शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

झोप उडावी अशा आयुष्याचा नायक भन्नाट वळणावर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 06:44 IST

सायकलरिक्षा ओढणारे मनोरंजन ब्यापारींकडे सध्या बंगालात सगळ्यांचे डोळे लागलेत, कारणही तसेच आहे!

- श्रीमंत माने, कार्यकारी संपादक, लोकमत, नागपूरप्रचंड उन्हाच्या टळटळीत दुपारी कोलकत्याच्या जाधवपूर विद्यापीठाजवळच्या ज्योतिष रे कॉलेजच्या पुढे घामाघूम अवस्थेत सवारीची वाट पाहात असतानाही तो सायकलरिक्षावाला पुस्तक वाचत होता. कॉलेजमधून एका विद्यार्थ्याला सोबत घेऊन प्राध्यापिका बाहेर आल्या. दोघे रिक्षात बसले अन् घराकडे जात असताना रिक्षाचालकाने विचारले, ‘‘मॅडम, जिजिभिषा म्हणजे काय?’’बंगालीतला इतका अवघड शब्द रिक्षाचालकाला कसा माहिती, म्हणून मॅडमना आश्चर्य वाटले. त्यावर ‘‘रिक्षा ओढतानाही मी पुस्तके वाचतो’’, असे त्या तिशीतल्या रिक्षावाल्याने सांगितले.‘‘ वाचतोस तर लिहायलाही सुरुवात कर’’, असे सांगून मॅडमनी एका कागदावर नाव, पत्ता लिहून दिला. तो वाचून रिक्षावाला उडालाच. कारण, थोड्या वेळापूर्वी तो वाचत होता, अग्निगर्भ. ज्ञानपीठ विजेत्या महाश्वेतादेवी यांची एक अजरामर लेखनकृती! अन् सामान्य कष्टकऱ्यांचे जगणे शब्दांत मांडणाऱ्या त्याच त्या थोर लेखिका त्याला लिहायला सांगत होत्या!

... सायकलरिक्षा चालविणारा होता मनोरंजन ब्यापारी. बंगालच्या दलित साहित्याला नवे वळण देताना रसरशीत जीवनानुभव मांडणारे लेखक, ‘‘इंटोरॉगेटिंग माय चांडाल लाइफ’’ आत्मचरित्रासाठी हिंदू लिटरेचर पुरस्काराचे विजेते. गेल्या सप्टेंबरमध्ये स्थापन झालेल्या पश्चिम बंगाल दलित साहित्य अकादमीचे अध्यक्ष. केवळ ऐकून व वाचून झोप उडावी अशी आयुष्याची चित्तरकथा जगलेला नायक.आज आठवण यासाठी, की पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मनोरंजन ब्यापारींकडे सगळ्यांचे डोळे लागलेत. हुगळी जिल्ह्यातल्या बालागडमधून ते तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवताहेत. थोडे सुखद असे त्यांच्या आयुष्यातील हेही वळण भन्नाट आहे. 
फाळणीनंतर पूर्व पाकिस्तानमधून आई-वडिलांसोबत बंगालमध्ये आलेला हा मुलगा निर्वासितांच्या छावणीत राहतो. पुढे वडील जाधवपूर रेल्वे स्टेशनवर हमाली करतात. त्याच स्टेशनवर ब्यापारी यांनी शेकडो रात्री काढल्या. अनेक वर्षे नक्षली बनून जंगलमहलमध्ये घालवली. दंगल, प्राणघातक हल्ला वगैरे गुन्ह्यासाठी दोन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात काढला. शंकर गुहा नियोगी यांच्यासोबत छत्तीसगडच्या बस्तरमध्ये काम केले. तुरूंगाशी तर त्यांचे अतूट नाते. जाधवपूर स्टेशनच्या फलाटावर रेल्वे पोलिसांचा कारवाईचा कोटा पूर्ण करताना व्यावसायिकांशी साटेलोट्यातून पाच रूपयांत चार-पाच दिवस कितीतरी वेळा ते तुरुंगात गेले. पडेल ते काम केले. सायकलरिक्षा नंतर ओढली. आधी चहा टपरी चालवली, दफनभूमीत प्रेतांवर अंत्यसंस्कार केले, एका संस्थेत आचारी बनले. एकवीस वर्षे विद्यार्थ्यांचे जेवण बनवले.
मनाेरंजन ब्यापारी नामशुद्र जातसमूहातील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बंगालमध्ये बाेलावून घटना समितीवर निवडून देणाऱ्या नेत्यांचा समाज. एकोणिसाव्या शतकात हरिचंद व गुरूचंद ठाकूर या पितापुत्रांच्या नेतृत्वातील नामशुद्र चळवळीच्या आधी या जाती अस्पृश्य चांडाळ म्हणून ओळखल्या जायच्या. दलित-शोषितांच्या वंचितांच्या, गरिबांच्या, 'नाही रे' वर्गाच्या वाट्याला येणारे सारे काही ब्यापारी यांनी भोगले. त्यांनी कधी शाळेचे तोंड पाहिले नाही. तुरूंगात वाचायला, लिहायला शिकले अन् मग वेड्यासारखे वाचतच सुटले. महाश्वेतादेवींमुळे लिहायला लागले. आपल्याकडील दलित आत्मचरित्रांच्या मालिकेत फिट्ट बसेल, असे भडभडून टाकणारे अनुभव जगापुढे आले. दुबळ्यासमाजाचे नायक म्हणून जयपूर, हैदराबाद वगैरेच्या साहित्य चर्चांमध्ये ते केंद्रस्थानी राहिले. भद्रलोकांच्या मते प. बंगाल हे जातीव्यवस्था घट्ट नसलेले राज्य. ब्यापारींच्या लिखाणाने त्या समजाला तडा गेला. कैक वळणे अन् चढउतार जगलेले मनोरंजन ब्यापारी यांचे आयुष्य या निवडणुकीत नव्या वळणावर उभे आहे. अकल्पितांच्या ज्या वाटेवर ते चालत आलेत ते पाहता हे वळण कदाचित त्यांना विधानसभेत घेऊन जाईलही!

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१All India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेस