शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा विरुद्ध भाजपा

By admin | Updated: July 26, 2014 09:11 IST

तोगडिया, ढवळीकर, लक्ष्मण प्रभृतींच्या बडबडीला मोदींनी आळा घातला नाही, तर त्याची झळ मोदींच्या प्रतिमेला बसल्यावाचून राहणार नाही, हे लक्षात घेतलेले बरे!

केंद्रातील मोदी सरकार पाडण्यासाठी विरोधीपक्षांना फारशी खटपट करावी लागेल असे दिसत नाही, कारण हे सरकार पाडण्याची जबाबदारी प्रवीण तोगडिया, गिरिराजसिंह आदी हिंदुत्ववादी जहाल नेते; तसेच भाजपामधील तेलंगणातील नेते के. लक्ष्मण किंवा गोव्यातील भाजपाचे मंत्री ढवळीकर आदी प्रभृतींनी घेतलेली दिसत आहे. हे सर्व नेते दरदिवसाआड मोदी सरकारला अडचणीत आणणारी विधाने करून, सरकारला बचावात्मक पवित्रा घेण्यास भाग पाडीत आहेत. हे कमी आहे म्हणून की काय ह्यअसे मित्र नकोत असे वाटायला लावणारे शिवसेनेसारखे मित्रपक्ष रमजानच्या महिन्यात मुस्लिम बांधवांच्या तोंडात चपात्या कोंबून संसदेत सरकारला अडचणीत आणण्याची व्यवस्था करीत आहेत. भारताची जागतिक दर्जाची टेनिसपटू सानिया मिर्झा हिला पाकिस्तानची सून म्हणून तिला तेलंगणची ब्रँड अँबॅसिडर करण्याला त्याच राज्यातील भाजपा नेत्याने आक्षेप घेतला आहे. एखाद्या भारतीय मुलाने अथवा भारतीय मुलीने परदेशी व्यक्तीशी विवाह केला म्हणून त्याला परकी हस्तक मानायचे ठरवले तर आज भारतातील अनेक तरुण-तरुणींना देशद्रोही ठरवावे लागेल. पण खरा मुद्दा तो नाही. खरा मुद्दा हा आहे की, मोदी सत्तेवर आल्यानंतर आजवर दबलेल्या हिंदू जातीयवादी शक्ती आता डोके वर काढू लागल्या आहेत आणि मोदी गुजरातचा जातीय अजेंडा कधी राबवतात याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळेच मोदी भारताला हिंदू राष्ट्र म्हणून कधी घोषित करतात, याचे वेध गोव्याचे ढवळीकर यांना लागले आहेत. तोगडियांना मुस्लिमांनी आपली पायरी ओळखून वागावे असे वाटू लागले आहे. या एकापाठोपाठ येणार्‍या हिंदुत्ववादी मागण्यांमुळे मोदी सरकारची मात्र पंचाईत होत आहे. या मागण्यांना पाठिंबा द्यावा, तर हे हिंदू तालिबानी सरकारला डोईजड ठरण्याची भीती आहे आणि नाही दिला, तर ज्यांना राममंदिराचे आमिष दाखवून सत्ता मिळविली आहे, ते नाराज 

होऊ न आणखीन नवनवे उपद्व्याप करणार. सानिया मिर्झा प्रकरणावर काय भूमिका घ्यावी, याबद्दल तर सरकारमध्ये बराच संभ्रम दिसून आला. के. लक्ष्मण यांच्या भूमिकेला भाजपात नव्याने आलेले सुब्रमण्यम स्वामी यांनी पाठिंबा दिला, तर मुख्तार अब्बास नकवी यांनी विरोध केला, तर मुरली मनोहर जोशी यांनी नरो वा कुंजरोवा भूमिका घेतली. शेवटी सानिया मिर्झाने आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये भारताचा झेंडा उंचावला आहे व ती आजच्या भारतीय तरुणाईच्या गळ्यातली ताईत आहे,  त्यामुळे तिला पाकिस्तानी ठरविण्याची भूमिका अंगलट येऊ  शकते, हे लक्षात आल्यावर प्रकाश जावडेकरांना संसदेत सारवासारव करावी लागली. सरकारकडे पूर्ण बहुमत असल्यामुळे सरकारची अब्रू वाचली, पण बहुमत नसते तर हे सगळे खेळ अंगाशी आले असते; पण पक्षातील जहाल आणि बाकी हिंदुत्ववादी यांना नेमकी या बहुमताचीच झिंग चाढली आहे. या बहुमताच्या जोरावर त्यांना काश्मीरचे ३७0 वे कलम रद्द करायचे आहे, राममंदिर बांधून काढायचे आहे, सानिया मिर्झासारख्या देशप्रेमी मुस्लिमांना पाकिस्तानी ठरवायचे आणि एके दिवशी भारत हे हिंदूराष्ट्र घोषित करायचे आहे. मोदी यांच्याविषयी अल्पसंख्यांमध्ये अविश्‍वासाची भावना आहे, असा या लोकसभा निवडणुकीतला भाजपाविरोधी पक्षांचा प्रचाराचा मुद्दा होता. हा मुद्दा खोडून काढणारे वर्तन करण्याऐवजी भाजपाचेच नेते व कार्यकर्ते हा मुद्दा खरा असल्याचे सिद्ध करण्याच्या मागे लागले आहेत. त्यामुळे नक्कीच मुस्लिमांमधील असुरक्षिततेचे वातावरण वाढीस लागू शकते. सानिया मिर्झासारख्या नामवंत मुस्लिम खेळाडुंच्या राष्ट्रनिष्ठेविषयीच जाहीरपणे संशय व्यक्त केला जात असेल, 
तर सामान्य मुस्लिमांची काय वाट लागेल, याची कल्पनाच केलेली बरी. मोदी सत्तेवर आल्यानंतर हे जे काही हिंदुत्ववादी नारे लागत आहेत, त्याबाबत स्वत: पंतप्रधान मोदी यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. अशा वक्तव्यांवर त्यांनी मौन धरले तर या वक्तव्यांना त्यांची संमती आहे, असा अर्थ लावला जाईल. मोदी यांचे आतापर्यंतचे वर्तन भारताच्या पंतप्रधानाला साजेसे राहिले आहे, त्यामुळे त्यांची प्रतिमाही बदलू लागली आहे. पण, तोगडिया, ढवळीकर, लक्ष्मण 
प्रभृतींच्या बडबडीला त्यांनी आळा घातला नाही, तर त्याची झळ मोदी यांच्या प्रतिमेला बसल्यावाचून राहणार नाही, हे लक्षात घेतलेले बरे!