शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 07:44 IST

नागझिरा प्रकल्पातील वाचलेला वाघ नव्या ‘राजा’ला आव्हान देईल, की क्षेत्र सोडून जाईल? माद्या ‘खोटे मिलन’ करून पिलांना वाचवू शकतील?   - उत्तरार्ध

संजय करकरे, उपसंचालक, सृष्टी कन्झर्वेशन फाउंडेशन, नागपूर

नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या कुटुंबात आणखी एक वयात येऊ लागलेला नर वाघ आहे. T 4 वाघिणीचा हा दुसरा वाचलेला नर वाघ आता पुढच्या काळात, नव्यानं दाखल झालेल्या या वाघाला कसं सामोरे जातो, पराभूत होतो की, हे क्षेत्र सोडून अन्यत्र निघून जातो हे काळच सांगू शकेल. यासोबतच अन्य तीन माद्यांना असणारी पिलं साधारण वर्षभराची असल्यानं या नव्या नर वाघाच्या तावडीतून कशी वाचतात अथवा या तीन माद्या या शावकांचं कसं संरक्षण करतील, हा कुतूहलाचा विषय राहील.

मार्जारकुळात प्रामुख्याने नर स्वतःचे क्षेत्र तयार करतो. ज्या ठिकाणी मुबलक खाद्य आणि सुरक्षितता आहे असं क्षेत्र तो निवडतो. त्याचबरोबर त्याच्या क्षेत्रामधील माद्यांनाही आपल्या अधिपत्याखाली तो ठेवतो. नर वाघाचंं क्षेत्र ३०-४० चौरस किलोमीटरपासून १५० चौरस किलोमीटरपर्यंत असू शकते. या सर्व क्षेत्राला तो प्राणपणाने जपतो. 

अन्य नर वाघ या क्षेत्रात येणार नाही आणि आपल्या माद्यांवर नियंत्रण मिळवणार नाही याची पुरेपूर काळजी हा नर घेतो. मात्र बरेचदा उतारवयाकडे झुकू लागलेल्या नरांना, ताज्या दमाच्या अथवा जबरदस्त ताकदीच्या तरुण नरांकडून आव्हान दिलं जातं आणि येथेच सत्तांतर घडतं. 

सत्तांतर घडल्यानंतर बरेच वेळा माद्यांना मिलनास उत्सुक करण्यासाठी, त्यांची पिल्ले (शावक) या नव्या नर वाघाकडून मारली जातात. या पिल्लांना मारल्यावरच माद्या, मिलनासाठी प्रतिसाद देतात. त्यामुळे या कठीण काळाला माद्यांना सामोरे जावे लागते. अनेक वेळा माद्या या नर वाघांशी ‘खोटे मिलन’ करून आपल्या पिल्लांना या नरांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. जंगलात नर वाघांची घनता अधिक असेल तर तेथील माद्यांना अशा कठीण प्रसंगांना वारंवार सामोरे जावे लागते. 

ताडोबा, रणथंबोर व बांधवगडच्या व्याघ्र प्रकल्पात अनेक वेळा अशा घटना आणि सत्तांतर बघितले गेले आहे. निसर्ग नियमाचाच हा जणू एक भाग बनला आहे. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात गेल्या काही वर्षांपासून वाघांची संख्या हा कायम चर्चेचा आणि अभ्यासाचा विषय राहिला आहे. रानकुत्र्यांमुळे वाघांची संख्या कमी झाली का, वाघांचे खाद्य तेथे पुरेसे आहे का, यासोबतच येथील जंगलात वाघ फार काळ टिकत नाहीत याबाबत अनेक तर्क मांडले जातात. 

या जंगलातील वाघांची संख्या कमी झाल्याचे बघूनच, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून गेल्या दोन वर्षांत तीन वाघिणींना या क्षेत्रात संवर्धन स्थलांतरणाच्या प्रक्रियेद्वारे सोडण्यात आले. यातील तीनपैकी दोन वाघिणी सध्या नागझिरा अभयारण्याच्या वेशीवर स्थिरावल्या आहेत. त्यातील एका वाघिणीला पिल्लं झाल्याचंही सांगितलं जातंय. सध्याची स्थिती बघता येथील जंगलात चार वाघिणींना पिल्लं आहेत. पूर्वी या व्याघ्र प्रकल्पात वाघिणीला दोन आणि तीन पिलं झाल्याची नोंद आहे. आता मात्र या वाघिणींना तीन आणि चार पिलं झाली आहेत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील या वाघाच्या बळकट जनुकांचा परिणाम या वाघिणींच्या वंशावळीची वृद्धी येथील जंगलात होण्यात झाला असेल असं म्हटलं जाऊ शकतं. मात्र चार पिल्लांना पुरेसं खाद्य उपलब्ध आहे का, हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. जंगलात वाघ टिकायचे झाल्यास योग्य निवाऱ्याबरोबरच, चितळ व सांबर हे त्याचंं खाद्य पुरेसं मिळणे आवश्यक आहे. यासाठी या तृणभक्षी प्राण्यांना पुरेसं गवती कुरण आहे का, हेदेखील बघणं महत्त्वाचं ठरेल. म्हणजेच वाघाच्या खाद्याला योग्य पद्धतीने वाढवून, त्यांना संरक्षण देऊन पुढे नेलं तर या जंगलात नैसर्गिकरीत्या वाघांची संख्या वाढून नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील वाघाच्या संख्येला बळकटी येईल. माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ आहे. तो घडत राहणारच !    sanjay.karkare@gmail.com

टॅग्स :Tigerवाघ