शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

दृष्टिकोन: एक लेखक त्याचं गाव सोडून जातो म्हणजे नेमकं काय होतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 03:16 IST

दहा-वीस जणांच्या भरल्या घरात एखाद्याला एकटं वाटू लागलं तर तो दोष त्या व्यक्तीचा कसा? त्याला एकटं का वाटतं याचा विचार घरातल्या बाकीच्यांनी करायचा असतो

अतुल कुलकर्णी, वरिष्ठ सहायक संपादक, लोकमतएक लेखक आपली हयात ज्या गावात घालवतो ते गाव स्वत:च स्वत:च्या जीवंतपणी सोडून जातो म्हणजे काय होतं..? ज्या गावात, घरात त्यानं अनेक दुर्मीळ पुस्तकांना जन्म दिला, अमोल असा ठेवा जगाला दिला, मोठा इतिहास शब्दबद्ध केला, ते गाव, ते घर सोडून लेखक आपल्या मूळ गावी जातो म्हणजे काय होतं..? का असं एकाकीपण आयुष्याच्या शेवटाला येतं..? लौकिकार्थाने सगळं काही मिळवूनही असं काय मिळवायचं शिल्लक राहातं..? म्हणून तोच लेखक त्यासाठी स्वत:च्या जन्मगावी जायला तयार होतो..? मारुती चितमपल्ली यांनी आपली कर्मभूमी असणारं नागपूरचं घर सोडून स्वत:च्या गावी, सोलापूरच्या घरी जाण्याचा निर्णय घेतल्याची बातमी वाचल्यापासून हे अस्वस्थ प्रश्न मनात आहेत. ही अशी अस्वस्थता निर्माण करून, आपली सगळी ग्रंथसंपदा आणि थोडेबहुत सामान घेऊन ते शनिवारी नागपूरहून आपल्या गावाकडे गेलेदेखील...

वर्तमानपत्रात बातम्या आल्या, हळहळ व्यक्त झाली. एखादं चॅनल आता ही बातमी धीरगंभीर आवाजात दाखवून भावनिक टीआरपीची बेगमी करेलही, पण पुढे काय..? इथे तर एक लेखक आपल्या आयुष्याचं ८८ वर्षांचं झाड, मुळासकट उपटून पुन्हा आपल्या मूळ गावी नव्याने लावायला जातोय..! तो ज्या गावात त्याच्या आयुष्याचं झाड पुन्हा नव्याने लावणार आहे ती माती भलेही त्याची जन्मभूमी असेल; पण ते अनुभवानं गच्च भरलेलं झाड पुन्हा त्या नव्या मातीत रुजेल का?

एक लेखक आपलं दाणापाणी संपलं म्हणून राहातं गाव सोडून जातो; त्याचा आमच्या जगण्यावर, आमच्या गावावर, आमच्या भावभावनांवर काहीच परिणाम का होत नाही..? आमच्या संवेदना आतून विस्कटून का जात नाहीत..? की आमची नाळ फार पूर्वीच तुटून गेलीय या सगळ्यापासून..? कळत न कळत त्या लेखकाने आमच्या असण्यावर, आमच्या वागण्या-बोलण्यावर काही परिणाम केले असतील की नाही..? याचाही विचार हल्ली मनाला का स्पर्श करत नाही..?

एखाद्या अभिनेत्याच्या आत्महत्येमुळे आपण हरतºहेने व्यक्त होतो... एखाद्या अभिनेत्रीच्या टीवटिवीवर भरभरून मतं मांडतो... एखाद्या राजकीय घटनेवर कधी या, कधी त्या बाजूने सतत बोलत राहातो... कधी स्वत:ला देशभक्त म्हणवून घेतो, तर कधी दुसऱ्यांना देशद्रोही ठरवत भांडत राहातो, मात्र एक लेखक असा आपली मुळं उचकटून जातो, तेव्हा आपल्या मनावर एक साधा तरंगही उमटू नये? आपल्याला काही म्हणजे काही वाटू नये? एरव्ही तावातावाने भांडणाºया आपल्या साहित्यसंस्था? संस्कृतीच्या नावानं सतत गळे काढणारं आपलं सरकार? आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात काही व्यक्तिगत अडचणींमुळे एकांतवासाचा सामना करणाºया आणि तरीही नवनव्या प्रकल्पांमध्ये जीव ओतून कार्यरत असलेल्या लेखकाच्या बाबतीत आपलं काही कर्तव्य आहे, असं यातल्या कुणालाच वाटू नये? - की सत्काराच्या शाली पांघरल्या म्हणजे संपली जबाबदारी? आयुष्याच्या अनुभवांची शिदोरी अंतापर्यंत सोबत देणारा लेखक गाव सोडून गेला तेव्हा नागपुरातल्या एकाही संवेदनशील राजकारण्याला दु:ख झालं नाही... का? कोणतंही गाव ओळखल जातं ते तिथल्या संस्कृती, साहित्यिक, विचारवंतांमुळे! बलाढ्य नेते अगर उत्तुंग इमारतींमुळे नव्हे!!

पंडित जवाहरलाल नेहरू एकदा लाल किल्ल्यावर कार्यक्रमाला गेले होते. तेथे चालताना पाय अडखळून त्यांचा तोल गेला, तेव्हा जवळच उभ्या असलेल्या कवी रामधारीसिंग दिनकर यांनी त्यांना सावरलं. नेहरूंनी त्यांना धन्यवाद दिले, सॉरीही म्हटलं; तेव्हा कवी दिनकर म्हणाले, पंडितजी, सॉरी म्हणू नका... राजसत्तेचे पाय जेव्हा डगमगतात तेव्हा साहित्य आणि साहित्यिकच त्यांना आधार देण्याचं काम करतात!’- आता हे कोण कुणाला सांगणार? अ‍ॅडॉल्फ सॅक्स यानं १८४० मध्ये सॅक्सोफोनचा शोध लावला. बेल्जियममधल्या डिनांट गावात तो १८१४ मध्ये जन्माला आला. २०६ वर्षं उलटून गेली, तरी त्या गावात आजही वेगवेगळ्या आकारातल्या सॅक्सोफोनच्या शेकडो प्रतिकृती चौकाचौकांत लावून ठेवलेल्या आहेत... त्या श्रेष्ठ वादकाची आठवण म्हणून!- इथेतर एक जीवंत लेखकच गावातून त्याच्या अनुभवाचं झाड मुळासकट उपटून निघून गेलाय; तरी कुणाला काही वाटू नये?

जाता जाता : दहा-वीस जणांच्या भरल्या घरात एखाद्याला एकटं वाटू लागलं तर तो दोष त्या व्यक्तीचा कसा? त्याला एकटं का वाटतं याचा विचार घरातल्या बाकीच्यांनी करायचा असतो... कसदार लेखनापायी ज्याने आपलं आयुष्य उधळलं; त्या ॠषितुल्य माणसाला आपण सोबत देऊ शकलो नाही, हेच अस्वस्थ सत्य!

टॅग्स :environmentपर्यावरणforestजंगल