शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

आजचा अग्रलेख: काँग्रेसच्या वाटेवर भाजप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 10:41 IST

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर सर्वाधिक काळ राहण्यात चौथे स्थान पटकाविणारे विजय रुपानी यांचा राजीनामा का घेण्यात आला, याचे अधिकृत स्पष्टीकरण भाजपने अद्याप दिलेले नाही.

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर सर्वाधिक काळ राहण्यात चौथे स्थान पटकाविणारे विजय रुपानी यांचा राजीनामा का घेण्यात आला, याचे अधिकृत स्पष्टीकरण भाजपने अद्याप दिलेले नाही. दरम्यान, गुजरातचे सतरावे मुख्यमंत्री म्हणून प्रथमच आमदार झालेल्या भूपेंद्र पटेल यांची निवड करण्यात आली. भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा दोनच पक्षश्रेष्ठी आहेत. शिवाय दोघेही गुजरातचे असल्याने त्यांच्या निर्णयावर स्पष्टीकरण तरी कोण देणार? नरेंद्र मोदी, हितेंद्र देसाई, माधवसिंह सोळंकी यांच्यानंतर सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदावर राहण्याचा मान पटकाविणारे विजय रुपानी यांच्या राजीनाम्याविषयी विविध कारणे चर्चेत आहेत. 

कोविड संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत त्यांनी प्रभावी काम केले नाही, पक्षसंघटन आणि सरकार यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. रुपानी हे फारच मितभाषिक आहेत, आक्रमक भूमिका घेत नाहीत. सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे ते जैन समाजाचे असल्याने पटेल-पाटीदार समाज नाराज आहे, असाही अर्थ लावला जात आहे. कोविड संसर्गाच्या काळातील गुजरात सरकारची कामगिरी चांगली नव्हती, गुजरात उच्च न्यायालयानेही त्याबाबत ताशेरे ओढले होते, हे एकमेव कारण पटण्याजोगे आहे. कारण नरेंद्र मोदी २०१४ मध्ये केंद्रात पंतप्रधानपद स्वीकारण्यासाठी गेल्यानंतर आनंदीबाई पटेल यांची मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली. डिसेंबर २०१७ च्या निवडणुकांपूर्वी त्यांना बदलून विजय रुपानी यांची निवड केली. 

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने चौफेर चढाई करूनही साध्या मताधिक्याने का असेना रुपानी यांनी सत्ता टिकविली होती. अर्थात अशा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यापेक्षा नरेंद्र मोदीच प्रचारात आघाडीवर असतात. त्यांच्याच नेतृत्वाखाली देशात आणि सर्व राज्यांत निवडणुका लढविल्या जातात. त्यामुळे हे कारणही पटत नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बिगर गुजराती आहेत. तरीदेखील रुपानी आणि पाटील यांनी अलीकडे झालेल्या सहा महापालिकेच्या निवडणुका जिंकल्या. नगरपालिका निवडणुकीत ८१ पैकी ७५ जिंकल्या. तालुका पंचायतीत २३१ पैकी १९६ जिंकल्या आहेत. शिवाय इतर पोटनिवडणुकाही जिंकल्या आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिमा मलिन झालेली नाही, हे स्पष्टच होते. तरीदेखील कारण न देता विजय रुपानी यांना बदलण्यात आले. पटेल-पाटीदार समाजाकडे नेतृत्व नाही, हे एक कारण असू शकते; पण त्याचा गुजरातच्या राजकारणावर थेट परिणाम सध्या तरी झालेला दिसत नाही. 

भाजपने काँग्रेसची संस्कृती मात्र स्वीकारल्याचे मान्य करावे लागेल. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा कालावधी सोडला तर काँग्रेसने अपवाद वगळता कोणाही एका मुख्यमंत्र्याला पूर्ण काळ सत्ता दिली नाही. त्याच वाटेवर भाजप वाटचाल करतो आहे आणि आपले पक्षश्रेष्ठत्व अधिक श्रेष्ठ असल्याचे जाणीव करून देत आहे. वर्षभरात चार राज्यांतील पाच मुख्यमंत्री बदलण्यात आले. उत्तराखंडमध्ये त्रिवेंद्र सिंह रावत यांना बदलून तीरथ सिंह रावत यांना आणले. त्यांनाही लगेचच बदलण्यात आले. आसाममध्ये प्रथमच पाच वर्षांची सत्ता राबवून पुन्हा विजय मिळवणारे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांना बदलण्यात आले. कर्नाटकात बी. एस. येडियुरप्पा यांना घरी पाठवून गृहमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे सूत्रे दिली. आता विजय रुपानी यांच्यावर तीच वेळ आली. प्रथमच आमदार झालेले आणि मंत्रिपदाचाही अनुभव नसलेले भूपेंद्र पटेल यांची आश्चर्यकारकरीत्या निवड केली  गेली. त्यांचे नावही चर्चेत नव्ह

ते. वास्तविक भाजप पंचवीस वर्षे गुजरातमध्ये सत्तेवर आहे. त्यांची भाकरीच करपू लागली आहे. मागील निवडणुकीत निसटता विजय मिळाला होता. लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, यासाठी सर्व सव्वीस जागा भाजपला देणाऱ्या मतदारांनीच काँग्रेसला चांगले मतदान केले आहे. उत्तर प्रदेश किंवा  बिहार प्रांतामध्ये काँग्रेस पक्षाची अवस्था नोंद घेण्यासारखी राहिलेली नाही, अशी अवस्था गुजरातमध्ये नक्कीच नाही. किंबहुना आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तांतर झाले तर आश्चर्य वाटायला नको. विकासाचे माॅडेल म्हणून गुजरातचे उदाहरण देत भाजपने देशाची सत्ता हस्तगत केली. त्याच राज्यात कोविडसारख्या महामारीत सर्व पातळीवर अपयश येत गेले. कोरोनाचा अटकाव करण्यात अपयश आले. या सर्वांचे खापर विजय रुपानी यांच्यावर फोडून पटेल-पाटीदार अस्मिता जागृत करीत हार्दिक पटेल यांना शह देण्याची ही नवी खेळी असू शकते. त्यातून नवे मुख्यमंत्री अननुभवी आहेत. त्यांच्याकडून अपेक्षाही खूप असणार आहे. केवळ त्यांचे नाव पटेल आहे म्हणून गुजरातच्या निवडणुका जिंकणे कठीण आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस