शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

भाजपा विरुद्ध भाजपा

By admin | Updated: July 26, 2014 09:11 IST

तोगडिया, ढवळीकर, लक्ष्मण प्रभृतींच्या बडबडीला मोदींनी आळा घातला नाही, तर त्याची झळ मोदींच्या प्रतिमेला बसल्यावाचून राहणार नाही, हे लक्षात घेतलेले बरे!

केंद्रातील मोदी सरकार पाडण्यासाठी विरोधीपक्षांना फारशी खटपट करावी लागेल असे दिसत नाही, कारण हे सरकार पाडण्याची जबाबदारी प्रवीण तोगडिया, गिरिराजसिंह आदी हिंदुत्ववादी जहाल नेते; तसेच भाजपामधील तेलंगणातील नेते के. लक्ष्मण किंवा गोव्यातील भाजपाचे मंत्री ढवळीकर आदी प्रभृतींनी घेतलेली दिसत आहे. हे सर्व नेते दरदिवसाआड मोदी सरकारला अडचणीत आणणारी विधाने करून, सरकारला बचावात्मक पवित्रा घेण्यास भाग पाडीत आहेत. हे कमी आहे म्हणून की काय ह्यअसे मित्र नकोत असे वाटायला लावणारे शिवसेनेसारखे मित्रपक्ष रमजानच्या महिन्यात मुस्लिम बांधवांच्या तोंडात चपात्या कोंबून संसदेत सरकारला अडचणीत आणण्याची व्यवस्था करीत आहेत. भारताची जागतिक दर्जाची टेनिसपटू सानिया मिर्झा हिला पाकिस्तानची सून म्हणून तिला तेलंगणची ब्रँड अँबॅसिडर करण्याला त्याच राज्यातील भाजपा नेत्याने आक्षेप घेतला आहे. एखाद्या भारतीय मुलाने अथवा भारतीय मुलीने परदेशी व्यक्तीशी विवाह केला म्हणून त्याला परकी हस्तक मानायचे ठरवले तर आज भारतातील अनेक तरुण-तरुणींना देशद्रोही ठरवावे लागेल. पण खरा मुद्दा तो नाही. खरा मुद्दा हा आहे की, मोदी सत्तेवर आल्यानंतर आजवर दबलेल्या हिंदू जातीयवादी शक्ती आता डोके वर काढू लागल्या आहेत आणि मोदी गुजरातचा जातीय अजेंडा कधी राबवतात याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळेच मोदी भारताला हिंदू राष्ट्र म्हणून कधी घोषित करतात, याचे वेध गोव्याचे ढवळीकर यांना लागले आहेत. तोगडियांना मुस्लिमांनी आपली पायरी ओळखून वागावे असे वाटू लागले आहे. या एकापाठोपाठ येणार्‍या हिंदुत्ववादी मागण्यांमुळे मोदी सरकारची मात्र पंचाईत होत आहे. या मागण्यांना पाठिंबा द्यावा, तर हे हिंदू तालिबानी सरकारला डोईजड ठरण्याची भीती आहे आणि नाही दिला, तर ज्यांना राममंदिराचे आमिष दाखवून सत्ता मिळविली आहे, ते नाराज 

होऊ न आणखीन नवनवे उपद्व्याप करणार. सानिया मिर्झा प्रकरणावर काय भूमिका घ्यावी, याबद्दल तर सरकारमध्ये बराच संभ्रम दिसून आला. के. लक्ष्मण यांच्या भूमिकेला भाजपात नव्याने आलेले सुब्रमण्यम स्वामी यांनी पाठिंबा दिला, तर मुख्तार अब्बास नकवी यांनी विरोध केला, तर मुरली मनोहर जोशी यांनी नरो वा कुंजरोवा भूमिका घेतली. शेवटी सानिया मिर्झाने आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये भारताचा झेंडा उंचावला आहे व ती आजच्या भारतीय तरुणाईच्या गळ्यातली ताईत आहे,  त्यामुळे तिला पाकिस्तानी ठरविण्याची भूमिका अंगलट येऊ  शकते, हे लक्षात आल्यावर प्रकाश जावडेकरांना संसदेत सारवासारव करावी लागली. सरकारकडे पूर्ण बहुमत असल्यामुळे सरकारची अब्रू वाचली, पण बहुमत नसते तर हे सगळे खेळ अंगाशी आले असते; पण पक्षातील जहाल आणि बाकी हिंदुत्ववादी यांना नेमकी या बहुमताचीच झिंग चाढली आहे. या बहुमताच्या जोरावर त्यांना काश्मीरचे ३७0 वे कलम रद्द करायचे आहे, राममंदिर बांधून काढायचे आहे, सानिया मिर्झासारख्या देशप्रेमी मुस्लिमांना पाकिस्तानी ठरवायचे आणि एके दिवशी भारत हे हिंदूराष्ट्र घोषित करायचे आहे. मोदी यांच्याविषयी अल्पसंख्यांमध्ये अविश्‍वासाची भावना आहे, असा या लोकसभा निवडणुकीतला भाजपाविरोधी पक्षांचा प्रचाराचा मुद्दा होता. हा मुद्दा खोडून काढणारे वर्तन करण्याऐवजी भाजपाचेच नेते व कार्यकर्ते हा मुद्दा खरा असल्याचे सिद्ध करण्याच्या मागे लागले आहेत. त्यामुळे नक्कीच मुस्लिमांमधील असुरक्षिततेचे वातावरण वाढीस लागू शकते. सानिया मिर्झासारख्या नामवंत मुस्लिम खेळाडुंच्या राष्ट्रनिष्ठेविषयीच जाहीरपणे संशय व्यक्त केला जात असेल, 
तर सामान्य मुस्लिमांची काय वाट लागेल, याची कल्पनाच केलेली बरी. मोदी सत्तेवर आल्यानंतर हे जे काही हिंदुत्ववादी नारे लागत आहेत, त्याबाबत स्वत: पंतप्रधान मोदी यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. अशा वक्तव्यांवर त्यांनी मौन धरले तर या वक्तव्यांना त्यांची संमती आहे, असा अर्थ लावला जाईल. मोदी यांचे आतापर्यंतचे वर्तन भारताच्या पंतप्रधानाला साजेसे राहिले आहे, त्यामुळे त्यांची प्रतिमाही बदलू लागली आहे. पण, तोगडिया, ढवळीकर, लक्ष्मण 
प्रभृतींच्या बडबडीला त्यांनी आळा घातला नाही, तर त्याची झळ मोदी यांच्या प्रतिमेला बसल्यावाचून राहणार नाही, हे लक्षात घेतलेले बरे!