शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

बापूंचा कांदा... जनतेचा वांधा !

By सचिन जवळकोटे | Updated: May 10, 2018 00:18 IST

‘परवडत नसेल तर कांदा खाताच कशाला? द्या की सोडून,’ असं सोलापूरच्या सुभाष बापूंनी जनतेला ठणकावून सांगताच ‘कांदा भजी’ गाडीवाल्यांची घाबरगुंडी उडालेली.‘बापू कायऽऽ नेहमीच काही-बाही बोलत राहतात... पण त्यापायी आपल्या पोटावर पाय पडायला नको,’ या भीतीपोटी या विक्रेत्यांनी ‘कांदा भजी’चं मार्केटिंग करण्याचं ठरविलं. सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेण्याचा घाटही घातला गेला.

‘परवडत नसेल तर कांदा खाताच कशाला? द्या की सोडून,’ असं सोलापूरच्या सुभाष बापूंनी जनतेला ठणकावून सांगताच ‘कांदा भजी’ गाडीवाल्यांची घाबरगुंडी उडालेली.‘बापू कायऽऽ नेहमीच काही-बाही बोलत राहतात... पण त्यापायी आपल्या पोटावर पाय पडायला नको,’ या भीतीपोटी या विक्रेत्यांनी ‘कांदा भजी’चं मार्केटिंग करण्याचं ठरविलं. सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेण्याचा घाटही घातला गेला.त्यानुसार, गाडीवाला बंड्या सुरुवातीला ‘कृष्णकुंज’वर ‘राज’ना भेटला. ‘मी नाकानं कांदा सोलणाऱ्यांवर साधं कार्टूनसुद्धा काढत नसतो. मला नका सांगू तुमचं कांदा पुराण,’ असं फटकारत ‘राज’नी बंड्याला पिटाळलं.नासक्या कांद्यासारखा चेहरा करत बिचारा बंड्या अजितदादांकडं गेला. तिथं अगोदरच डिस्मूड होऊन बसलेले धनंजय दादा दिसताच बंड्याला अधिकच गलबलून आलं. आता पद गेल्यामुळं ते निराश झाले होते की बीड-लातूरमध्ये रमेशरावांनी कलटी मारल्यानं काळजात ‘धस्स’ झालं होतं, याचा काही अंदाज लागला नाही. ‘कांदा भजी’चा विषय काढताच अजितदादा तडकले, ‘मला भजी-बिजी नाही आवडत. उजनी धरणातले फिश-बिश असतील तर सांगा.’... दचकलेला बंड्या मग क-हाडच्या पृथ्वीबाबांकडं गेला. ते म्हणे कर्नाटकच्या दिशेनं देव पाण्यात ठेवून बसलेले. ‘भविष्यात विधानसभा की राज्यसभा’ हा त्यांचा निर्णय म्हणे बेंगळुरूच्या निकालावरच अवलंबून असलेला. ‘कांदा भजी’बद्दल विचारताच त्यांनी चक्क डबल प्लेटची आॅर्डर दिली, ‘एक प्लेट मला.. अन् एक आमच्या उंडाळ्याच्या लाडक्या विलास काकांना,’ असं बाबांनी सांगताच बंड्या पुटपुटला, ‘ही उपरती पाच वर्षांपूर्वीच झाली असती तर कदाचित आज ही वेळ आली नसती.’असो. बंड्या नंतर थोरले काका बारामतीकर यांच्याकडे गेला, ‘कांदा भजी खाणार का?’ या प्रश्नावर काका पुटपुटले, ‘नको. जागा कुठं शिल्लक आहे?’ बंड्या दचकला. त्यानं जागेच्या संदर्भासाठी सुप्रिया तार्इंकडं बघितलं, ‘आत्ताच जेवण झाल्यामुळं पोटात जागा नाही, असं साहेब म्हणताहेत,’ तार्इंनी गडबडीनं खुलासा करताच बंड्या ‘लवासा’कडं बघत गालातल्या गालात हसत बाहेर पडला.‘मातोश्री’वर ‘उद्धो’ भेटले. त्यांनी मात्र, ‘कांदा भजी’ खाण्यास होकार दर्शविला. ‘तुम्ही शिव-भजीचा दादरला स्टॉल लावा. मात्र, तिथं ढोकळा सोडून बाकी अ‍ॅटम ठेवा. गुजराती डिश मला बिलकूल नाही आवडत.’बंड्यानं खुशीत ‘वर्षा’ बंगला गाठला. इथं कदाचित आपली मराठी भजी चालणार नाही. नेहमीप्रमाणं फाफड्याचीच फर्माईश होईल, अशी त्यानं खूणगाठ बांधली. मात्र, घडलं उलटंच.‘डुंगरी नां भजीयां गमशे के?’ असं बंड्यानं गुजराती भाषेत विचारताच देवेंद्रपंतांनी ‘इल्लाऽऽ इल्ला... नमगे हुुग्गी बेकू,’ अशी चक्क कन्नडमध्ये आॅर्डर दिली. सोबतच्या विनोद-सुधीर जोडगोळीनंही ‘हौदूऽऽ हौदूऽऽ’ अशी कानडी पुस्ती जोडताच बंड्या पुरता उडाला. मानसिक धक्क्यानं बेशुद्ध पडला. कर्नाटकातील नरेंद्रभार्इंच्या कन्नड भाषणाची लाट इथंही येऊन पोहोचलीय, हे बंड्याला सांगण्यासाठी तो प्रथम शुद्धीवर येणं गरजेचं होतं. तेव्हा सुभाष बापूंनी सहका-यांना हाक मारली, ‘एऽऽ कुणीतरी कांदा आणा रे हुंगवायला.’ 

टॅग्स :onionकांदाSubhash Deshmukhसुभाष देशमुखMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार