शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
4
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
5
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
6
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
7
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
8
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
9
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
10
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
11
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
12
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
13
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
14
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
15
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
16
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
17
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
18
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
19
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
20
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
Daily Top 2Weekly Top 5

भिडे वाड्यातील मुलींची शाळा : स्त्री शिक्षणाच्या पहाटेची १७६ वर्षे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 10:18 IST

म. जोतिराव व सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडे वाडा येथे भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. या घटनेला आज १७६ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त..

महात्मा जोतिराव व सावित्रीबाई फुले, फातिमा शेख यांनी पुण्यातील भिडेवाडा येथे १ जानेवारी १८४८ रोजी भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि स्त्री मुक्तीची पहाट झाली. हा क्षण इतिहासात नोंदला गेला असला तरी त्याचा साक्षीदार असलेला भिडे वाडा मात्र अंधारात राहिला होता. त्यामुळे २५ वर्षांपूर्वी म्हणजे या शाळेला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने १ जानेवारी १९९८ रोजी या महत्त्वाच्या सामाजिक इतिहासाकडे सगळ्यांचे लक्ष वेधण्यासाठी ‘म. फुले वाडा ते भिडे वाडा’ अशी कृतज्ञता मिरवणूक आम्ही आयोजित केली होती.  फुले अभ्यासक दिवंगत फुलवंताअक्का झोडगे, महात्मा फुले यांच्याविषयी माहितीकोश असलेले ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यात सहभागी झाले होते. त्यावेळी पहिल्यांदा भिडे वाडा येथे राष्ट्रीय स्मारक करण्याची मागणी ठळकपणे पुढे आली. तेव्हापासून ‘मुलींची पहिली शाळा सार्वजनिक स्मारक निर्माण समिती’च्या माध्यमातून गेली २५ वर्षे हा लढा सुरू आहे. मोर्चे, आंदोलने, निवेदने, चर्चा या माध्यमातून समितीने स्मारकाचा विषय लावून धरला होता. याबद्दल मा. उच्च व सर्वोच्च न्यायालयाने स्मारक उभारणीचा मार्ग नुकताच प्रशस्त केला आहे.समितीच्या वतीने गेल्या दहा-बारा वर्षांपासून १ जानेवारी हा दिवस ‘स्त्री शिक्षण गौरव दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. शासनानेही हा दिवस ‘स्त्री शिक्षण गौरव दिवस’ म्हणून जाहीर करावा, अशी मागणी समितीने केली होती. त्यानुसार राज्य शासनाने सावित्रीबाई फुले यांचा जयंती दिवस ३ जानेवारी हा ‘स्त्री शिक्षण दिन’ म्हणून जाहीर केला आहे. ही स्वागतार्ह घोषणा आहे. यामुळे समितीची भूमिका शासनाने स्वीकारल्याचे स्पष्ट होते. मात्र ही शाळा १ जानेवारीला सुरू झाली, तसेच ती सुरू करण्यासाठी फुले दांपत्याला इतरही समाजबांधवानी जे साहाय्य केले त्यांचीही उचित दखल घेण्यासाठी १ जानेवारी हा दिवस ‘स्त्री शिक्षण गौरव दिन’ म्हणून अधिक संयुक्तिक असल्याच्या भूमिकेला मान्यता मिळविण्यासाठी समिती प्रयत्नशील असेल.शाळेच्या पहिल्याच दिवशी सावित्रीबाईंना शेण-गोट्यांचा मारा सहन करावा लागला. सावित्रीबाईंसोबत अहमदनगरमध्ये शिक्षिकेचे प्रशिक्षण घेतलेल्या फातिमा शेख यादेखील प्रशिक्षित शिक्षिका म्हणून त्या शाळेत शिकवत.  त्याचा सावित्रीबाईंना मोठा आधार वाटत असे.  सावित्रीबाईंना शाळेच्या पहिल्याच दिवशी विरोध झाल्यानंतर लहुजी वस्ताद साळवे यांनी आपल्या तालमीतील मल्लांचे त्यांना संरक्षण दिले. शिवाय आपल्या घरातील मुक्ता या चिमुकलीला शाळेत शिकण्यासाठी पाठविले. सावित्रीबाईंवर हल्ला झाल्यामुळे सुरुवातीला लोक आपल्या मुली शाळेत घालावयास घाबरत असत. परंतु जोतिराव व सावित्रीबाईनी पालकांच्या भेटी घेऊन त्यांची मते बदलली. त्यामुळे मुलींची संख्या हळूहळू वाढत जाऊन २५ पर्यंत गेल्याचे आढळते. त्यामध्ये नंतर मागास समजल्या जाणाऱ्या जातीतील मुलीही येऊ लागल्या.जोतिराव व सावित्रीबाईनी १८५२ पर्यंत १८ शाळा सुरू केल्याच्या नोंदी आहेत. या शाळेत व्याकरण, भूगोल, गणित, भाषा असे आधुनिक विषय शिकविले जात. यावरून सावित्रीबाईची दूरदृष्टी दिसून येते. मुलींच्या शैक्षणिक प्रगतीस प्रमुख कारण असलेल्या सावित्रीबाईचा जन्मदिन हा ‘स्त्री शिक्षण दिन’ म्हणून जाहीर झाला आहे, पण दुसऱ्या बाजूला या सर्वांची मुहूर्तमेढ जिथे झाली त्या भिडे वाड्याकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष झाले होते. पहिली मुलींची शाळा व पहिल्या भारतीय शिक्षिकेचे नाते या ठिकाणाशी जुळलेले आहे याची माहिती गेल्या २५ वर्षांतील घडामोडींमुळे सगळ्यांना झाली. त्यातून समाजाच्या विविध स्तरांतून आवाज उमटला. तो वाढू लागल्यावर अखेर राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी ठोस घडामोडी घडू लागल्या. सर्वोच्च व उच्च न्यायालयानेही स्मारकाची वाटचाल आता प्रशस्त केली आहे, पण स्त्री मुक्तीची पहाट झालेल्या ठिकाणाला उचित स्मारक उभारून न्याय देणे आता शासन व त्यावर लक्ष ठेवणाऱ्या जनतेच्या हाती आहे.- नितीन पवार, निमंत्रक, ‘मुलींची पहिली शाळा सार्वजनिक स्मारक निर्माण समिती’2nitin.pawar@gmail.com

टॅग्स :WomenमहिलाEducationशिक्षण