शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2021 07:46 IST

भाजपचे पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा हे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर बरसले. वास्तविक राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्राचा विशेष उल्लेख करण्याचे कारण नव्हते.

पक्षाच्या अध्यक्षांनी राजकीय भूमिकाच मांडायची असते. सत्तेवर असलेल्या नेत्यांनी सेवा, संकल्प आणि समर्पण, त्याग आदी शब्दांचा उपयोग करीत सरकारच्या धोरणांचा ऊहापोह करायचा असतो. या प्रवाहानुसारच भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील भाषणे झाल्याचे स्पष्ट दिसते. ही भूमिका मांडताना पक्षाच्या कार्यकर्त्यांना संदेशही द्यायचा असतो. मात्र, एखाद्या प्रांतातील बहुमताने सत्तेवर असलेले सरकार उखडून टाकण्याची भाषा अतिरेकी वाटते. त्या सरकारच्या नीती-धोरणांविरुद्ध संघर्ष करण्याचे आवाहन समजता येईल; पण सरकार कसे उखडून टाकता येईल? भाजपचे पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा हे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर बरसले. वास्तविक राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्राचा विशेष उल्लेख करण्याचे कारण नव्हते.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर झालेल्या या पहिल्याच कार्यकारिणीत त्याची कारणमीमांसा वरकरणी झाल्याचे दाखविण्यात आले. उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वपूर्ण राज्यात विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. शिवाय गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तराखंडमध्येही याचवेळी विधानसभेच्या निवडणुका हाेतील. गेल्या आठवड्यात तेरा राज्यांतील तीस विधानसभा मतदारसंघांत आणि लोकसभेच्या तीन मतदारसंघांत पोटनिवडणुका झाल्या. त्यांचा निकाल संमिश्र असला तरी भाजपला शहाणपणा शिकण्याची गरज असल्याचा संदेश मिळाला आहे. उत्तर प्रदेशात भाजपविरोधी पक्षांमध्ये एकी होण्याची शक्यता नसली तरी सर्व काही आलबेल आहे, असे मानता येत नाही. प्रियांका गांधी यांनी महिलांसाठी चाळीस टक्के उमेदवारी देण्याचे आश्वासन देऊन जात-पात, धर्म आदींच्या पलीकडचा विचार करायला लावणारा अजेंडा सेट केला आहे. त्यांना प्रतिसादही चांगला मिळतो आहे.

उत्तर प्रदेशात अल्पसंख्याक आणि दलित उपेक्षित वर्गाला याेगी आदित्यनाथ सरकारच्या कालखंडात मिळालेली वागणूक फारशी चांगली नाही. हाथरसचे प्रकरण असो किंवा पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाची हाताळणी असो, जनतेत असंतोष निश्चित आहे. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक पुन्हा हिंदुत्वाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ मंदिराला भेट दिल्यानंतर केलेले भाषण त्याचेच प्रत्यंतर आहे, असे मानायला जागा आहे. उत्तराखंडमध्ये वारंवार मुख्यमंत्री बदलून पाहिले. शेजारच्या हिमाचल प्रदेशात पोटनिवडणुकीत भाजपचा सपशेल पराभव झाला. पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनामुळे भाजपला कोणतीही आशा करता येणार नाही. गोव्याचे सरकार भ्रष्टाचारात बरबटले आहे, असे माजी राज्यपालांनीच जाहीरपणे सांगितले आहे. तेव्हा सेवा, संकल्प आणि समर्पणाचा संदेश कोणाला द्यायचा हा प्रश्न उपस्थित होतो. परिवार वादावर हल्ला करताना भाजपमध्ये राज्याराज्यांत असंख्य परिवार तयार झाले आहेत. हे मान्य करायचे नाकारता येईल का? परिवारवादाच्या भानगडीमुळे कर्नाटकात नेतृत्व बदल करावा लागला, महाराष्ट्रातील भाजपमध्ये काही कमी परिवारवादाचे पदर आहेत? काँग्रेसचे जे नेते पवित्र करून घेण्यात आले आहेत, त्यांची परंपराच परिवारवादाची आहे.

गांधी कुटुंबीयांवर हल्ला चढविण्यासाठी किंबहुना उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी यांना रोखण्यासाठी हा परिवारवादाचा मुद्दा चर्चेत आणला गेला असणार आहे. महाराष्ट्रावर मात्र भाजपचा राग आहे. शिवसेनेने जी ऐनवेळी खेळी खेळली, त्याची चिडचिड अद्यापही व्यक्त केली जात आहे. भाजपसाठी महाराष्ट्राची भूमी आता सिद्ध करावी लागणार आहे. गेली तीस वर्षे शिवसेनेच्या मदतीवर भाजपने राजकारण केले. अन्यथा भाजपची स्वत:ची ताकद पंचवीस आमदार निवडून आणण्याची नव्हती, हे मागील आकडेवारीतून स्पष्ट होते.

शिवसेनेमुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात भाजप स्थिरावू शकला. नरेंद्र मोदी यांची लाट येताच त्यांच्या अंगात थोडे बळ आले. अन्यथा शिवसेनेवर कुरघोडी करण्याची कल्पनाही भाजप करू शकत नव्हता. हे मान्य न करता शिवसेनाच नरेंद्र मोदी यांच्यामुळे वाढली असा शोध लावण्यात येऊ लागला. या गर्वामुळेच तीस वर्षांची युती संपुष्टात आली. आता खरी परीक्षा येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत आहे. तेव्हा भाजपचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. विरोधी पक्ष म्हणून भाजपने महाविकास आघाडी सरकारवर हल्ले चढविले पाहिजेतच; पण ते जनतेच्या प्रश्नांवर असावेत. केंद्रीय तपास यंत्रणेची आयुधे वापरून नको! भाजपला विराेधात काम करण्याचा अनुभव प्रचंड आहे. त्यांनी ते महाराष्ट्राच्या कल्याणासाठी जरूर करावे.

टॅग्स :BJPभाजपा