शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 07:44 IST

नागझिरा प्रकल्पातील वाचलेला वाघ नव्या ‘राजा’ला आव्हान देईल, की क्षेत्र सोडून जाईल? माद्या ‘खोटे मिलन’ करून पिलांना वाचवू शकतील?   - उत्तरार्ध

संजय करकरे, उपसंचालक, सृष्टी कन्झर्वेशन फाउंडेशन, नागपूर

नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या कुटुंबात आणखी एक वयात येऊ लागलेला नर वाघ आहे. T 4 वाघिणीचा हा दुसरा वाचलेला नर वाघ आता पुढच्या काळात, नव्यानं दाखल झालेल्या या वाघाला कसं सामोरे जातो, पराभूत होतो की, हे क्षेत्र सोडून अन्यत्र निघून जातो हे काळच सांगू शकेल. यासोबतच अन्य तीन माद्यांना असणारी पिलं साधारण वर्षभराची असल्यानं या नव्या नर वाघाच्या तावडीतून कशी वाचतात अथवा या तीन माद्या या शावकांचं कसं संरक्षण करतील, हा कुतूहलाचा विषय राहील.

मार्जारकुळात प्रामुख्याने नर स्वतःचे क्षेत्र तयार करतो. ज्या ठिकाणी मुबलक खाद्य आणि सुरक्षितता आहे असं क्षेत्र तो निवडतो. त्याचबरोबर त्याच्या क्षेत्रामधील माद्यांनाही आपल्या अधिपत्याखाली तो ठेवतो. नर वाघाचंं क्षेत्र ३०-४० चौरस किलोमीटरपासून १५० चौरस किलोमीटरपर्यंत असू शकते. या सर्व क्षेत्राला तो प्राणपणाने जपतो. 

अन्य नर वाघ या क्षेत्रात येणार नाही आणि आपल्या माद्यांवर नियंत्रण मिळवणार नाही याची पुरेपूर काळजी हा नर घेतो. मात्र बरेचदा उतारवयाकडे झुकू लागलेल्या नरांना, ताज्या दमाच्या अथवा जबरदस्त ताकदीच्या तरुण नरांकडून आव्हान दिलं जातं आणि येथेच सत्तांतर घडतं. 

सत्तांतर घडल्यानंतर बरेच वेळा माद्यांना मिलनास उत्सुक करण्यासाठी, त्यांची पिल्ले (शावक) या नव्या नर वाघाकडून मारली जातात. या पिल्लांना मारल्यावरच माद्या, मिलनासाठी प्रतिसाद देतात. त्यामुळे या कठीण काळाला माद्यांना सामोरे जावे लागते. अनेक वेळा माद्या या नर वाघांशी ‘खोटे मिलन’ करून आपल्या पिल्लांना या नरांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. जंगलात नर वाघांची घनता अधिक असेल तर तेथील माद्यांना अशा कठीण प्रसंगांना वारंवार सामोरे जावे लागते. 

ताडोबा, रणथंबोर व बांधवगडच्या व्याघ्र प्रकल्पात अनेक वेळा अशा घटना आणि सत्तांतर बघितले गेले आहे. निसर्ग नियमाचाच हा जणू एक भाग बनला आहे. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात गेल्या काही वर्षांपासून वाघांची संख्या हा कायम चर्चेचा आणि अभ्यासाचा विषय राहिला आहे. रानकुत्र्यांमुळे वाघांची संख्या कमी झाली का, वाघांचे खाद्य तेथे पुरेसे आहे का, यासोबतच येथील जंगलात वाघ फार काळ टिकत नाहीत याबाबत अनेक तर्क मांडले जातात. 

या जंगलातील वाघांची संख्या कमी झाल्याचे बघूनच, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून गेल्या दोन वर्षांत तीन वाघिणींना या क्षेत्रात संवर्धन स्थलांतरणाच्या प्रक्रियेद्वारे सोडण्यात आले. यातील तीनपैकी दोन वाघिणी सध्या नागझिरा अभयारण्याच्या वेशीवर स्थिरावल्या आहेत. त्यातील एका वाघिणीला पिल्लं झाल्याचंही सांगितलं जातंय. सध्याची स्थिती बघता येथील जंगलात चार वाघिणींना पिल्लं आहेत. पूर्वी या व्याघ्र प्रकल्पात वाघिणीला दोन आणि तीन पिलं झाल्याची नोंद आहे. आता मात्र या वाघिणींना तीन आणि चार पिलं झाली आहेत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील या वाघाच्या बळकट जनुकांचा परिणाम या वाघिणींच्या वंशावळीची वृद्धी येथील जंगलात होण्यात झाला असेल असं म्हटलं जाऊ शकतं. मात्र चार पिल्लांना पुरेसं खाद्य उपलब्ध आहे का, हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. जंगलात वाघ टिकायचे झाल्यास योग्य निवाऱ्याबरोबरच, चितळ व सांबर हे त्याचंं खाद्य पुरेसं मिळणे आवश्यक आहे. यासाठी या तृणभक्षी प्राण्यांना पुरेसं गवती कुरण आहे का, हेदेखील बघणं महत्त्वाचं ठरेल. म्हणजेच वाघाच्या खाद्याला योग्य पद्धतीने वाढवून, त्यांना संरक्षण देऊन पुढे नेलं तर या जंगलात नैसर्गिकरीत्या वाघांची संख्या वाढून नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील वाघाच्या संख्येला बळकटी येईल. माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ आहे. तो घडत राहणारच !    sanjay.karkare@gmail.com

टॅग्स :Tigerवाघ