शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
धक्कादायक! जालन्यात शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, कारण अद्याप अस्पष्ट
3
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
4
The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू
5
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
6
McDonald's नं भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्याला दिलं ३५ लाखांचं बक्षीस, अमेरिकेत 'डिनर'देखील करवलं
7
Numerology: होणारी बायको कशी असणार? हे जन्मतारखेवरुन कळणार! मूलांकानुसार जाणून घ्या भविष्य
8
Bombay HC: थकबाकी दिल्याशिवाय खरेदीदाराला सोसायटीचे सदस्यत्व नाही: हायकोर्ट
9
भारतीय नौदलाची INS सुकन्या अन् पाकिस्तानचं PNS सैफ युद्धनौका समोरासमोर, त्यानंतर...
10
अदानी समूहाची 'या' दिग्गज कंपनीतून एक्झिट; विकला उरलासुरला हिस्सा; तुमच्याकडे आहेत का हे शेअर्स?
11
NIA Terrorist: दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी दोन डॉक्टरांना उचलले, कॅब चालक, ऊर्दू शिक्षकाचीही चौकशी
12
Pakistan: शिक्षा पूर्ण झालेल्या मच्छीमाराचा पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू
13
'नो-कॉस्ट EMI' चे सत्य काय? कंपन्या आणि बँका प्रोसेसिंग फीसच्या नावाखाली वसूल करतात 'इतके' शुल्क!
14
Delhi Blast : परदेशातील हँडलरने पाठवले सुसाईड बॉम्बिंगचे ३६ व्हिडीओ; मुझम्मिल-उमरचं झालं ब्रेनवॉश
15
Shaurya Patil: पायाचा त्रास, तरीही शिक्षकांचा डान्स करण्यासाठी हट्ट; शौर्य पाटीलने आयुष्य संपवण्यापूर्वी शाळेत काय घडलेलं?
16
टार्गेटवर फक्त विवाहित महिला! आधी जाळ्यात ओढायचा, मग सुरू व्हायचा टॉर्चरचा खेळ; नराधमावर गुन्हा दाखल
17
Jara Hatke: तुमच्या बागेतले ‘ते’ फूल खरे ब्रह्मकमळ नाहीच; पाहा 'हा' व्हिडीओ
18
निर्दयी आई तिला स्मशानाबाहेर टाकून फरार; महिला अधिकाऱ्याने कुशीत घेताच चिमुकली हसली
19
कोलकाताला भूकंपाचे हादरे, ५.२ रिश्टर स्केलची तीव्रता, लोक घाबरून घराबाहेर पडले...
20
दिल्ली ब्लास्ट: जहाल भाषणे, बाँब बनवण्याचे धडे... अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फोनमध्ये काय काय सापडले?
Daily Top 2Weekly Top 5

संविधानातील मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्त्वांचे स्वरूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 03:19 IST

भारतीय संविधान आकारास येत असताना ज्या ज्या बाबी नागरिकांच्या मूलभूत अधिकारांत समाविष्ट करणे घटनाकारांना शक्य झाले नाही, त्या सर्व बाबी त्यांनी मार्गदर्शक तत्त्वांच्या प्रकरणात समाविष्ट केल्या आहेत.

- डॉ. रविनंद होवाळ(प्रवर्तक, संविधान जनजागृती अभियान)भारतीय संविधान आकारास येत असताना ज्या ज्या बाबी नागरिकांच्या मूलभूत अधिकारांत समाविष्ट करणे घटनाकारांना शक्य झाले नाही, त्या सर्व बाबी त्यांनी मार्गदर्शक तत्त्वांच्या प्रकरणात समाविष्ट केल्या आहेत. भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्त्वे ही दोन प्रकरणे जरी कोणी वाचली, तरी त्यांना भारतीय घटनाकारांच्या महासागराहूनही विशाल असलेल्या हृदयाचे आणि त्यांच्या स्वप्नातील प्रगत, प्रगल्भ आणि प्रबुद्ध भारताचे दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही.२६ नोव्हेंबर, १९४९ रोजी ३९५ कलमे व आठ परिशिष्टांचे भारतीय संविधान आपण स्वीकारले. भारतीय संविधानात आजवर सुमारे शंभर घटनादुरुस्त्या झालेल्या असून अनेक तरतुदींत अनेक महत्त्वपूर्ण बदल व पुनर्बदल झालेले असले, तरी त्यातील कलमांचा क्रमांक एखादा अपवाद वगळता बदलण्यात आलेला नाही. त्यामुळे ढोबळ मानाने कलमांची संख्या आहे तीच राहिली आहे. संविधानात काही नवी परिशिष्टे घातल्यामुळे त्यांची संख्या मात्र वाढून ती बारा इतकी झाली आहे.भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातीलङ्कमूलभूत अधिकारांना संविधानाचा आत्मा किंंवा प्राण असे संबोधले होते. कलमङ्कक्र. १२ ते ३५ मध्ये मूलभूत अधिकारांचा समावेश केल्यानंतर संविधानकारांनी कलम क्र. ३६ ते ५१ङ्कमध्येङ्कमार्गदर्शक तत्त्वांची योजना केलेली आहे. सुरुवातीला भारतीय संविधानात सात प्रकारचे मूलभूत अधिकार होते. त्यातला एक ‘संपत्तीचा अधिकार’ हा १९७८ साली ४४ व्या घटनादुरुस्तीनंतर काढून टाकण्यात आला व त्याचा समावेश संविधानाच्या ३०० व्या कलमात सर्वसाधारण अधिकार म्हणून करण्यात आला. सध्या समतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्ध अधिकार, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार आणि न्यायालयीन उपाय योजण्याचा अधिकार असे सहा प्रकारचेङ्कमूलभूत अधिकार लागू आहेत.भारतीय नागरिकांच्याङ्कमूलभूत अधिकारांची प्रस्थापना स्वतंत्र अशा तब्बल २४ कलमांतून केल्यानंतरही संविधानकार स्वस्थ राहिले नाहीत. आणखी पुढे एक पाऊल टाकत त्यांनी मार्गदर्शक तत्त्वांचाही समावेश संविधानात करून ठेवला. या तत्त्वांचे नेमके स्वरूप सर्व नागरिकांनी समजावून घेण्याची गरज आहे.ङ्कमूलभूत अधिकारांच्या योजनेद्वारे संविधानकारांनी सर्व भारतीय सरकारांना असा आदेश दिला आहे की, तुम्ही सर्व भारतीय नागरिकांना प्रत्यक्ष व्यवहारामध्ये कायद्यापुढे समानता मिळू द्या; कायद्याचे समान संरक्षण मिळू द्या; त्यांना कोठेही राहण्याचे, कोणताही व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य द्या; बालकांना धोक्याची कामे करायला लावू नका; शिक्षण मोफत व सक्तीचे करून त्यांना शाळेत पाठवा; त्यांना हवा तो धर्म स्वीकारण्याचे स्वातंत्र्य उपभोगू द्या; त्यांची संस्कृती, भाषा, लिपी अशा गोष्टींचे संरक्षण व संवर्धन त्यांना करू द्या!भारतीय सरकारांची सर्वसाधारण क्षमता व उपलब्ध असलेली संसाधने यांचा अंदाज घेऊन काही बाबींचा त्यांनी मूलभूत अधिकारांत समावेश केला; तर उरलेल्या अनेक बाबींचा समावेश मार्गदर्शक तत्त्वांच्या प्रकरणामध्ये केला. हे करताना त्यांनी सरकारांना असे सुचवले आहे, की मूलभूत अधिकारांच्या प्रकरणामध्ये लिहिलेल्या गोष्टी जर तुम्ही लोकांना मिळवून दिल्या नाहीत, तर तुम्हाला न्यायालयांत खेचले जाईल! परंतु मार्गदर्शक तत्त्वांतील गोष्टी जर तुम्हाला करता आल्या नाहीत, तर तुम्हाला आम्ही न्यायालयांत खेचणार नाही. तुमच्या क्षमतेचा आणि उपलब्ध संसाधनांचा विचार करता ही सूट आम्ही तुम्हाला देत आहोत! परंतु याचा अर्थ असा नाही की, तुम्हाला या तत्त्वांकडे पूर्णत: किंंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करता येईल! या तत्त्वांच्या अंमलबजावणीबाबतची तुमची एकंदर कटिबद्धता आणि त्याबाबतची प्रत्यक्ष कामगिरी पाहूनच पुढच्या पाच वर्षांनी तुम्हाला पुन्हा गादीवर बसवायचे की नाही, याचा आम्ही निर्णय करू!मार्गदर्शक तत्त्वांच्या माध्यमातून भारतीय संविधानकारांनी भारताला जगातील सर्वाेत्तम व सर्वश्रेष्ठ राजकीय महासत्ता बनवण्याचा जणू संकल्प सोडलेला आहे. त्यांनी सर्व भारतीयांना इतके महत्त्वपूर्ण अधिकार कायदेशीरपणे देऊन ठेवले आहेत, तेवढे अधिकार मानवी जगाच्या करोडो वर्षांच्या ज्ञात इतिहासात कधीही कोणीही आणि कोणालाही दिलेले आपल्याला दिसणार नाहीत! या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे काम जरी सरकारांकडे असले, तरी त्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्याचे काम मात्र तमाम भारतीय नागरिकांचे आहे. या तरतुदींचे योग्य अध्ययन करून जनतेने सरकारांना योग्य ठिकाणी योग्य प्रश्न विचारले पाहिजेत. त्यांच्या कामाचा आढावा घेतला पाहिजे. नागरिकांना संविधानातील मार्गदर्शक तत्त्वेच माहीत नसतील, तर त्यांची अंमलबजावणी न झाल्यास केवळ राजकीय पक्षांना दोष देता येणार नाही. जनतेची या संदर्भातील भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे!

टॅग्स :Indiaभारत