शहरं
Join us  
Trending Stories
1
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
4
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
5
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
6
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
7
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
8
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
9
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
10
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
11
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
12
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
13
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
14
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
15
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
16
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
17
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
18
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
19
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
20
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या

रक्तामध्ये ओढ मातीची, मनास मातीचे ताजेपण!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 06:59 IST

उंच आकाशात झेप घेताना मातीचा विसर पडतो; पण या मातीतूनच आपण जन्मलो. शेवटी तिच्यातच मिसळायचे आहे! आपली माती ऊर्जेचे भांडार आहे. आपली पृथ्वी, आपला देश, आपल्या गावाच्या मातीतच स्वर्ग दडलेला असतो

 विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह -राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या गावात प्रवेश करताच गावाची माती कपाळाला लावली आणि म्हटलं की, स्वर्ग हाच आहे! खरं सांगतो, त्यांच्या या एका कृतीनं मी आठवणींच्या लाटांमध्ये चिंब भिजून गेलो. खोल खोल कुठंतरी हरवून गेलो. किती आठवणी आहेत... काही बालपणाच्या, काही तारुण्यातल्या तर काही अगदी आत्ता आत्ताच्या. सगळ्यांचा मथितार्थ इतकाच, की आपण सर्व माती आहोत. ही माती हाच खरा स्वर्ग आहे! (The attraction of the soil in the blood, the freshness of the soil in the mind !!)लोकांना आपल्या घराची सर्वाधिक तीव्र आठवण कधी येते याचं एक सर्वेक्षण साधारण २५ वर्षांपूर्वी झालं होतं. दिल्लीत काम करणाऱ्या एका परिचारिकेचं उत्तर मला हलवून गेलं. ती म्हणाली होती, ‘तापलेल्या मातीवर पावसाचे पहिले थेंब पडतात आणि एक हरखून, वेडावून टाकणारा सुगंध दरवळू लागतो तेव्हा मला गावाची आठवण येते!’खरंच,  मातीच्या या गंधाला तोड नाही. माझं बालपण या मातीच्या वासानं न्हाऊन निघालेलं होतं, हे माझं भाग्यच. त्या स्मृती इतक्या खोलवर रुजलेल्या आहेत, की आजही बागेत फिरताना पावलांना, हातांना होणारा मातीचा स्पर्श माझ्या तनामनाला प्रमुदित करतो. तो स्पर्श मला माझ्या बालपणात घेऊन जातो. माझ्या मामाचं गाव बेला आणि बाबूजींचं आजोळ मादनी!  लहानपणी या दोन्ही गावांना आम्ही खूपदा जायचो. त्या काळात आजच्यासारख्या मोटारी नव्हत्या. त्यामुळं आजोळी घेऊन जाणारा हा प्रवास  बैलगाडीनं व्हायचा. वाटेतले धुळीचे लोट अंगावर घेताना कपडे मळतील याची फिकीर  अजिबात वाटत नसे. उलट त्या धुळीतही एक वेगळं सुख दडलेलं होतं. मुलं धुळीत खेळूनच मोठी होत. मुलं जेवढी मातीत खेळतील तेवढी अधिक धडधाकट, घट्टमुट्ट होतील अशीच तेव्हाची धारणा होती. आजच्या संदर्भात महत्त्वाचं म्हणजे माती शरीरामध्ये प्रतिपिंडं - अँटिबॉडीज तयार करते; पण सांगणार कोण आणि कुणाला? हल्ली शहरातल्या काय; पण खेड्यातल्याही आया मुलांच्या अंगाला मातीचा स्पर्श होणार नाही, याची फार काळजी घेतात. का? तर मातीत हुंदडल्यास मुले आजारी पडतील, अशी भीती त्यांना वाटते... ज्ञान-विज्ञान हे या मातीचेच उपज आहे, परंतु कृत्रिमता आयुष्यावर इतकी स्वार झाली आहे की या नव्या विचारांनी निसर्गापासून आपल्याला दूर नेलं, असं मला फार वाटतं. आपण मातीचा इतका दु:स्वास का करतो? ज्या मातीतून आपण तयार झालो तिच्यात खेळण्यापासून मुलांना अडवायचं कशाला? वास्तवात मातीच तर जीवनाचं मर्म सांगते, जगण्याचा अनुभव देते.सुप्रसिद्ध कवी शिवमंगल सिंह लिहितात निर्मम कुम्हारकी थापीसे कितनी रुपोमें कुटी पिटी हरबार बिखेरी गयी, किंतु मिट्टी फिर भी तो नही मिटी - हेच अखेर जीवनाचं सार नाही का?कुंभारावरून मला आठवलं, लहानपणी मातीच्या भांड्यात शिजवलेलं वरण आणि भाजी किंवा मातीच्या तव्यावर भाजलेल्या पोळ्या किती छान लागायच्या! त्या चवदार अन्नाला एक तृप्त करणारा सुगंध असे.. त्या आठवणींनी मी इतका बेचैन झालो, की मागच्याच महिन्यात मातीच्या भांड्यांचा एक संच स्वयंपाक घरात आणवून घेतला. त्या दिवशी घरातलं सगळं अन्न मातीच्या भांड्यात शिजवून मातीच्याच भांड्यात वाढलं गेलं. ज्या निकटवर्तीयांना जेवायला बोलावलं होतं, ते सारे या अनोख्या लज्जतदार स्वादानं भारावून गेले. मीही खूप दिवसांनी असा स्वाद चाखला. मातीची भांडी आता वापरातून बाद होताना दिसतात, ही फार मोठ्या दुर्दैवाची गोष्ट!  पूर्वी रेल्वेत किंवा शहरातल्या टपरीवरही मातीच्या कुल्हडमधून चहा मिळायचा... पण आता तो भूतकाळ झाला. कोलकात्यात मात्र आजही मातीच्या भांड्यात विरजलेलं घट्ट कवडीचं दही मिळतं. कोलकात्याला गेलो, की दरवेळी हे मातीच्या भांड्यातलं गोड दही खायला मी विसरत नाही. श्रीमंत घरातल्या खानदानी चांदीच्या भांड्यात जेवण्यातही हे सुख नाही ! ... सोन्या- चांदीची ताटं तो वेडावणारा मातीचा सुगंध कोठून उत्पन्न करणार?वास्तविक भावनांचा आधार घेत जगणारी माणसं, आध्यात्मिकतेच्या अधिक निकट  असणारी... निसर्गाबरोबर जगू पाहणारी लोभस माणसं कोणत्या ना कोणत्या रूपात मातीशी नातं जपू पाहतात. कारण आपण सर्वअखेरीस माती आहोत आणि मातीतच मिसळून जाणार आहोत; या सत्याची विनम्र जाण त्यांना असते. ग.दि. माडगूळकर लिहितात ते खरंच! माती, पाणी, उजेड आणि वारा, अशा सगळ्या पसाऱ्यातून ईश्वराने आपल्या देहांना आकार दिला. मातीमधून आपण अस्तित्वात आलो... एक दिवस तिच्यातच मिसळायचं आहे... कोणी राख होऊन मातीत मिसळेल, कोणी मातीच्या कुशीत दफन होईल... मग त्याच मातीतून पुन्हा नवं सृजन होईल!इंदिरा संत त्यांच्या एका कवितेत म्हणतात,रक्तामध्ये ओढ मातीची,मनास मातीचे ताजेपण,मातीतून मी आले वरती मातीचे मम अधुरे जीवन !अखेरीस मातीत मिसळून जाणार असलेल्या या अधुऱ्या जीवनात खरं  ऋण मानावं तेही मातीचंच! जीवनाचं नवं गाणं ऐकवण्याची आणि सृजनाचा संसार उभा करण्याची क्षमता केवळ आणि केवळ मातीतच तर  असते. विज्ञानानं प्रगती पुष्कळ केली. ज्या ज्या ग्रहांवर विज्ञानाच्या मदतीनं आपण पोहोचलो तिथं इथल्यासारखी माती नाही... माती नाही म्हणून जीवन नाही. बीज पडल्याबरोबर आमच्या धरतीला नवसंजीवनी प्राप्त होते. धान्य उगवतं; जे आपल्या जीवनऊर्जेचा आधार आहे. आमचे नैसर्गिक खेळही या मातीतूनच जन्माला आले आहेत, जे आपल्याला ऊर्जा देतात. आपली माती ऊर्जेचे भांडार आहे. आपली पृथ्वी, आपला देश, आपल्या गावाच्या मातीतच स्वर्ग दडलेला असतो, तो म्हणूनच!

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डाRamnath Kovindरामनाथ कोविंदPresidentराष्ट्राध्यक्षIndiaभारत