शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

निवडणुकांच्या तोंडावर विदर्भाचे स्मरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 06:09 IST

भारतीय जनता पक्षाने गत लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या दोन्ही भागांच्या विकासाचे आश्वासन दिले होते. ते कितपत पूर्ण केले, याचीही आकडेवारी राज्य शासनाने दिली असती तर बरे झाले असते.

- रवी टालेमहाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे विदर्भ आणि मराठवाड्यासाठी ३५ हजार कोटी रुपयांच्या आर्थिक साहाय्याची मागणी केली आहे. प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी हे विशेष साहाय्य हवे असल्याचे राज्याच्या अर्थ खात्याने केंद्राला कळविले आहे. केंद्र सरकार निधी देईल की नाही, हे यथावकाश कळेलच; पण राज्य सरकारला या निमित्ताने विदर्भ व मराठवाड्याचे स्मरण झाले हेदेखील नसे थोडके!नियोजित वेळापत्रकाचे पालन झाल्यास, लोकसभेच्या निवडणुकीस आता अवघ्या सात महिन्यांचा, तर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीस उणापुरा वर्षभराचा अवकाश आहे. त्यामुळे विदर्भ व मराठवाड्यासाठी विशेष निधीच्या मागणीस तोंडावर येऊन ठेपलेल्या निवडणुकांची किनार आहे, असे कुणी म्हटल्यास त्याला चूक म्हणता येणार नाही.विदर्भ व मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे मानव विकास निर्देशांकात पिछाडले असल्याचे कारण विशेष निधीची मागणी करताना पुढे करण्यात आले आहे. राज्य सरकारने अशा प्रकारे विशेष निधीची मागणी करण्यात काहीही वावगे नाही. केंद्र व राज्यात एकाच पक्षाची सत्ता असल्याने समजा ही मागणी पूर्ण झालीच तर विदर्भ व मराठवाड्याचे थोडेफार भलेच होईल; पण प्रादेशिक असमतोल दूर करण्यात या सरकारलाही अपयश आल्याची ही एकप्रकारे कबुलीच नव्हे का?विदर्भ व मराठवाडा राज्याच्या उर्वरित भागांच्या तुलनेत पिछाडलेले आहेत, हे सर्वविदित सत्य आहे. केंद्र व राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाने गत लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या दोन्ही भागांच्या विकासाचे आश्वासन दिले होते. ते कितपत पूर्ण केले, याचीही आकडेवारी राज्य शासनाने दिली असती तर बरे झाले असते.राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मानव विकास निर्देशांकात राज्यातील १२५ तालुके माघारले असून, त्यापैकी तब्बल १०० विदर्भ व मराठवाड्यातील आहेत. अर्थमंत्र्यांनी दिलेली माहिती नक्कीच अचूक असेल; पण त्यांचे सरकार सत्तेत आले तेव्हा हे १०० तालुके मानव विकास निर्देशांक तालिकेत कुठे होते आणि आता कुठे आहेत, ही आकडेवारीदेखील त्यांनी दिली असती तर अधिक बरे झाले असते.भारतीय जनता पक्षाने स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचा सोयीनुसार वापर केला, हे एक उघड सत्य आहे. विरोधी पक्षात असताना विदर्भ राज्याच्या गठनास पाठिंबा द्यायचा आणि सत्तेत पोहोचताच त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करायचे! विदर्भवासीयांनी आजवर दोनदा हा अनुभव घेतला आहे. भाजप राज्यात पहिल्यांदा सत्तेत आला तेव्हा केंद्रात आमचे सरकार नसल्याने अडचण होते, हा सुटकेचा मार्ग तरी होता; यावेळी तर ती अडचणदेखील नव्हती. भाजपच्या एकाही नेत्याने गत चार-साडेचार वर्षात विदर्भ राज्याच्या गठनासंदर्भात चकारही काढला नाही आणि आता निवडणुका तोंडावर येताच विशेष निधीची चर्चा सुरू करण्यात आली आहे. हा निधी राज्याची सत्ता मिळताच का मागण्यात आला नाही, या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायला विदर्भातील जनतेला नक्कीच आवडेल!(लेखक लोकमतच्या अकोला आवृत्तीचे निवासी संपादक आहेत.)

टॅग्स :BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVidarbhaविदर्भLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९