शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

आता मागचं दार नाही, पंकजाताई थेट मैदानात! 

By यदू जोशी | Updated: October 8, 2022 08:15 IST

‘राहाल वरळीत तर जिंकाल कशा परळीत?’ अशी टीका पंकजा मुंडेंवर झाली होती. आता परळीच्या मैदानात शड्डू ठोकून उभी राहणार, असं त्यांनी जाहीर केलं आहे.

- यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत

दसऱ्याला मुंबईत दोन मेळावे होते, तिकडे मुंबईपासून साडेतीनशे किलोमीटरवर पंकजाताईंचा दणकेबाज मेळावा झाला. त्यांनी कोणासाठी खुर्च्या लावल्या नाहीत, नाश्त्याची व्यवस्था केली नाही, पण तरीही हजारो लोक आले. उन्हातान्हात बसून त्यांनी पंकजाताईंना ऐकलं. वाचून नाही दाखवलं त्यांनी, पण ठरवून बोलल्या. ताईंचा सूर या वेळी बदललेला होता, राजकीयदृष्ट्या अधिक सावध वाटल्या त्या. ‘जितना  बदल सकते थे खुद को बदल दिया हमने, अब जिनको शिकायत है वह बदले’ असं त्या कोणाला उद्देशून म्हणाल्या असतील?  त्यांच्याविषयी ज्या नेतृत्वाला तक्रार आहे आणि ज्या नेतृत्वाविषयी पंकजाताईंना तक्रार आहे, अशा दोघांनी तक्रार निवारण केंद्र लवकर तयार करून गैरसमजांची भिंत लवकरच पाडली तर ते दोघांच्याही फायद्याचं होईल.

गेल्या काही सभा, पत्रपरिषदांमध्ये असलेला मूड पंकजाताईंनी  मेळाव्यात बदलला. पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयीच्या त्यांच्या आधीच्या कापून दाखविलेल्या व्हिडिओचाही त्यांनी खुलासा केला. ‘मी बदलले आहे, तुम्हीही  जरा बदला’ असं त्या अर्थातच  पक्षांतर्गत विरोधकांना म्हणाल्या असाव्यात. पंकजाताई भाजपच्या असेट आहेत. त्यांच्याइतकी तुफान भाषण देणारी एकही महिला नेता एकाही पक्षाकडे आज नाही; पण त्या नाराज आहेत! भाजपचे  प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुंबईत अलीकडेच त्यांच्या घरी गेले, तास दीड तास चर्चा केली. परवा बावनकुळेंच्या कोराडी देवीचे दर्शन घ्यायला पंकजाताई गेल्या, तेव्हाही दोघांची चर्चा झाली. ओबीसींची ताकद पुन्हा एकदा भाजपच्या पाठीशी भक्कमपणे उभी करण्यासाठी  पंकजाताईंची साथ बावनकुळेंना हवी आहे. 

देवेंद्र फडणवीस आणि पंकजाताईंमध्ये पडलेलं अंतर कमी करण्याचा बावनकुळेंचा हेतू दिसतो. पंकजाताई काही नेत्यांचं वैयक्तिक भेटीत कौतुक करतात, पण जाहीरपणे खोचक बोलतात, असा त्यांच्यावरचा मोठा आक्षेप! त्याच्या अगदी उलट केलं, तर  फायदाच होईल हा राजकारणातील व्यवहार उशिरा का होईना ताईंना समजल्याचं परवाच्या भाषणावरून वाटलं. मध्यंतरी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे पंकजाताईंनी सगळी व्यथा मांडली तेव्हा जे. पी. नड्डा त्यांना म्हणाले, ‘गर्दी हीच तुमची ताकद आहे, तिची काळजी करा.’ पंकजा यांनी लोकांमध्ये अन् लोकांमधूनच पुढे जावं, असा संदेश पक्षनेतृत्वानं यानिमित्तानं दिला आहे.

पक्षानं तिकीट दिलं तर मी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत परळीतूनच लढणार, असं पंकजाताईंनी जाहीर केलं हेही बरंच झालं. मागच्या दाराने जाण्यापेक्षा थेट मैदानात उतरणं कधीही चांगलं. मागे त्या हरल्या तेव्हा, ‘राहाल वरळीत तर जिंकाल कशा परळीत?’ अशी टीका झाली होती. आता परळीच्या मैदानात शड्डू ठोकून उभी राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. पक्षानं तिकीट दिलं तर... हे बोलायला मात्र त्या विसरल्या नाहीत.  अन्यायाबद्दल रडत बसण्यापेक्षा लढत पुढे जाण्याचा निर्णय घेतला हे चांगलंच आहे. पंकजाताईंना राज्यसभा, विधान परिषद मिळाली नाही याचं वाईट वाटण्यापेक्षा ती न देण्याची समाधानकारक कारणं नेतृत्वाकडून सांगितली गेली नाही, हा त्यांचा आणि समर्थकांचा मोठा रोष आहे. मुंडे साहेबांना मानणारी माणसं ताईंनी मुंडे साहेबांसारखंच वागावं, आपल्यात राहावं अशी अपेक्षा करीत वाट पाहत होती. पंकजांनी त्यांच्याशी पुन्हा एकदा कनेक्ट साधला. २०२४ मध्ये पुन्हा पंकजा विरुद्ध धनंजय मुंडे असा सामना पुन्हा होईल. राज्यसभा, विधान परिषदेसाठी माझ्या नावाची चर्चा करू नका, असं त्या का म्हणत असतील? 

- आपल्याला संधी मिळणार नाही हे लक्षात आल्यानं तर त्या बोलल्या नसतील? की आपली जागा जनतेतून निवडून जाण्याचीच आहे याचं भान पुन्हा गवसलं असावं? हकीकत को तलाश करना पडता है, अफवाए तो घर बैठे मिल जाती है, असंही ताई म्हणाल्या. याचा अर्थ, नवीन हकीकत लिहिण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडे