शहरं
Join us  
Trending Stories
1
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजपा उमेदवाराच्या कारवर हल्ला
3
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
4
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, फोडल्या काचा
5
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
6
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
7
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
8
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
9
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
10
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
11
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
12
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
13
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
14
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
15
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
16
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
17
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
18
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
19
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
20
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
Daily Top 2Weekly Top 5

सेवेचे निकष ठरविण्याचा टप्पा पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 00:18 IST

विशेषत: हवामानविषयीच्या निरीक्षण करणा-या उपग्रह सेवांच्या संदर्भात सध्या फाइव्ह-जी सुसाट म्हणावे लागेल.

- शैलेश माळोदे । विज्ञान पत्रकार

आंतरराष्टÑीय दूरसंचार संघटना म्हणजे आयटीयू या संयुक्त राष्टÑांच्या अखत्यारीत दूरसंचार तरंगलांबी/पट म्हणजेच नेहमीच्या भाषेत ‘स्पेक्ट्रम’ संदर्भात आणि एकूणच दूरसंचार क्षेत्राचे आंतरराष्टÑीय नियमन करते. तिने नुकतेच ‘फाइव्ह-जी’ दूरसंचार सेवेसाठीचे नवे निकष नुकतेच निश्चित केले आहेत. इजिप्तमध्ये शर्म अल शेख या ठिकाणी २२ नोव्हेंबरपर्यंत जागतिक रेडिओ कम्युनिकेशन परिषद (डब्लूआरसी-१९) फाइव्ह-जी सेवांसाठी २३ गिगाहर्ट्सच्या वरील वर्णपट (बॅन्ड्स) निश्चित करण्याबरोबरच या वर्णपटांतील तसेच त्यांच्यालगत असलेल्या बॅन्ड्समधील उपग्रह सेवांचे योग्य संरक्षण करण्याचा मार्गदेखील ठरवला आहे. या सर्व नियमांचा आवाका भारताने मंजूर आणि सादर केलेल्या प्रस्तावांच्या अनुरूप आहे. जवळपास चार आठवड्यांच्या प्रचंड धावपळीच्या वाटाघाटीनंतर २६, ४०, ४७ आणि ६६ गिगाहर्ट्समध्ये फाइव्ह-जी सेवा स्थापित करण्यासाठी नियमन प्रक्रिया संमत झाली.भारतीय शिष्टमंडळांचे नेतृत्व संचार मंत्रालयाच्या डब्ल्यूपीसी कक्षाने केले. त्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे रात्री खूप उशिरापर्यंत चाललेल्या बंद दरवाजामागील वाटाघाटी फलद्रूप झाल्या. नव्याने स्वीकारण्यात आलेल्या नियमांनुसार फाइव्ह-जी हँडसेट्स आणि इन्फ्रास्ट्रक्चरला (पायाभूत सेवा) पृथ्वीच्या, उपग्रहीय निरीक्षणाला संरक्षण देण्यासाठी त्यांचे उत्सर्जन सध्या २४ Gz बॅण्ड ते २९ Gz पर्यंत आणि २०२७ नंतर ३५ Gz पर्यंत मर्यादित करावे लागणार आहे. फाइव्ह-जी टॉवर्सचे उत्सर्जन सध्याच्या -३३ पासून २०२७ नंतर -३९ डीबी इतके कमी करावे लागणार आहे. परिषदेच्या सुरुवातीस रशियन प्रभावाखालील देश आणि चीनद्वारे फाइव्ह-जीसाठी अजून उच्च बंधने प्रस्तावित करण्यात आली होती. ती -४२ डीबी ते -४८ डीबी इतकी होती. त्यामुळे फाइव्ह-जी सेवा सुरू करणे कठीण झाले असते. भारताने अधिक संतुलित म्हणजे -३५ डीबीची मर्यादा सुचवून फाइव्ह-जी आणि उपग्रह अशा दोन्ही गटांच्या विचारांमध्ये संतुलन साधले. डब्ल्यूआरसी -१९ ने संमत केलेल्या पुढील आठ वर्षांसाठीच्या -२९ ते -३९Gz मर्यादेद्वारे परिषदेने एका अत्यंत नावीन्यपूर्ण अ‍ॅप्रोचद्वारे सर्वांच्या हितसंबंधाचे रक्षण केले आहे.आयटीयू, एपीटी फाउंडेशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष भरत भाटिया यांनी परिषदेत भारताच्या अधिकृत शिष्टमंडळाचे सदस्य म्हणून सहभाग नोंदविला आणि परिषदेच्या निर्णयाचे तसेच भारतीय शिष्टमंडळाच्या या अत्यंत कठीण मुद्द्यांचे समाधान करण्यातील भूमिकेचे स्वागत केले़ सरकार आणि उद्योग दोघांनी एकसुरात या फाइव्ह-जी बाबतच्या या कराराचे समर्थन केले. या परिषदेत जागतिक स्तरावर फाइव्ह-जी सेवांचा प्रसार होण्यासाठीचा पाया रचला गेला.रेल्वे रेडिओ संचार प्रणाली रेल्वेगाड्या आणि रूळ यांच्यातील नवीन समन्वय तंत्रज्ञानामुळे रेल्वेची गती वाढविण्याबरोबरच ट्रॅफिक नियंत्रण, प्रवाशांची सुरक्षा आणि ट्रेन्स कार्यान्वयात सुरक्षितता अधिक प्रभावी होईल. इंटेलिजन्स ट्रान्सपोर्ट प्रणालीसाठी आयसीटी तंत्रज्ञान वापरून वाहने जोडली जातील आणि ट्रॅफिक व्यवस्थापन आणि सुरक्षित वाहनचालन सुलभ होईल.व्हिजन २०३० अंतर्गत २०२३ साली भरविण्यात येणाऱ्या परिषदेसाठी (जागतिक रेडिओ संचार परिषद) कार्यसूचीदेखील या परिषदेत ठरली. यामध्ये अर्थटेशन्स इन मोशन (म्हणजे पृथ्वीवरील स्थिर केंद्राऐवजी विमाने, जहाजांना त्यांचा प्रवास सुरू असताना स्थितर उपग्रहीय सेवा भूस्थिर कक्षेत नसलेल्या अवकाश केंद्राद्वारे पुरविण्यात येण्यासंबंधी निर्णय घेण्याबरोबरच एरॉनॉटिकल मोबाइल उपयोजनांबाबत निर्णय घेण्यासहित अनेक महत्त्वाच्या गोष्टी असणार आहेत. विशेषत: हवामानविषयीच्या निरीक्षण करणा-या उपग्रह सेवांच्या संदर्भात सध्या फाइव्ह-जी सुसाट म्हणावे लागेल.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान