शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
2
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
3
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
4
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
5
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
6
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
7
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
8
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
9
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
10
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
11
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
12
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
13
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
14
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
15
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
16
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
17
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
18
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
19
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
20
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?

आता मागचं दार नाही, पंकजाताई थेट मैदानात! 

By यदू जोशी | Updated: October 8, 2022 08:15 IST

‘राहाल वरळीत तर जिंकाल कशा परळीत?’ अशी टीका पंकजा मुंडेंवर झाली होती. आता परळीच्या मैदानात शड्डू ठोकून उभी राहणार, असं त्यांनी जाहीर केलं आहे.

- यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत

दसऱ्याला मुंबईत दोन मेळावे होते, तिकडे मुंबईपासून साडेतीनशे किलोमीटरवर पंकजाताईंचा दणकेबाज मेळावा झाला. त्यांनी कोणासाठी खुर्च्या लावल्या नाहीत, नाश्त्याची व्यवस्था केली नाही, पण तरीही हजारो लोक आले. उन्हातान्हात बसून त्यांनी पंकजाताईंना ऐकलं. वाचून नाही दाखवलं त्यांनी, पण ठरवून बोलल्या. ताईंचा सूर या वेळी बदललेला होता, राजकीयदृष्ट्या अधिक सावध वाटल्या त्या. ‘जितना  बदल सकते थे खुद को बदल दिया हमने, अब जिनको शिकायत है वह बदले’ असं त्या कोणाला उद्देशून म्हणाल्या असतील?  त्यांच्याविषयी ज्या नेतृत्वाला तक्रार आहे आणि ज्या नेतृत्वाविषयी पंकजाताईंना तक्रार आहे, अशा दोघांनी तक्रार निवारण केंद्र लवकर तयार करून गैरसमजांची भिंत लवकरच पाडली तर ते दोघांच्याही फायद्याचं होईल.

गेल्या काही सभा, पत्रपरिषदांमध्ये असलेला मूड पंकजाताईंनी  मेळाव्यात बदलला. पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयीच्या त्यांच्या आधीच्या कापून दाखविलेल्या व्हिडिओचाही त्यांनी खुलासा केला. ‘मी बदलले आहे, तुम्हीही  जरा बदला’ असं त्या अर्थातच  पक्षांतर्गत विरोधकांना म्हणाल्या असाव्यात. पंकजाताई भाजपच्या असेट आहेत. त्यांच्याइतकी तुफान भाषण देणारी एकही महिला नेता एकाही पक्षाकडे आज नाही; पण त्या नाराज आहेत! भाजपचे  प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुंबईत अलीकडेच त्यांच्या घरी गेले, तास दीड तास चर्चा केली. परवा बावनकुळेंच्या कोराडी देवीचे दर्शन घ्यायला पंकजाताई गेल्या, तेव्हाही दोघांची चर्चा झाली. ओबीसींची ताकद पुन्हा एकदा भाजपच्या पाठीशी भक्कमपणे उभी करण्यासाठी  पंकजाताईंची साथ बावनकुळेंना हवी आहे. 

देवेंद्र फडणवीस आणि पंकजाताईंमध्ये पडलेलं अंतर कमी करण्याचा बावनकुळेंचा हेतू दिसतो. पंकजाताई काही नेत्यांचं वैयक्तिक भेटीत कौतुक करतात, पण जाहीरपणे खोचक बोलतात, असा त्यांच्यावरचा मोठा आक्षेप! त्याच्या अगदी उलट केलं, तर  फायदाच होईल हा राजकारणातील व्यवहार उशिरा का होईना ताईंना समजल्याचं परवाच्या भाषणावरून वाटलं. मध्यंतरी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे पंकजाताईंनी सगळी व्यथा मांडली तेव्हा जे. पी. नड्डा त्यांना म्हणाले, ‘गर्दी हीच तुमची ताकद आहे, तिची काळजी करा.’ पंकजा यांनी लोकांमध्ये अन् लोकांमधूनच पुढे जावं, असा संदेश पक्षनेतृत्वानं यानिमित्तानं दिला आहे.

पक्षानं तिकीट दिलं तर मी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत परळीतूनच लढणार, असं पंकजाताईंनी जाहीर केलं हेही बरंच झालं. मागच्या दाराने जाण्यापेक्षा थेट मैदानात उतरणं कधीही चांगलं. मागे त्या हरल्या तेव्हा, ‘राहाल वरळीत तर जिंकाल कशा परळीत?’ अशी टीका झाली होती. आता परळीच्या मैदानात शड्डू ठोकून उभी राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. पक्षानं तिकीट दिलं तर... हे बोलायला मात्र त्या विसरल्या नाहीत.  अन्यायाबद्दल रडत बसण्यापेक्षा लढत पुढे जाण्याचा निर्णय घेतला हे चांगलंच आहे. पंकजाताईंना राज्यसभा, विधान परिषद मिळाली नाही याचं वाईट वाटण्यापेक्षा ती न देण्याची समाधानकारक कारणं नेतृत्वाकडून सांगितली गेली नाही, हा त्यांचा आणि समर्थकांचा मोठा रोष आहे. मुंडे साहेबांना मानणारी माणसं ताईंनी मुंडे साहेबांसारखंच वागावं, आपल्यात राहावं अशी अपेक्षा करीत वाट पाहत होती. पंकजांनी त्यांच्याशी पुन्हा एकदा कनेक्ट साधला. २०२४ मध्ये पुन्हा पंकजा विरुद्ध धनंजय मुंडे असा सामना पुन्हा होईल. राज्यसभा, विधान परिषदेसाठी माझ्या नावाची चर्चा करू नका, असं त्या का म्हणत असतील? 

- आपल्याला संधी मिळणार नाही हे लक्षात आल्यानं तर त्या बोलल्या नसतील? की आपली जागा जनतेतून निवडून जाण्याचीच आहे याचं भान पुन्हा गवसलं असावं? हकीकत को तलाश करना पडता है, अफवाए तो घर बैठे मिल जाती है, असंही ताई म्हणाल्या. याचा अर्थ, नवीन हकीकत लिहिण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडे