शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

उदंड अर्ज, अपुरी माहिती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:45 IST

विरोधकांनी नेहमीप्रमाणे सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला अन् मुख्यमंत्र्यांचा जीव भांड्यात पडला. चला, तेवढेच चहापानाचे पैसे वाचले! नाहीतरी विरोधकांना दुधात मिठाचे खडे टाकायची सवयच असते म्हणा. आधीच मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट फार. मी म्हणतो, या उंदरांनी सरकारी फायली कुरतडण्याऐवजी माहिती अधिकाराचे अर्ज का कुरतडू नये?

 - नंदकिशोर पाटीलविरोधकांनी नेहमीप्रमाणे सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला अन् मुख्यमंत्र्यांचा जीव भांड्यात पडला. चला, तेवढेच चहापानाचे पैसे वाचले! नाहीतरी विरोधकांना दुधात मिठाचे खडे टाकायची सवयच असते म्हणा. आधीच मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट फार. मी म्हणतो, या उंदरांनी सरकारी फायली कुरतडण्याऐवजी माहिती अधिकाराचे अर्ज का कुरतडू नये? उगीच ते ‘आरटीआय’वाले नको तिथं तोंड घालत असतात. परवा तर त्यांनी गेल्या चार वर्षात किती टिश्शूपेपर वापरले गेले, याचीच माहिती मागितली! आता हा हिशेब कोण ठेवणार? समजा ठेवला, तरी ते आघाडी सरकारच्या काळात आणि युतीच्या काळात वापरलेल्या टिश्शूपेपरचा हिशेब मांडणार आणि न्यूजचॅनलवर फडणवीस सरकारचा ‘टिश्शूपेपर घोटाळा’! अशी ब्रेकिंगन्यूज झळकणार. तरी बरं, मंत्रालयातील सामान्य प्रशासनात खूप हुशार लोकं बसलेली आहेत. टिश्शूपेपरच्या अर्जावर त्यांनी सरळ उत्तर देऊन टाकले ‘सरकारचा कारभार आता पेपरलेस झाला असल्यामुळे टिश्शूपेपरची आवश्यकता उरलेली नाही. सबब हा अर्ज निकाली काढण्यात येत आहे!’परवा सुधीरभाऊ सांगत होते. वृक्षारोपण अभियानाबद्दल त्यांच्याकडेही म्हणे ‘आपण लावलेल्या तीन कोटी वृक्षांपैकी किती झाडं जगली? अशी विचारणा करणारा माहितीचा अर्ज आला होता. त्यावर वनखात्याच्या अव्वल सचिवाने लिहिले-‘सदर अभियानात रोपांची लागवड करण्यात आली होती. रोपटं अजून शिशु अवस्थेत आहेत. ते झाडात आले की आपणास कळविले जाईल!’ वनखात्याकडून आलेले हे उत्तर वाचून तो आरटीआय कार्यकर्ता हातात दोरखंड घेऊन झाडांच्या शोधात रानोमाळ फिरत असल्याचे कळते...परवा आमचा जळगावी नियोजित दौरा होता. ंअमृत योजनेचे भूमिपूजन आणि इतर कार्यक्रम ठरलेले होते. पण निमंत्रण पत्रिकेतील प्रमुख अतिथींची यादी बघून अचानक आमच्या पोटात कळ आली. त्यामुळे ऐनवेळी आम्हाला तो दौरा रद्द करावा लागला. त्यावरही एकाने लागलीच दुसऱ्या दिवशी आरटीआयखाली लांबलचक अर्ज धाडला. ‘तब्येतीचे कारण पुढे करून आपण जळगावचा दौरा रद्द केला हे खरे असेल तर आपण कोणत्या डॉक्टरांकडे औषधोपचार घेतले? की आपले पूर्वाश्रमीचे ज्येष्ठ सहकारी नाथाभाऊंचे नाव पत्रिकेत बघून आपल्या पोटात मुरडा आला? जर तसे असेल तर यावर कायमचा विलाज का करून घेत नाही?की तुम्ही येण्याची गरज नाही. मी बघून घेतो, असा शरद पवारांनीच सल्ला दिला होता? की तुम्हास जळगावपेक्षा अण्णा हजारे यांचे उपोषण महत्त्वाचे वाटले? तसे असेल तर अण्णांना तुम्ही जे लिंबूपाणी पाजले, ते लिंबू तुम्ही कुठून मागवले होते का? जर ते बारामतीहून मागविले असतील तर त्यावर किती खर्च आला? की ते फुकटात मिळाले?’ मारुतीच्या शेपटीहून लांबलचक असा हा अर्ज वाचून मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचा-यांना अक्षरश: घाम फुटला. तो पुसता-पुसता कार्यालयातील सगळे टिश्शूपेपर संपले!ता.क. माहिती अधिकाराच्या अर्जातून सुटका करून घेण्यासाठी सरकार एक विधेयक आणण्याच्या विचारात आहे. विधेयकाचे नाव असेल, ‘माहिती प्रतिबंधक, शासकीय अधिकार विधेयक!’

टॅग्स :Mantralayaमंत्रालयMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार