शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांचाही अनुशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 00:25 IST

पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भात केवळ सिंचनाचाच नव्हे, तर रस्त्यांचाही मोठा अनुशेष असल्याची वस्तुस्थिती, विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या ताज्या अहवालामुळे अधोरेखित झाली आहे.

पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भात केवळ सिंचनाचाच नव्हे, तर रस्त्यांचाही मोठा अनुशेष असल्याची वस्तुस्थिती, विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या ताज्या अहवालामुळे अधोरेखित झाली आहे. मंडळाचा हा अहवाल मार्च २०१५ पर्यंतच्या सांख्यिकी अहवालावर आधारित आहे. म्हणजेच मंडळाला उपलब्ध झालेली आकडेवारी २०१४-१५ या आर्थिक वर्षापर्यंतची आहे. त्यावेळी नितीन गडकरी यांना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री पदावर आणि देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या मुख्यमंत्री पदावर आरूढ होऊन फार थोडे दिवस झाले होते. त्यामुळे रस्त्यांच्या मोठ्या अनुशेषासाठी त्यांना जबाबदार धरता येणार नसले तरी, हा अनुशेष लवकरात लवकर दूर व्हावा, ही अपेक्षा त्यांच्याकडून नक्कीच करता येईल. अखिल भारतीय रोड काँग्रेसच्या निर्देशाप्रमाणे प्रत्येक राज्याचा २० वर्षांचा रस्ते विकास आराखडा तयार करावा लागतो. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचे वेगवेगळ्या प्रकारच्या रस्त्यांचे उद्दिष्ट ठरविण्यात येते. वैधानिक विकास मंडळाच्या अहवालानुसार, २००१ ते २०२१ या कालावधीसाठी विदर्भ आणि इतर प्रदेशांसाठी निश्चित करण्यात आलेल्या उद्दिष्टांमध्येच मोठी तफावत आहे. विदर्भासाठीचे उद्दिष्ट सुमारे १९ हजार किलोमीटरने कमी आहे. जेव्हा एखाद्या भागाचा अनुशेष दूर करायचा असतो, तेव्हा त्या भागाला झुकते माप द्यायला हवे. इथे मात्र गंगा उलटी वाहिली आहे. ज्या प्रदेशांमध्ये तुलनात्मकरीत्या रस्त्यांचा विकास चांगला झाला आहे, त्या प्रदेशांसाठी जादा उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. बरे, केवळ उद्दिष्टच कमी आहे असे नव्हे, तर ते साध्य करण्याच्या बाबतीतही विदर्भ पिछाडला आहे. मराठवाड्याने १०० टक्के, नाशिक विभागाने ९९ टक्के, पश्चिम महाराष्ट्राने ९८ टक्के, पुणे विभागाने ९७ टक्के, उर्वरित महाराष्ट्राने ९५ टक्के आणि कोकणाने ८४ टक्के उद्दिष्ट गाठले असताना, विदर्भ मात्र केवळ ७० टक्क्यांवरच रेंगाळला आहे. त्यातही अमरावती विभागाने तर केवळ ६७ टक्के उद्दिष्टच साध्य केले आहे. महाराष्ट्र राज्याने ८८.८६ टक्के, तर विदर्भ वगळता उर्वरित राज्याने ९६.३१ टक्के उद्दिष्ट गाठले आहे. परिणामी, विदर्भात आजच्या स्थितीत सुमारे २५ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते कमी आहेत. एकंदर परिस्थिती अशी असताना, विदर्भाचा अनुशेष वाढणार नाही तर दुसरे काय होणार? रस्ते विकास आराखडा पूर्ण होण्यासाठी चार वर्षे बाकी आहेत. गडकरी-फडणवीस जोडीने मनावर घेतल्यास, त्यांचा उर्वरित कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत, विदर्भाचा रस्त्यांचा अनुशेष दूर जरी नाही, तरी ब-याच प्रमाणात नक्कीच कमी होऊ शकेल.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा