शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेेनेची स्वबळाची बेडकी, काडीमोडाचे खरे कारण जागांची वजाबाकी

By यदू जोशी | Updated: January 29, 2018 12:51 IST

लोकसभा आणि विधानसभेची २०१९ मधील निवडणूक स्वबळावर लढण्याचा ठराव करून शिवसेनेने युतीच्या घटस्फोटाचे संकेत दिले आहेत. भाजपाने हिंदुत्व सोडल्याचा साक्षात्कार होऊन शिवसेनेने स्वबळावर लढण्याची भाषा केली आहे. खरे कारण हिंदुत्व वगैरे नाहीच.

लोकसभा आणि विधानसभेची २०१९ मधील निवडणूक स्वबळावर लढण्याचा ठराव करून शिवसेनेने युतीच्या घटस्फोटाचे संकेत दिले आहेत. उद्धव ठाकरे वा त्यांच्या घराण्यातील कुणालाही निवडणूक लढायची नसते त्यामुळे स्वबळाचा निर्णय घेणे हे त्यांच्यासाठी कठीण जात नसावे. मात्र, ज्यांना लढावे लागते त्या आमदार आणि विशेषत: खासदारांचा कौल आधी घेतला असता तर युती तोडा असे कुणीही मनापासून म्हटले नसते. मुंबइचे अरविंद सावंत, बुलडाण्याचे प्रतापराव जाधवांपासून रामटेकच्या कृपाल तुमानेंपर्यंत शिवसेनेचे बहुतेक जण लोकसभेवर प्रचंड मतांनी कसे काय जिंकून गेले, हे सर्वांनाच ठाऊक आहे. मोदी लाटेत ते तरले. शिवसेनेने मात्र त्याही विजयाचे श्रेय स्वत:कडे घेतले होते. तेव्हापासून राज्यातील आपल्या ताकदीबाबत हा पक्ष हवेत वा अतिआत्मविश्वासाने वावरत असल्याचे दिसते.

शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही प्रादेशिक पक्ष असून त्यांना महाराष्ट्रात स्वबळावर कधीही सत्ता मिळविता आलेली नाही. राष्ट्रवादीला सत्तेच्या पहिल्या दिवसापासून काँग्रेसच्या सहाºयाने राहावे लागले. शिवसेनेची परिस्थिती आणखी वाईट झाली. १९९५ च्या युती सरकारमध्ये, त्या आधी आणि नंतरही अगदी २०१४ पर्यंत युतीमधील मोठा भाऊ असलेल्या शिवसेनेकडे आता लहान भावाचा रोल आला आहे. केवळ राजकारणच करायचे असेल तर शिवसेना वा राष्ट्रवादी स्वबळावर लढू शकतात पण सत्ताकारण करायचे असेल तर त्यांना अनुक्रमे भाजपा, काँग्रेससोबत जावे लागेल हा आतापर्यंत राज्यातील जनतेने दिलेला कौल आहे. राष्ट्रवादीला ही समज आहे त्यामुळे त्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे वारंवार ‘आम्ही काँग्रेससोबत आघाडी करूनच लढणार’ असे स्वत:हून मुलाखती देत सांगत आहेत. या दोन प्रादेशिक पक्षांच्या जशा मर्यादा आहेत तशाच भाजपा आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांनाही महाराष्ट्रात स्वबळावर गेल्या २३ वर्षांत सत्ता मिळविता आलेली नाही हेही वास्तव आहे. त्यामुळे युती/आघाडीच्या धर्माचे पालन सत्तेसाठी करणे ही चौघांचीही अपरिहार्यता आहे. या अपरिहार्यतेतून बाहेर पडून १४५ चा जादुई आकडा गाठू शकेल अशी आजतरी कोणत्याही एका पक्षाची परिस्थिती नाही. मात्र, या आकड्याच्या सर्वात जवळ जाण्याची क्षमता भाजपाची दिसते. आघाडी, युतीत आपसातील भांडणांमुळे राज्याच्या विकासाला खीळ बसते. विकासाचा अजेंडा जलदगतीने राबविता येत नाही आणि मित्रपक्षाच्या चुकांवर अनेकदा पांघरूण घालावे लागते. युतीची ही मजबुरी एकदाची संपवावी असे आज इतर कोणत्याही पक्षापेक्षा भाजपाला अधिक वाटत आहे. हिंदुत्वापासून भाजपा दूर गेल्याने आम्ही आता एकला चलो रे चा पुकारा दिल्याचे शिवसेना सांगत असली तरी तो पुरता बनाव आहे.‘राष्ट्रवाद हवा की राष्ट्रवादी’ असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. भाजपासोबत युती केली तर लहान भावाची भूमिका मान्य करून त्यांच्यापेक्षा कमी म्हणजे फारतर ९० ते १०० जागा पदरी पडतील हे शिवसेनेला ठाऊक आहे. इतक्या कमी जागा स्वीकारणे मातोश्रीला शक्य होणार नाही. गेल्यावेळी १२२ जागा जिंकणारा भाजपा युतीमध्ये किमान १७५ जागांची मागणी करेल. त्यामुळे दोघांच्या जागांचे अंकगणित जुळणे कठीण आहे आणि युती तुटण्यामागे या अंकगणिताचाच हिशेब आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे