शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

अविनाश डोळस : चतुरस्र व्यक्तिमत्त्वाचे धनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 07:13 IST

मी डोळस सरांचा विद्यार्थी. गेवराईच्या आर. बी. अट्टल महाविद्यालयात ते मराठीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले तो काळ वादळी होता

मी डोळस सरांचा विद्यार्थी. गेवराईच्या आर. बी. अट्टल महाविद्यालयात ते मराठीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले तो काळ वादळी होता. एकीकडे स्वातंत्र्याचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन साजरा करण्याची धामधूम सुरू होती आणि दुसरीकडे त्याची फळे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली नाहीत या दाहक वास्तवाची जाणीव लोकांना होऊ लागलेली होती. अशातच आम्ही आतापर्यंत वाचलेल्या कवितांपेक्षा अंतर्बाह्य वेगळी अशी नामदेव ढसाळ यांची कविता वाचनात येऊ लागली. स्वातंत्र्याच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त काढलेल्या साधनेच्या विशेषांकात राजा ढालेंचा राष्ट्रध्वजाविषयी स्फोटक विधान असलेला लेख वाचनात आला. या सगळ्यांची संगती लावणं हे पठडीतल्या मराठी प्राध्यापकांच्या कुवतीबाहेरचे काम होते; पण ते समजावून घेण्याची तगमग होती.

एका वर्गात नव्यानेच रुजू झालेले प्राध्यापक मराठी शिकवीत होते. त्यांची बहुतेक मर्ढेकरांची कविता सुरू होती. त्यांनी अगदी अभिनव पद्धतीने विद्यार्थ्यांपुढे नवकवितेचे विश्लेषण मांडले. त्यांचा व्यासंग, भाषाशैली, कविता आणि ज्या काळात ती जन्माला आली तिचे आकलन या सर्वच बाबी प्रभावी होत्या. मग भेटी वाढत गेल्या आणि जिव्हाळा निर्माण झाला.

डोळस सर दलित चळवळीमध्ये सक्रिय असल्याचे त्यानंतर कळले. खरे तर ते दलित आहेत हेही नंतरच कळले. त्यांचा पिंड केवळ वाचून थांबण्याचा नव्हता, तर प्रत्यक्ष कृती करण्याचा होता. गेवराईसारख्या सरंजामी वातावरण असलेल्या गावातसुद्धा त्यांनी आपल्या या वृत्तीला मुरड घातली नाही. नव्याने येऊन एखाद्या गावात नवा पायंडा पाडणे हे सोपे काम नसते; परंतु थोड्याच अवधीत तिथे त्यांनी व्याख्यानमाला आयोजित करण्याची मोहीम हाती घेतली. ती यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातीलच नव्हे, तर गावातील इतरांशी संपर्क केला आणि ती आयोजित केली.२८ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर म्हणजे फुले स्मृतिदिन ते आंबेडकर स्मृतिदिन अशा निमित्ताने ती आयोजित केली होती. त्यात बाहेरून वक्ते आले आणि ते जे बोलले त्यामुळे खळबळ माजली. संस्थाचालकांनी त्यांना याचा जाब विचारला. सरांना परिणामाची पुरेपूर जाणीव होती. त्याची तमा न बाळगता त्यांनी हे पाऊल उचलले होते. परिणाम जे व्हायचे तेच झाले; परंतु सर निर्विकार होते. नंतर ते मिलिंद कला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले.

या सगळ्या तणावातून जाताना त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव कधीही दिसून आले नाहीत. त्यांची ही वृत्ती ते अनेक गंभीर संकटांतून जात असतानाही दिसून आली. शिष्यवृत्ती वाढ आंदोलनात त्यांनी ज्या पद्धतीने सर्व पुरोगामी युवक संघटनांना सहभागी करून घेतले होते त्यात त्यांच्या या लोकसंग्रहाच्या पाठीशी त्यांच्या या लोभस व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा वाटा आहे. नामांतराच्या निमित्ताने उसळलेल्या दलितविरोधी हिंसाचारानंतर आपद्ग्रस्त दलित सहायता समिती गठित करण्यातही त्यांच्या या कौशल्याचा फार उपयोग झाला. एकेकाळच्या कडव्या नामांतर विरोधकांशीसुद्धा त्यांचा संवाद कुठलीही कटुता न येता अबाधितपणे सुरू होता. परिणामत: नामविस्ताराची चळवळ शेवटच्या टप्प्यावर असताना अनेक नामांतर विरोधकांचा विरोध केवळ मावळलेलाच नव्हता, तर त्यापैकी अनेकांनी नामांतराला सक्रिय पाठिंबा दिलेला होता. ते आंबेडकरवादाचे केवळ अभ्यासकच नव्हते, तर त्या तत्त्वज्ञानाचा अन्वयार्थ लावण्यात आज ज्यांचा हातखंडा आहे त्या बोटावर मोजता येण्यासारख्या विचारवंतांमध्ये त्यांचे आघाडीचे स्थान होते. त्यांच्या या गुणविशेषाचेच फलित म्हणून त्यांची निवड महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधना समितीचे सचिव म्हणून केलेली होती. अशा चतुरस्र व्यक्तिमत्त्वाच्या सहवासाला आपण आजपासून मुकत आहोत, ही अतिशय दु:खद गोष्ट आहे.प्रा. प्रकाश सिरसाट 

(लेखक ज्येष्ठ पुरोगामी कार्यकर्ते आहेत)

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबाद