शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रक्तामध्ये ओढ मातीची, मनास मातीचे ताजेपण!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 06:59 IST

उंच आकाशात झेप घेताना मातीचा विसर पडतो; पण या मातीतूनच आपण जन्मलो. शेवटी तिच्यातच मिसळायचे आहे! आपली माती ऊर्जेचे भांडार आहे. आपली पृथ्वी, आपला देश, आपल्या गावाच्या मातीतच स्वर्ग दडलेला असतो

 विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह -राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या गावात प्रवेश करताच गावाची माती कपाळाला लावली आणि म्हटलं की, स्वर्ग हाच आहे! खरं सांगतो, त्यांच्या या एका कृतीनं मी आठवणींच्या लाटांमध्ये चिंब भिजून गेलो. खोल खोल कुठंतरी हरवून गेलो. किती आठवणी आहेत... काही बालपणाच्या, काही तारुण्यातल्या तर काही अगदी आत्ता आत्ताच्या. सगळ्यांचा मथितार्थ इतकाच, की आपण सर्व माती आहोत. ही माती हाच खरा स्वर्ग आहे! (The attraction of the soil in the blood, the freshness of the soil in the mind !!)लोकांना आपल्या घराची सर्वाधिक तीव्र आठवण कधी येते याचं एक सर्वेक्षण साधारण २५ वर्षांपूर्वी झालं होतं. दिल्लीत काम करणाऱ्या एका परिचारिकेचं उत्तर मला हलवून गेलं. ती म्हणाली होती, ‘तापलेल्या मातीवर पावसाचे पहिले थेंब पडतात आणि एक हरखून, वेडावून टाकणारा सुगंध दरवळू लागतो तेव्हा मला गावाची आठवण येते!’खरंच,  मातीच्या या गंधाला तोड नाही. माझं बालपण या मातीच्या वासानं न्हाऊन निघालेलं होतं, हे माझं भाग्यच. त्या स्मृती इतक्या खोलवर रुजलेल्या आहेत, की आजही बागेत फिरताना पावलांना, हातांना होणारा मातीचा स्पर्श माझ्या तनामनाला प्रमुदित करतो. तो स्पर्श मला माझ्या बालपणात घेऊन जातो. माझ्या मामाचं गाव बेला आणि बाबूजींचं आजोळ मादनी!  लहानपणी या दोन्ही गावांना आम्ही खूपदा जायचो. त्या काळात आजच्यासारख्या मोटारी नव्हत्या. त्यामुळं आजोळी घेऊन जाणारा हा प्रवास  बैलगाडीनं व्हायचा. वाटेतले धुळीचे लोट अंगावर घेताना कपडे मळतील याची फिकीर  अजिबात वाटत नसे. उलट त्या धुळीतही एक वेगळं सुख दडलेलं होतं. मुलं धुळीत खेळूनच मोठी होत. मुलं जेवढी मातीत खेळतील तेवढी अधिक धडधाकट, घट्टमुट्ट होतील अशीच तेव्हाची धारणा होती. आजच्या संदर्भात महत्त्वाचं म्हणजे माती शरीरामध्ये प्रतिपिंडं - अँटिबॉडीज तयार करते; पण सांगणार कोण आणि कुणाला? हल्ली शहरातल्या काय; पण खेड्यातल्याही आया मुलांच्या अंगाला मातीचा स्पर्श होणार नाही, याची फार काळजी घेतात. का? तर मातीत हुंदडल्यास मुले आजारी पडतील, अशी भीती त्यांना वाटते... ज्ञान-विज्ञान हे या मातीचेच उपज आहे, परंतु कृत्रिमता आयुष्यावर इतकी स्वार झाली आहे की या नव्या विचारांनी निसर्गापासून आपल्याला दूर नेलं, असं मला फार वाटतं. आपण मातीचा इतका दु:स्वास का करतो? ज्या मातीतून आपण तयार झालो तिच्यात खेळण्यापासून मुलांना अडवायचं कशाला? वास्तवात मातीच तर जीवनाचं मर्म सांगते, जगण्याचा अनुभव देते.सुप्रसिद्ध कवी शिवमंगल सिंह लिहितात निर्मम कुम्हारकी थापीसे कितनी रुपोमें कुटी पिटी हरबार बिखेरी गयी, किंतु मिट्टी फिर भी तो नही मिटी - हेच अखेर जीवनाचं सार नाही का?कुंभारावरून मला आठवलं, लहानपणी मातीच्या भांड्यात शिजवलेलं वरण आणि भाजी किंवा मातीच्या तव्यावर भाजलेल्या पोळ्या किती छान लागायच्या! त्या चवदार अन्नाला एक तृप्त करणारा सुगंध असे.. त्या आठवणींनी मी इतका बेचैन झालो, की मागच्याच महिन्यात मातीच्या भांड्यांचा एक संच स्वयंपाक घरात आणवून घेतला. त्या दिवशी घरातलं सगळं अन्न मातीच्या भांड्यात शिजवून मातीच्याच भांड्यात वाढलं गेलं. ज्या निकटवर्तीयांना जेवायला बोलावलं होतं, ते सारे या अनोख्या लज्जतदार स्वादानं भारावून गेले. मीही खूप दिवसांनी असा स्वाद चाखला. मातीची भांडी आता वापरातून बाद होताना दिसतात, ही फार मोठ्या दुर्दैवाची गोष्ट!  पूर्वी रेल्वेत किंवा शहरातल्या टपरीवरही मातीच्या कुल्हडमधून चहा मिळायचा... पण आता तो भूतकाळ झाला. कोलकात्यात मात्र आजही मातीच्या भांड्यात विरजलेलं घट्ट कवडीचं दही मिळतं. कोलकात्याला गेलो, की दरवेळी हे मातीच्या भांड्यातलं गोड दही खायला मी विसरत नाही. श्रीमंत घरातल्या खानदानी चांदीच्या भांड्यात जेवण्यातही हे सुख नाही ! ... सोन्या- चांदीची ताटं तो वेडावणारा मातीचा सुगंध कोठून उत्पन्न करणार?वास्तविक भावनांचा आधार घेत जगणारी माणसं, आध्यात्मिकतेच्या अधिक निकट  असणारी... निसर्गाबरोबर जगू पाहणारी लोभस माणसं कोणत्या ना कोणत्या रूपात मातीशी नातं जपू पाहतात. कारण आपण सर्वअखेरीस माती आहोत आणि मातीतच मिसळून जाणार आहोत; या सत्याची विनम्र जाण त्यांना असते. ग.दि. माडगूळकर लिहितात ते खरंच! माती, पाणी, उजेड आणि वारा, अशा सगळ्या पसाऱ्यातून ईश्वराने आपल्या देहांना आकार दिला. मातीमधून आपण अस्तित्वात आलो... एक दिवस तिच्यातच मिसळायचं आहे... कोणी राख होऊन मातीत मिसळेल, कोणी मातीच्या कुशीत दफन होईल... मग त्याच मातीतून पुन्हा नवं सृजन होईल!इंदिरा संत त्यांच्या एका कवितेत म्हणतात,रक्तामध्ये ओढ मातीची,मनास मातीचे ताजेपण,मातीतून मी आले वरती मातीचे मम अधुरे जीवन !अखेरीस मातीत मिसळून जाणार असलेल्या या अधुऱ्या जीवनात खरं  ऋण मानावं तेही मातीचंच! जीवनाचं नवं गाणं ऐकवण्याची आणि सृजनाचा संसार उभा करण्याची क्षमता केवळ आणि केवळ मातीतच तर  असते. विज्ञानानं प्रगती पुष्कळ केली. ज्या ज्या ग्रहांवर विज्ञानाच्या मदतीनं आपण पोहोचलो तिथं इथल्यासारखी माती नाही... माती नाही म्हणून जीवन नाही. बीज पडल्याबरोबर आमच्या धरतीला नवसंजीवनी प्राप्त होते. धान्य उगवतं; जे आपल्या जीवनऊर्जेचा आधार आहे. आमचे नैसर्गिक खेळही या मातीतूनच जन्माला आले आहेत, जे आपल्याला ऊर्जा देतात. आपली माती ऊर्जेचे भांडार आहे. आपली पृथ्वी, आपला देश, आपल्या गावाच्या मातीतच स्वर्ग दडलेला असतो, तो म्हणूनच!

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डाRamnath Kovindरामनाथ कोविंदPresidentराष्ट्राध्यक्षIndiaभारत