शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी सुखी भव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 22:51 IST

एकेकाळी श्रीमंत प्रवासी वाहतूक सेवा, अशी ओळख बेस्ट बसची होती. 

- विनायक पात्रुडकर

महागाई खूप आहे. खर्च वाढतोय. दर वाढवण्याशिवाय पर्याय नाही, अशी ओरड गेली तीन दशके देशातील प्रत्येक प्रशासन करत आहे. अशी ओरड करत प्रत्येक प्रशासनाने दर वाढ केली. प्रवासी भाडे वाढले. हे सर्व करत असताना सर्वसामान्य नागरिक, प्रवासी याचा कधीही विचार केला गेला नाही. आर्थिक मंदी एवढाच मुद्दा पुढे केला जात होता. आता मात्र सर्वसामान्य नागरिक व प्रवाशांची आठवण राजकीय नेत्यांपासून सर्व प्रशासनाला आली आहे. यात आघाडीवर आहे ते म्हणजे बेस्ट प्रशासन. 

एकेकाळी श्रीमंत प्रवासी वाहतूक सेवा, अशी ओळख बेस्ट बसची होती. या सेवेला पर्यायदेखील नव्हता. काही वाहक-चालकांची मुजोरीही खूप होती. प्रवाशांना न जुमाण्याचे प्रकार काही वाहक-चालक करायचे. ही मुजोरी फार काळा टिकली नाही. या सेवेला उतरती कळा लागली. प्रशासनाला कर्ज घेऊन कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याची वेळ आली. खाजगीकरणाच्या पर्यायाची चाचपणी सुरू झाली.आर्थिक संकटांत असलेल्या बेस्टला तारण्यासाठी प्रवाशांची आठवण कोणाला तरी झाली़ प्रवासीच बेस्टला तारू शकतात, या साक्षात्कारावर शिक्कामोर्तब झाले़ महागाई व इंधन दर परवडत नाही, असा दावा करत केलेली प्रवास भाडे वाढ चक्क दुप्पटीने कमी करण्याच विचार पुढे आला़ किमान भाडे ८ रूपयांवरून ५ करण्याचा विचार सुरू झाला़ एसी बसचेही किमान भाडे ६ रूपये करण्याचे ठरले़ ही सर्व उठाठेव प्रवासी संख्या वाढवण्यासाठी सुरू आहे़ मात्र हे उशिराने सुचलेले शहाणपण म्हटले तर वावगे ठरणार नाही़ प्रवासी असतील तरच बेस्ट बस सुरू राहिल हे शाळेतील विद्यार्थीही ठामपणे सांगू शकेल़ आपले पोट भरणाऱ्या प्रवाशाची काळजी घेण्यात बेस्टने थोडा हात आखडताच घेतला़ त्याचा फायदा खासगी टॅक्सी, रिक्षा चालकांनी घेतला. त्यांचे अधिकृत स्टॅण्ड गल्लोगल्लीत उभे राहिले. शेअरींग सेवा इतकी प्रचलीत झाली की बेस्टला आपोआप उतरती कळा लागली.

 या खाजगी सेवांनी काही दिव्य काम केले नाही़ प्रवाशांना त्यांच्या वेळेत व त्यांना परवडेल, अशी सेवा दिली़ त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला़ शेकडो हातांना रोजगार मिळाला़ या सेवेत महिलांनाही संधी मिळाली़ अशा परिस्थितीत बेस्ट बसला तारणे म्हणजे प्रवाशांना आकर्षित करणे हा एकमेव पर्याय होता व तो बेस्ट प्रशासनाने अवलंबला़ अशी अवस्था इतर प्रशासनांची व त्यांच्या कर्मचाऱ्यांची होऊ शकते़ डबघाईला आल्यानंतर किंवा नोकरीवर गदा आल्यावर त्यांनी सर्वसामान्य नागरिकांची आठवण करू नये़ त्याऐवजी सर्वसामान्य नागरिकांना कशा दर्जेदार सुविधा मिळतील, याकडे लक्ष द्यावे, तरच भविष्यात सरकारी कार्यालये टिकतील अन्यथा सर्व कामे खासगी कंपन्या करतील़ जेथे ना आंदोलनाची संधी असेल, ना मागण्या करण्याची...

 

 

टॅग्स :BESTबेस्ट