागला. विविधतेच्या नावाखाली विषमता जोपासली जाऊ लागली. विवेकवादी विज्ञाननिष्ठ मतांना हिंस्र विरोध होऊ लागला. हिंदू राष्ट्रास नकार देणा-या पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यासारख्या नेत्यांचा ‘सेक्युलर’ वारसा मिटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बाबासाहेबांचे क्रांतिदर्शी सामाजिक विचार दडपून हिंदुत्वाच्या प्रतिक्रांतीचे कारस्थान रचण्यात येत आहे. म. गांधींच्या नावे स्वच्छता अभियान चालवायचे; मात्र गांधीजींचे अहिंसक-सत्याग्रही-मानवतावादी विचार नाकारायचे. धार्मिक बाबा, बुवा, मठाधिपतींना सत्तेत सहभागी करून घ्यायचे, असा सारा घटनाविरोधी प्रकार आज देशात सुरू आहे. या अशा मळभ दाटून आलेल्या पार्श्वभूमीवर म्हणूनच बाबासाहेबांची लोकशाही धर्मनिरपेक्षता वाचविण्यासाठी आंबेडकरवादी पक्ष-संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

टॅग्स :BJPभाजपाSocialसामाजिकnewsबातम्या