शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत केली कचऱ्याने अडचण अन् पाण्याने फजिती

By सुधीर महाजन | Updated: April 6, 2019 15:34 IST

लोक उमेदवारांना थेट तोंडावर सवाल करीत आहेत.

- सुधीर महाजन

मुकी बिचारी कोणीही हाका, अशी जनता राहिली नाही. आपल्या हक्कांसाठी जागरूक असणारा प्रसंगी रस्त्यावर उतरणारा आजचा सामान्य माणूस आहे. भलेही तो फाटका असेल; पण हक्कासाठी तेवढाच जागरूक दिसतो. तसा तो सोशीक आहे. सरकार, प्रशासन, राज्यकर्ते या सर्वांची मनमानी तो एका मर्यादेपर्यंत सहन करतो. भ्रष्टाचाराकडे कानाडोळा करतो. रोजच्या संघर्षातून इकडे लक्ष द्यायला त्याला वेळ मिळत नाही; पण वेळेवर जाब विचारायला तो कचरत नाही आणि निवडणुकीच्या काळात तर राजकारण्यांच्या बेमुरवतपणाचे सगळे माप त्याच्या पदरात टाकायला तो विसरत नाही.

औरंगाबादमध्ये सध्या अशीच वेळ राजकारण्यांवर आली आहे. गेल्या वर्षभरापासून कचऱ्याचे शहर, असे बदनामीचे बिरुद मिरवून देशभरात या शहराची मानहानी झाली. त्याला जबाबदार या शहराची महानगरपालिका आणि राज्यकर्ते. प्रत्येक गोष्टीत टक्केवारीची संधी शोधणारे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांचे साटेलोटे यामुळे या शहराचे न भरून निघणारे नुकसान झाले. कचऱ्यावरून शहरात दंगल झाली; पण हा प्रश्न अजून सुटला नाही. इतकेच नव्हे स्वच्छ भारत अभियानात दिल्लीत काम करणारे सनदी अधिकारी डॉ. निपुण विनायक यांना येथे खास बाब म्हणून आणले. आता शहर स्वच्छ होणार, अशी आशेची लहर शहरभर पसरली; पण त्यांनी येऊन काय केले, हाही प्रश्नच आहे. शिवसेनेने सगळ्या शहराचाच ३० वर्षांत कचरा केला. याची अनुभूती आजवर या पक्षांची पाठराखण करणाऱ्या लोकांनाच झाली आणि थेट प्रश्न विचारायला लागले.

आज शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांची प्रचार रॅली कांचनवाडीत गेली. त्यावेळी तेथील नागरिकांनी त्यांना प्रवेश नाकारला. आमच्या भागात तुम्ही शहराचा कचरा आणून टाकला. आमचा परिसर घाणेरडा केला, असा सवाल करीत त्यांना परत पाठवले. ३० वर्षांत  शिवसेनेला असे परत पाठविण्याचा हा शहरातील पहिलाच प्रसंग. यावरून जनतेच्या मनातील असंतोष किती मोठा आहे, हे दिसते. असंतोष फक्त कचऱ्यापुरता मर्यादित नाही. राज्य सरकारने १०० कोटी देऊन वर्ष उलटले. तरी रस्ते झाले नाहीत. शहरात सातव्या दिवशी पाणी मिळते. रस्त्यावर दिवे नाहीत. सर्वच उद्याने बकाल झाली. अतिक्रमणांनी शहरभर पाय पसरले ते यांच्याच आशीर्वादामुळे. नियम, कायदा नावाची गोष्ट अस्तित्वात नाही. कोणतीही शिस्त नाही. सर्वसामान्य माणसाला सुरक्षित वाटत नाही. त्यातून हा असंतोष तयार झाला.

शुक्रवारी सकाळी जशी खैरेंची प्रचार रॅली प्रचार न करता परतली. तीच वेळ जालना मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवेंवर आली. शहराचा मुकुंदवाडी हा भाग त्यांच्या मतदारसंघात येतो. आज सायंकाळी त्यांच्या प्रचार कार्यालयाने उद्घाटन होते. लोक जमले. ऐन कार्यक्रम सुरू होण्याच्या वेळेस पाणी आले. तसे लोक सभा सोडून उठले. एक वेळ नेत्यांचे भाषण नाही ऐकले तर चालेल; परंतु सात दिवसांनंतर आलेले पाणी भरले नाही तर... लोक गेल्यामुळे कार्यक्रम उशिरा सुरू झाला. येथे पुन्हा दानवेंच्या जिभेची घसरगुंडी झाली आणि त्यांनी सोलापूरची पुनरावृती केली. येथे पुन्हा ‘पाकिस्तानने आपले ४० अतिरेकी मारले,’ असे वक्तव्य केले, तर निवडणुकीत कचरा आणि पाणी हे विषय औरंगाबादमध्ये या दोघांसाठी ज्वालाग्रही बनले आहेत. लोक उमेदवारांना थेट तोंडावर सवाल करीत आहेत. लोकांनी आतापर्यंत चंद्रकांत खैरेंना प्रश्न विचारले नव्हते; पण आता विचारायला कोणी घाबरत नाही. हाच मोठा बदल औरंगाबादमध्ये दिसतो.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकaurangabad-pcऔरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabadऔरंगाबाद