शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

ही तर नव्या पेशवाईची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 02:51 IST

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ या दिवशी मानवमुक्तीसाठी जनलढा उभारुन निसर्गस्त पाणी पिण्याचा - लोटीबंदीचा कार्यक्रम महाड मुक्कामी पार पाडला.

- ज. वि. पवारघटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ या दिवशी मानवमुक्तीसाठी जनलढा उभारुन निसर्गस्त पाणी पिण्याचा - लोटीबंदीचा कार्यक्रम महाड मुक्कामी पार पाडला. पाण्याला आग लावणा-या व त्या योगे सरपटणा-या कणाहिन समुहाला ताठ कणा प्रदान करणा-या या क्रांतीशस्त्राचा विसर पडावा म्हणून याच दिवशी सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक न्याय व दुर्बल घटकांच्या संरक्षणासाठी विशेष तरतुदी नाकरण्याचे पहिले पाऊल टाकले. भारतीय संविधान नाकारणे व लोकशाही उध्वस्त करणे हा एककलमी कार्यक्रम राबविण्यात आला आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेवर असलेला विश्वासाला तडा गेला आहे.या निकालाला २० मार्चच्या बाबासाहेबांच्या महाडच्या धर्मसंगराची किनार आहे तशीच ती कोरेगाव भीमा प्रकरणी नं. १ चे आरोपी मनोहर कुलकर्णी तथा संभाजी भिडे यांच्या अटकपूर्व जामिनाची किनार आहे. या कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी दोन नंबरचे आरोपी मिलिंद एकबोटे यांना सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यामुळे त्यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. एकबोटे यांचे प्रभावक्षेत्र लक्षणीय नाही. परंतु भिडे हे राज्य व केंद्र सरकारचे ‘गुरू’ आहेत. प्रधानसेवक नरेंद्र मोदी यांना त्यांची सेवा करण्यात अलौकिक आनंद मिळतो. त्यांना या नव्या कायदेशीर तरतुदीनुसार अटकपूर्व जामीन नाकारलाच जाईल असे नाही. म्हणजे एका व्यक्तीच्या संरक्षणासाठी करोडो लोकांच्या भवितव्याशी खेळ मांडियला. बरे हे ‘जामीन’ प्रकरण निकालात काढण्यासाठी पोलीस यंत्रणेवर विश्वास ठेवायचा, संबंधित न्यायिक यंत्रणेवर नाही ही संविधानाची प्रतारणा नाही का?यासंदर्भात प्रा. पी.एस. कृष्णन यांनी केंद्रीय न्यायमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करणे मला क्रमप्राप्त आहे. कृष्णन हे या खात्याचे राजीव गांधींच्या काळात सेक्रेटरी होते. ‘अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट’ संदर्भात त्यांचे योगदान होते. त्यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, या निर्णयामुळे सामाजिक न्यायव्यवस्था लुळीपांगळी झाली आहे. एखाद्या प्रकरणी पोलीस खात्याने तपास करून खरा प्रकार कोर्टासमोर आणला की पीडितांनाच बळी देण्याचे प्रकार केल्याच्या संदर्भात काही अन्यायाची प्रकरणे समोर आणली आहेत.सरकारी कर्मचाºयांना बढती मिळू नये म्हणून त्यांचे सी.आर. खराब करणे हे तर सार्वत्रिक आहे. अशा अवस्थेत बळी जाणाºयांची संख्या वाढेल हे सांगायची आवश्यकता नाही. डॉ. सुभाष महाजन प्रकरणी न्याय देताना अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग होतो हा निष्कर्ष नोंदविला आहे. हा निष्कर्ष नोंदविताना त्यांनी राष्ट्रीय गुन्हे अभिलेख यंत्रणेचा २०१६ चा अहवाल गृहीत धरला आहे. या अहवालात ५,३४७ गुन्हे खोटे असल्याचे नोंदविले असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु त्याच वर्षात ४०,८०१ नोंदविलेले गुन्हे खरे होते याकडे त्यांनी का डोळेझाक केली? म्हणजे आपल्याला जो निर्णय द्यायचा आहे तो आधीच ठरविलेला असतो हे यावरून स्पष्ट होते.अ‍ॅट्रॉसिट अ‍ॅक्ट नोंदविणाºयांना आर्थिक मदत मिळते म्हणून हे गुन्हे नोंदविले जातात, असेही काही महाभाग म्हणतात. मराठा मोर्चाने हा प्रश्न ऐरणीवर आणला होता. त्यांना आरक्षण पाहिजे आहे. तो समाजही सत्ताधारी आहे. त्यांना आरक्षण असण्यापेक्षा दलितांचे आरक्षण नष्ट करायचे आहे. अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट निकामी करण्याचे पाऊल उचलणे म्हणजे विशेषाधिकार असलेले नोकरी व शिक्षणविषयक आरक्षण रद्द करणे, हे समग्र दलितांना, त्यांच्या पोटभरू नेत्यांना कळले तरच पुढील अरिष्ट टळेल. अन्यथा नवी पेशवाई जन्माला आलीच आहे. दु:ख या गोष्टीचे की या पेशवाईला न्यायव्यवस्थेचे समर्थन मिळत आहे.

टॅग्स :Courtन्यायालय