शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
4
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
5
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
6
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
7
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
8
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
9
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
10
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
11
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
12
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
13
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS
14
Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?
15
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
16
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
17
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
18
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
19
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
20
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?

प्रवासी सुखी भव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 22:51 IST

एकेकाळी श्रीमंत प्रवासी वाहतूक सेवा, अशी ओळख बेस्ट बसची होती. 

- विनायक पात्रुडकर

महागाई खूप आहे. खर्च वाढतोय. दर वाढवण्याशिवाय पर्याय नाही, अशी ओरड गेली तीन दशके देशातील प्रत्येक प्रशासन करत आहे. अशी ओरड करत प्रत्येक प्रशासनाने दर वाढ केली. प्रवासी भाडे वाढले. हे सर्व करत असताना सर्वसामान्य नागरिक, प्रवासी याचा कधीही विचार केला गेला नाही. आर्थिक मंदी एवढाच मुद्दा पुढे केला जात होता. आता मात्र सर्वसामान्य नागरिक व प्रवाशांची आठवण राजकीय नेत्यांपासून सर्व प्रशासनाला आली आहे. यात आघाडीवर आहे ते म्हणजे बेस्ट प्रशासन. 

एकेकाळी श्रीमंत प्रवासी वाहतूक सेवा, अशी ओळख बेस्ट बसची होती. या सेवेला पर्यायदेखील नव्हता. काही वाहक-चालकांची मुजोरीही खूप होती. प्रवाशांना न जुमाण्याचे प्रकार काही वाहक-चालक करायचे. ही मुजोरी फार काळा टिकली नाही. या सेवेला उतरती कळा लागली. प्रशासनाला कर्ज घेऊन कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याची वेळ आली. खाजगीकरणाच्या पर्यायाची चाचपणी सुरू झाली.आर्थिक संकटांत असलेल्या बेस्टला तारण्यासाठी प्रवाशांची आठवण कोणाला तरी झाली़ प्रवासीच बेस्टला तारू शकतात, या साक्षात्कारावर शिक्कामोर्तब झाले़ महागाई व इंधन दर परवडत नाही, असा दावा करत केलेली प्रवास भाडे वाढ चक्क दुप्पटीने कमी करण्याच विचार पुढे आला़ किमान भाडे ८ रूपयांवरून ५ करण्याचा विचार सुरू झाला़ एसी बसचेही किमान भाडे ६ रूपये करण्याचे ठरले़ ही सर्व उठाठेव प्रवासी संख्या वाढवण्यासाठी सुरू आहे़ मात्र हे उशिराने सुचलेले शहाणपण म्हटले तर वावगे ठरणार नाही़ प्रवासी असतील तरच बेस्ट बस सुरू राहिल हे शाळेतील विद्यार्थीही ठामपणे सांगू शकेल़ आपले पोट भरणाऱ्या प्रवाशाची काळजी घेण्यात बेस्टने थोडा हात आखडताच घेतला़ त्याचा फायदा खासगी टॅक्सी, रिक्षा चालकांनी घेतला. त्यांचे अधिकृत स्टॅण्ड गल्लोगल्लीत उभे राहिले. शेअरींग सेवा इतकी प्रचलीत झाली की बेस्टला आपोआप उतरती कळा लागली.

 या खाजगी सेवांनी काही दिव्य काम केले नाही़ प्रवाशांना त्यांच्या वेळेत व त्यांना परवडेल, अशी सेवा दिली़ त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला़ शेकडो हातांना रोजगार मिळाला़ या सेवेत महिलांनाही संधी मिळाली़ अशा परिस्थितीत बेस्ट बसला तारणे म्हणजे प्रवाशांना आकर्षित करणे हा एकमेव पर्याय होता व तो बेस्ट प्रशासनाने अवलंबला़ अशी अवस्था इतर प्रशासनांची व त्यांच्या कर्मचाऱ्यांची होऊ शकते़ डबघाईला आल्यानंतर किंवा नोकरीवर गदा आल्यावर त्यांनी सर्वसामान्य नागरिकांची आठवण करू नये़ त्याऐवजी सर्वसामान्य नागरिकांना कशा दर्जेदार सुविधा मिळतील, याकडे लक्ष द्यावे, तरच भविष्यात सरकारी कार्यालये टिकतील अन्यथा सर्व कामे खासगी कंपन्या करतील़ जेथे ना आंदोलनाची संधी असेल, ना मागण्या करण्याची...

 

 

टॅग्स :BESTबेस्ट