शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

उदंड अर्ज, अपुरी माहिती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:45 IST

विरोधकांनी नेहमीप्रमाणे सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला अन् मुख्यमंत्र्यांचा जीव भांड्यात पडला. चला, तेवढेच चहापानाचे पैसे वाचले! नाहीतरी विरोधकांना दुधात मिठाचे खडे टाकायची सवयच असते म्हणा. आधीच मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट फार. मी म्हणतो, या उंदरांनी सरकारी फायली कुरतडण्याऐवजी माहिती अधिकाराचे अर्ज का कुरतडू नये?

 - नंदकिशोर पाटीलविरोधकांनी नेहमीप्रमाणे सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला अन् मुख्यमंत्र्यांचा जीव भांड्यात पडला. चला, तेवढेच चहापानाचे पैसे वाचले! नाहीतरी विरोधकांना दुधात मिठाचे खडे टाकायची सवयच असते म्हणा. आधीच मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट फार. मी म्हणतो, या उंदरांनी सरकारी फायली कुरतडण्याऐवजी माहिती अधिकाराचे अर्ज का कुरतडू नये? उगीच ते ‘आरटीआय’वाले नको तिथं तोंड घालत असतात. परवा तर त्यांनी गेल्या चार वर्षात किती टिश्शूपेपर वापरले गेले, याचीच माहिती मागितली! आता हा हिशेब कोण ठेवणार? समजा ठेवला, तरी ते आघाडी सरकारच्या काळात आणि युतीच्या काळात वापरलेल्या टिश्शूपेपरचा हिशेब मांडणार आणि न्यूजचॅनलवर फडणवीस सरकारचा ‘टिश्शूपेपर घोटाळा’! अशी ब्रेकिंगन्यूज झळकणार. तरी बरं, मंत्रालयातील सामान्य प्रशासनात खूप हुशार लोकं बसलेली आहेत. टिश्शूपेपरच्या अर्जावर त्यांनी सरळ उत्तर देऊन टाकले ‘सरकारचा कारभार आता पेपरलेस झाला असल्यामुळे टिश्शूपेपरची आवश्यकता उरलेली नाही. सबब हा अर्ज निकाली काढण्यात येत आहे!’परवा सुधीरभाऊ सांगत होते. वृक्षारोपण अभियानाबद्दल त्यांच्याकडेही म्हणे ‘आपण लावलेल्या तीन कोटी वृक्षांपैकी किती झाडं जगली? अशी विचारणा करणारा माहितीचा अर्ज आला होता. त्यावर वनखात्याच्या अव्वल सचिवाने लिहिले-‘सदर अभियानात रोपांची लागवड करण्यात आली होती. रोपटं अजून शिशु अवस्थेत आहेत. ते झाडात आले की आपणास कळविले जाईल!’ वनखात्याकडून आलेले हे उत्तर वाचून तो आरटीआय कार्यकर्ता हातात दोरखंड घेऊन झाडांच्या शोधात रानोमाळ फिरत असल्याचे कळते...परवा आमचा जळगावी नियोजित दौरा होता. ंअमृत योजनेचे भूमिपूजन आणि इतर कार्यक्रम ठरलेले होते. पण निमंत्रण पत्रिकेतील प्रमुख अतिथींची यादी बघून अचानक आमच्या पोटात कळ आली. त्यामुळे ऐनवेळी आम्हाला तो दौरा रद्द करावा लागला. त्यावरही एकाने लागलीच दुसऱ्या दिवशी आरटीआयखाली लांबलचक अर्ज धाडला. ‘तब्येतीचे कारण पुढे करून आपण जळगावचा दौरा रद्द केला हे खरे असेल तर आपण कोणत्या डॉक्टरांकडे औषधोपचार घेतले? की आपले पूर्वाश्रमीचे ज्येष्ठ सहकारी नाथाभाऊंचे नाव पत्रिकेत बघून आपल्या पोटात मुरडा आला? जर तसे असेल तर यावर कायमचा विलाज का करून घेत नाही?की तुम्ही येण्याची गरज नाही. मी बघून घेतो, असा शरद पवारांनीच सल्ला दिला होता? की तुम्हास जळगावपेक्षा अण्णा हजारे यांचे उपोषण महत्त्वाचे वाटले? तसे असेल तर अण्णांना तुम्ही जे लिंबूपाणी पाजले, ते लिंबू तुम्ही कुठून मागवले होते का? जर ते बारामतीहून मागविले असतील तर त्यावर किती खर्च आला? की ते फुकटात मिळाले?’ मारुतीच्या शेपटीहून लांबलचक असा हा अर्ज वाचून मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचा-यांना अक्षरश: घाम फुटला. तो पुसता-पुसता कार्यालयातील सगळे टिश्शूपेपर संपले!ता.क. माहिती अधिकाराच्या अर्जातून सुटका करून घेण्यासाठी सरकार एक विधेयक आणण्याच्या विचारात आहे. विधेयकाचे नाव असेल, ‘माहिती प्रतिबंधक, शासकीय अधिकार विधेयक!’

टॅग्स :Mantralayaमंत्रालयMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार