शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

रस्त्यांचाही अनुशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 00:25 IST

पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भात केवळ सिंचनाचाच नव्हे, तर रस्त्यांचाही मोठा अनुशेष असल्याची वस्तुस्थिती, विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या ताज्या अहवालामुळे अधोरेखित झाली आहे.

पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भात केवळ सिंचनाचाच नव्हे, तर रस्त्यांचाही मोठा अनुशेष असल्याची वस्तुस्थिती, विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या ताज्या अहवालामुळे अधोरेखित झाली आहे. मंडळाचा हा अहवाल मार्च २०१५ पर्यंतच्या सांख्यिकी अहवालावर आधारित आहे. म्हणजेच मंडळाला उपलब्ध झालेली आकडेवारी २०१४-१५ या आर्थिक वर्षापर्यंतची आहे. त्यावेळी नितीन गडकरी यांना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री पदावर आणि देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या मुख्यमंत्री पदावर आरूढ होऊन फार थोडे दिवस झाले होते. त्यामुळे रस्त्यांच्या मोठ्या अनुशेषासाठी त्यांना जबाबदार धरता येणार नसले तरी, हा अनुशेष लवकरात लवकर दूर व्हावा, ही अपेक्षा त्यांच्याकडून नक्कीच करता येईल. अखिल भारतीय रोड काँग्रेसच्या निर्देशाप्रमाणे प्रत्येक राज्याचा २० वर्षांचा रस्ते विकास आराखडा तयार करावा लागतो. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचे वेगवेगळ्या प्रकारच्या रस्त्यांचे उद्दिष्ट ठरविण्यात येते. वैधानिक विकास मंडळाच्या अहवालानुसार, २००१ ते २०२१ या कालावधीसाठी विदर्भ आणि इतर प्रदेशांसाठी निश्चित करण्यात आलेल्या उद्दिष्टांमध्येच मोठी तफावत आहे. विदर्भासाठीचे उद्दिष्ट सुमारे १९ हजार किलोमीटरने कमी आहे. जेव्हा एखाद्या भागाचा अनुशेष दूर करायचा असतो, तेव्हा त्या भागाला झुकते माप द्यायला हवे. इथे मात्र गंगा उलटी वाहिली आहे. ज्या प्रदेशांमध्ये तुलनात्मकरीत्या रस्त्यांचा विकास चांगला झाला आहे, त्या प्रदेशांसाठी जादा उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. बरे, केवळ उद्दिष्टच कमी आहे असे नव्हे, तर ते साध्य करण्याच्या बाबतीतही विदर्भ पिछाडला आहे. मराठवाड्याने १०० टक्के, नाशिक विभागाने ९९ टक्के, पश्चिम महाराष्ट्राने ९८ टक्के, पुणे विभागाने ९७ टक्के, उर्वरित महाराष्ट्राने ९५ टक्के आणि कोकणाने ८४ टक्के उद्दिष्ट गाठले असताना, विदर्भ मात्र केवळ ७० टक्क्यांवरच रेंगाळला आहे. त्यातही अमरावती विभागाने तर केवळ ६७ टक्के उद्दिष्टच साध्य केले आहे. महाराष्ट्र राज्याने ८८.८६ टक्के, तर विदर्भ वगळता उर्वरित राज्याने ९६.३१ टक्के उद्दिष्ट गाठले आहे. परिणामी, विदर्भात आजच्या स्थितीत सुमारे २५ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते कमी आहेत. एकंदर परिस्थिती अशी असताना, विदर्भाचा अनुशेष वाढणार नाही तर दुसरे काय होणार? रस्ते विकास आराखडा पूर्ण होण्यासाठी चार वर्षे बाकी आहेत. गडकरी-फडणवीस जोडीने मनावर घेतल्यास, त्यांचा उर्वरित कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत, विदर्भाचा रस्त्यांचा अनुशेष दूर जरी नाही, तरी ब-याच प्रमाणात नक्कीच कमी होऊ शकेल.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा