शहरं
Join us  
Trending Stories
1
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
2
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
3
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
4
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
5
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
6
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
7
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
8
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
9
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
10
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
11
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
12
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
13
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
14
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
15
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
16
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
17
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
18
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
19
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
20
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?

महिना पाच कोटी बचतीचा ‘अविनाश ढाकणे’ फंडा !

By राजा माने | Updated: April 4, 2018 00:14 IST

देशातील पहिल्या १० स्मार्ट सिटीत सोलापूर शहराचा समावेश आहे. पिण्याच्या पाण्यापासून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या पगारापर्यंतचे प्रश्न आहेत. अनेक प्रश्नांच्या गर्दीत महिन्याला पाच कोटी रुपये वायफळ खर्च वाचविण्याचा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांचा फंडा अनेक महापालिकांना दिशा देऊ शकतो.

सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील चांगल्या गोष्टींचे मार्केटिंग करण्याची मोठी मोहीम जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील कारभाºयांनी सध्या हाती घेतली आहे. केंद्र सरकारने देशातील पहिल्या १० स्मार्ट सिटींमध्ये सोलापूर शहराचा समावेश केल्याने त्या मोहिमेला नवी झळाळी मिळणे अपेक्षित होते. पण महापालिकेतील सत्ताकारणावरच अधिक चर्चा घडत असल्याने सत्तेतील राजकारणी व प्रशासन यांच्या प्रयत्नांवरही प्रकाश पडण्याऐवजी झाकोळ पडत असल्याचे दिसते. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेच्या आशेमुळे सोलापूरकरांची अपेक्षा वाढणे नैसर्गिकच आहे. या वाढलेल्या अपेक्षांमध्ये किमान नागरी सुविधा आणि पाण्याच्या प्रश्नाला न्याय मिळावा या मुद्यांचा अग्रक्रमाने समावेश होतो. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे आयुक्त अविनाश ढाकणे यांच्यापुढे अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. त्यावर मात करताना वायफळ खर्चावर पायबंद घालून दरमहा पाच कोटी रुपये वाचविण्याचा त्यांचा फंडा मात्र आज राज्यातील अनेक महापालिकांसाठी अनुकरणीय ठरावा असाच आहे. ई टॉयलेट, हुतात्मा बाग व होम मैदानाचे सुशोभीकरण, स्मार्ट रोड, सौर ऊर्जा, सौर ऊर्जेवर आधारित प्रकल्प, एलईडी दिवे अशांसारखे उपक्रम हाती घेत असतानाच केंद्र सरकारकडून स्मार्ट सिटीसाठी येणाºया निधीसाठी महापालिकेमार्फत द्याव्या लागणाºया हिश्श्याच्या निधीची तरतूद अविनाश ढाकणे यांनी आपल्या वायफळ खर्च बचत फंड्याने केली. त्यातूनच आतापर्यंत १८ कोटी रुपये भरल्याची नोंद झाली आहे.या शहराला प्रामुख्याने उजनी धरणातून पाईपलाईनद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय होते. पण ती पुरेशी नसल्याने येथील एनटीपीसी प्रकल्पाकडून दुसरी समांतर पाईपलाईन टाकण्याचे काम कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रलंबित राहिले आहे. या कामाला गती मिळावी यासाठी आयुक्त ढाकणे यांनी स्मार्ट सिटीच्या निधीतून ६९२ कोटीची योजना तयार केली. या योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरीही मिळवली. त्यामुळे आता हे काम गतीने पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे. शहराच्या पाणी वितरण व्यवस्थेला अधिक सक्षम बनविण्यासाठी देगाव, कुमठे आणि प्रतापनगर येथील मलनिस्सारण योजना कार्यान्वित केली. विजेअभावी प्रतापनगर पाणीपुरवठा योजनेचे पाणी वितरीत करण्याची समस्या होती. कुमठे येथील वीज जोडणीचा प्रश्न मार्गी लावून त्यांनी हाही प्रश्न मार्गी लावला. काटकसरीचे धोरण अवलंबित असताना जन्म-मृत्यू दाखल्यापासून बांधकामाच्या परवानगीपर्यंतच्या १४ सेवा आॅनलाईन करतानाच त्यांनी महापालिकेच्या उत्पन्नाच्या बाजूकडेही विशेष लक्ष दिले. त्याच कारणाने यावर्षी मिळकत कर वसुली मोहीम यशस्वी झाली व महापालिकेच्या इतिहासात प्रथमच मिळकत कराची वसुली ८७ टक्केच्या पुढे गेली.महापालिका कर्मचाºयांचे पगार वेळेवर होत नसल्याचा परिणाम महापालिकेच्या कारभारावर होत होता. ते वेळच्या वेळी होण्यासाठीही ढाकणे यांनी विशेष नियोजन केले. त्याला जोडूनच बायोमॅट्रिक हजेरी सक्तीची करून काटेकोर शिस्तीची सवय लावण्याचा प्रयत्न केला. अनेक कारणांनी दयनीय अवस्था झालेल्या आरोग्य विभागाला दिशा देताना डफरीन, बॉईस, दाराशा आणि रामवाडी दवाखान्यांना नवे रूप दिले. एकाच दवाखान्यातून २० टन कचरा काढणाºया ढाकणेंचा वायफळ खर्च बचत फंडा कौतुकाचा विषय ठरतो आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीGovernmentसरकार