शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेेनेची स्वबळाची बेडकी, काडीमोडाचे खरे कारण जागांची वजाबाकी

By यदू जोशी | Updated: January 29, 2018 12:51 IST

लोकसभा आणि विधानसभेची २०१९ मधील निवडणूक स्वबळावर लढण्याचा ठराव करून शिवसेनेने युतीच्या घटस्फोटाचे संकेत दिले आहेत. भाजपाने हिंदुत्व सोडल्याचा साक्षात्कार होऊन शिवसेनेने स्वबळावर लढण्याची भाषा केली आहे. खरे कारण हिंदुत्व वगैरे नाहीच.

लोकसभा आणि विधानसभेची २०१९ मधील निवडणूक स्वबळावर लढण्याचा ठराव करून शिवसेनेने युतीच्या घटस्फोटाचे संकेत दिले आहेत. उद्धव ठाकरे वा त्यांच्या घराण्यातील कुणालाही निवडणूक लढायची नसते त्यामुळे स्वबळाचा निर्णय घेणे हे त्यांच्यासाठी कठीण जात नसावे. मात्र, ज्यांना लढावे लागते त्या आमदार आणि विशेषत: खासदारांचा कौल आधी घेतला असता तर युती तोडा असे कुणीही मनापासून म्हटले नसते. मुंबइचे अरविंद सावंत, बुलडाण्याचे प्रतापराव जाधवांपासून रामटेकच्या कृपाल तुमानेंपर्यंत शिवसेनेचे बहुतेक जण लोकसभेवर प्रचंड मतांनी कसे काय जिंकून गेले, हे सर्वांनाच ठाऊक आहे. मोदी लाटेत ते तरले. शिवसेनेने मात्र त्याही विजयाचे श्रेय स्वत:कडे घेतले होते. तेव्हापासून राज्यातील आपल्या ताकदीबाबत हा पक्ष हवेत वा अतिआत्मविश्वासाने वावरत असल्याचे दिसते.

शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही प्रादेशिक पक्ष असून त्यांना महाराष्ट्रात स्वबळावर कधीही सत्ता मिळविता आलेली नाही. राष्ट्रवादीला सत्तेच्या पहिल्या दिवसापासून काँग्रेसच्या सहाºयाने राहावे लागले. शिवसेनेची परिस्थिती आणखी वाईट झाली. १९९५ च्या युती सरकारमध्ये, त्या आधी आणि नंतरही अगदी २०१४ पर्यंत युतीमधील मोठा भाऊ असलेल्या शिवसेनेकडे आता लहान भावाचा रोल आला आहे. केवळ राजकारणच करायचे असेल तर शिवसेना वा राष्ट्रवादी स्वबळावर लढू शकतात पण सत्ताकारण करायचे असेल तर त्यांना अनुक्रमे भाजपा, काँग्रेससोबत जावे लागेल हा आतापर्यंत राज्यातील जनतेने दिलेला कौल आहे. राष्ट्रवादीला ही समज आहे त्यामुळे त्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे वारंवार ‘आम्ही काँग्रेससोबत आघाडी करूनच लढणार’ असे स्वत:हून मुलाखती देत सांगत आहेत. या दोन प्रादेशिक पक्षांच्या जशा मर्यादा आहेत तशाच भाजपा आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांनाही महाराष्ट्रात स्वबळावर गेल्या २३ वर्षांत सत्ता मिळविता आलेली नाही हेही वास्तव आहे. त्यामुळे युती/आघाडीच्या धर्माचे पालन सत्तेसाठी करणे ही चौघांचीही अपरिहार्यता आहे. या अपरिहार्यतेतून बाहेर पडून १४५ चा जादुई आकडा गाठू शकेल अशी आजतरी कोणत्याही एका पक्षाची परिस्थिती नाही. मात्र, या आकड्याच्या सर्वात जवळ जाण्याची क्षमता भाजपाची दिसते. आघाडी, युतीत आपसातील भांडणांमुळे राज्याच्या विकासाला खीळ बसते. विकासाचा अजेंडा जलदगतीने राबविता येत नाही आणि मित्रपक्षाच्या चुकांवर अनेकदा पांघरूण घालावे लागते. युतीची ही मजबुरी एकदाची संपवावी असे आज इतर कोणत्याही पक्षापेक्षा भाजपाला अधिक वाटत आहे. हिंदुत्वापासून भाजपा दूर गेल्याने आम्ही आता एकला चलो रे चा पुकारा दिल्याचे शिवसेना सांगत असली तरी तो पुरता बनाव आहे.‘राष्ट्रवाद हवा की राष्ट्रवादी’ असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. भाजपासोबत युती केली तर लहान भावाची भूमिका मान्य करून त्यांच्यापेक्षा कमी म्हणजे फारतर ९० ते १०० जागा पदरी पडतील हे शिवसेनेला ठाऊक आहे. इतक्या कमी जागा स्वीकारणे मातोश्रीला शक्य होणार नाही. गेल्यावेळी १२२ जागा जिंकणारा भाजपा युतीमध्ये किमान १७५ जागांची मागणी करेल. त्यामुळे दोघांच्या जागांचे अंकगणित जुळणे कठीण आहे आणि युती तुटण्यामागे या अंकगणिताचाच हिशेब आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे