शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

बापूंचा कांदा... जनतेचा वांधा !

By सचिन जवळकोटे | Updated: May 10, 2018 00:18 IST

‘परवडत नसेल तर कांदा खाताच कशाला? द्या की सोडून,’ असं सोलापूरच्या सुभाष बापूंनी जनतेला ठणकावून सांगताच ‘कांदा भजी’ गाडीवाल्यांची घाबरगुंडी उडालेली.‘बापू कायऽऽ नेहमीच काही-बाही बोलत राहतात... पण त्यापायी आपल्या पोटावर पाय पडायला नको,’ या भीतीपोटी या विक्रेत्यांनी ‘कांदा भजी’चं मार्केटिंग करण्याचं ठरविलं. सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेण्याचा घाटही घातला गेला.

‘परवडत नसेल तर कांदा खाताच कशाला? द्या की सोडून,’ असं सोलापूरच्या सुभाष बापूंनी जनतेला ठणकावून सांगताच ‘कांदा भजी’ गाडीवाल्यांची घाबरगुंडी उडालेली.‘बापू कायऽऽ नेहमीच काही-बाही बोलत राहतात... पण त्यापायी आपल्या पोटावर पाय पडायला नको,’ या भीतीपोटी या विक्रेत्यांनी ‘कांदा भजी’चं मार्केटिंग करण्याचं ठरविलं. सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेण्याचा घाटही घातला गेला.त्यानुसार, गाडीवाला बंड्या सुरुवातीला ‘कृष्णकुंज’वर ‘राज’ना भेटला. ‘मी नाकानं कांदा सोलणाऱ्यांवर साधं कार्टूनसुद्धा काढत नसतो. मला नका सांगू तुमचं कांदा पुराण,’ असं फटकारत ‘राज’नी बंड्याला पिटाळलं.नासक्या कांद्यासारखा चेहरा करत बिचारा बंड्या अजितदादांकडं गेला. तिथं अगोदरच डिस्मूड होऊन बसलेले धनंजय दादा दिसताच बंड्याला अधिकच गलबलून आलं. आता पद गेल्यामुळं ते निराश झाले होते की बीड-लातूरमध्ये रमेशरावांनी कलटी मारल्यानं काळजात ‘धस्स’ झालं होतं, याचा काही अंदाज लागला नाही. ‘कांदा भजी’चा विषय काढताच अजितदादा तडकले, ‘मला भजी-बिजी नाही आवडत. उजनी धरणातले फिश-बिश असतील तर सांगा.’... दचकलेला बंड्या मग क-हाडच्या पृथ्वीबाबांकडं गेला. ते म्हणे कर्नाटकच्या दिशेनं देव पाण्यात ठेवून बसलेले. ‘भविष्यात विधानसभा की राज्यसभा’ हा त्यांचा निर्णय म्हणे बेंगळुरूच्या निकालावरच अवलंबून असलेला. ‘कांदा भजी’बद्दल विचारताच त्यांनी चक्क डबल प्लेटची आॅर्डर दिली, ‘एक प्लेट मला.. अन् एक आमच्या उंडाळ्याच्या लाडक्या विलास काकांना,’ असं बाबांनी सांगताच बंड्या पुटपुटला, ‘ही उपरती पाच वर्षांपूर्वीच झाली असती तर कदाचित आज ही वेळ आली नसती.’असो. बंड्या नंतर थोरले काका बारामतीकर यांच्याकडे गेला, ‘कांदा भजी खाणार का?’ या प्रश्नावर काका पुटपुटले, ‘नको. जागा कुठं शिल्लक आहे?’ बंड्या दचकला. त्यानं जागेच्या संदर्भासाठी सुप्रिया तार्इंकडं बघितलं, ‘आत्ताच जेवण झाल्यामुळं पोटात जागा नाही, असं साहेब म्हणताहेत,’ तार्इंनी गडबडीनं खुलासा करताच बंड्या ‘लवासा’कडं बघत गालातल्या गालात हसत बाहेर पडला.‘मातोश्री’वर ‘उद्धो’ भेटले. त्यांनी मात्र, ‘कांदा भजी’ खाण्यास होकार दर्शविला. ‘तुम्ही शिव-भजीचा दादरला स्टॉल लावा. मात्र, तिथं ढोकळा सोडून बाकी अ‍ॅटम ठेवा. गुजराती डिश मला बिलकूल नाही आवडत.’बंड्यानं खुशीत ‘वर्षा’ बंगला गाठला. इथं कदाचित आपली मराठी भजी चालणार नाही. नेहमीप्रमाणं फाफड्याचीच फर्माईश होईल, अशी त्यानं खूणगाठ बांधली. मात्र, घडलं उलटंच.‘डुंगरी नां भजीयां गमशे के?’ असं बंड्यानं गुजराती भाषेत विचारताच देवेंद्रपंतांनी ‘इल्लाऽऽ इल्ला... नमगे हुुग्गी बेकू,’ अशी चक्क कन्नडमध्ये आॅर्डर दिली. सोबतच्या विनोद-सुधीर जोडगोळीनंही ‘हौदूऽऽ हौदूऽऽ’ अशी कानडी पुस्ती जोडताच बंड्या पुरता उडाला. मानसिक धक्क्यानं बेशुद्ध पडला. कर्नाटकातील नरेंद्रभार्इंच्या कन्नड भाषणाची लाट इथंही येऊन पोहोचलीय, हे बंड्याला सांगण्यासाठी तो प्रथम शुद्धीवर येणं गरजेचं होतं. तेव्हा सुभाष बापूंनी सहका-यांना हाक मारली, ‘एऽऽ कुणीतरी कांदा आणा रे हुंगवायला.’ 

टॅग्स :onionकांदाSubhash Deshmukhसुभाष देशमुखMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार