शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

औरंगाबादेत केली कचऱ्याने अडचण अन् पाण्याने फजिती

By सुधीर महाजन | Updated: April 6, 2019 15:34 IST

लोक उमेदवारांना थेट तोंडावर सवाल करीत आहेत.

- सुधीर महाजन

मुकी बिचारी कोणीही हाका, अशी जनता राहिली नाही. आपल्या हक्कांसाठी जागरूक असणारा प्रसंगी रस्त्यावर उतरणारा आजचा सामान्य माणूस आहे. भलेही तो फाटका असेल; पण हक्कासाठी तेवढाच जागरूक दिसतो. तसा तो सोशीक आहे. सरकार, प्रशासन, राज्यकर्ते या सर्वांची मनमानी तो एका मर्यादेपर्यंत सहन करतो. भ्रष्टाचाराकडे कानाडोळा करतो. रोजच्या संघर्षातून इकडे लक्ष द्यायला त्याला वेळ मिळत नाही; पण वेळेवर जाब विचारायला तो कचरत नाही आणि निवडणुकीच्या काळात तर राजकारण्यांच्या बेमुरवतपणाचे सगळे माप त्याच्या पदरात टाकायला तो विसरत नाही.

औरंगाबादमध्ये सध्या अशीच वेळ राजकारण्यांवर आली आहे. गेल्या वर्षभरापासून कचऱ्याचे शहर, असे बदनामीचे बिरुद मिरवून देशभरात या शहराची मानहानी झाली. त्याला जबाबदार या शहराची महानगरपालिका आणि राज्यकर्ते. प्रत्येक गोष्टीत टक्केवारीची संधी शोधणारे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांचे साटेलोटे यामुळे या शहराचे न भरून निघणारे नुकसान झाले. कचऱ्यावरून शहरात दंगल झाली; पण हा प्रश्न अजून सुटला नाही. इतकेच नव्हे स्वच्छ भारत अभियानात दिल्लीत काम करणारे सनदी अधिकारी डॉ. निपुण विनायक यांना येथे खास बाब म्हणून आणले. आता शहर स्वच्छ होणार, अशी आशेची लहर शहरभर पसरली; पण त्यांनी येऊन काय केले, हाही प्रश्नच आहे. शिवसेनेने सगळ्या शहराचाच ३० वर्षांत कचरा केला. याची अनुभूती आजवर या पक्षांची पाठराखण करणाऱ्या लोकांनाच झाली आणि थेट प्रश्न विचारायला लागले.

आज शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांची प्रचार रॅली कांचनवाडीत गेली. त्यावेळी तेथील नागरिकांनी त्यांना प्रवेश नाकारला. आमच्या भागात तुम्ही शहराचा कचरा आणून टाकला. आमचा परिसर घाणेरडा केला, असा सवाल करीत त्यांना परत पाठवले. ३० वर्षांत  शिवसेनेला असे परत पाठविण्याचा हा शहरातील पहिलाच प्रसंग. यावरून जनतेच्या मनातील असंतोष किती मोठा आहे, हे दिसते. असंतोष फक्त कचऱ्यापुरता मर्यादित नाही. राज्य सरकारने १०० कोटी देऊन वर्ष उलटले. तरी रस्ते झाले नाहीत. शहरात सातव्या दिवशी पाणी मिळते. रस्त्यावर दिवे नाहीत. सर्वच उद्याने बकाल झाली. अतिक्रमणांनी शहरभर पाय पसरले ते यांच्याच आशीर्वादामुळे. नियम, कायदा नावाची गोष्ट अस्तित्वात नाही. कोणतीही शिस्त नाही. सर्वसामान्य माणसाला सुरक्षित वाटत नाही. त्यातून हा असंतोष तयार झाला.

शुक्रवारी सकाळी जशी खैरेंची प्रचार रॅली प्रचार न करता परतली. तीच वेळ जालना मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवेंवर आली. शहराचा मुकुंदवाडी हा भाग त्यांच्या मतदारसंघात येतो. आज सायंकाळी त्यांच्या प्रचार कार्यालयाने उद्घाटन होते. लोक जमले. ऐन कार्यक्रम सुरू होण्याच्या वेळेस पाणी आले. तसे लोक सभा सोडून उठले. एक वेळ नेत्यांचे भाषण नाही ऐकले तर चालेल; परंतु सात दिवसांनंतर आलेले पाणी भरले नाही तर... लोक गेल्यामुळे कार्यक्रम उशिरा सुरू झाला. येथे पुन्हा दानवेंच्या जिभेची घसरगुंडी झाली आणि त्यांनी सोलापूरची पुनरावृती केली. येथे पुन्हा ‘पाकिस्तानने आपले ४० अतिरेकी मारले,’ असे वक्तव्य केले, तर निवडणुकीत कचरा आणि पाणी हे विषय औरंगाबादमध्ये या दोघांसाठी ज्वालाग्रही बनले आहेत. लोक उमेदवारांना थेट तोंडावर सवाल करीत आहेत. लोकांनी आतापर्यंत चंद्रकांत खैरेंना प्रश्न विचारले नव्हते; पण आता विचारायला कोणी घाबरत नाही. हाच मोठा बदल औरंगाबादमध्ये दिसतो.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकaurangabad-pcऔरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabadऔरंगाबाद