शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दृष्टिकोन: एक लेखक त्याचं गाव सोडून जातो म्हणजे नेमकं काय होतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 03:16 IST

दहा-वीस जणांच्या भरल्या घरात एखाद्याला एकटं वाटू लागलं तर तो दोष त्या व्यक्तीचा कसा? त्याला एकटं का वाटतं याचा विचार घरातल्या बाकीच्यांनी करायचा असतो

अतुल कुलकर्णी, वरिष्ठ सहायक संपादक, लोकमतएक लेखक आपली हयात ज्या गावात घालवतो ते गाव स्वत:च स्वत:च्या जीवंतपणी सोडून जातो म्हणजे काय होतं..? ज्या गावात, घरात त्यानं अनेक दुर्मीळ पुस्तकांना जन्म दिला, अमोल असा ठेवा जगाला दिला, मोठा इतिहास शब्दबद्ध केला, ते गाव, ते घर सोडून लेखक आपल्या मूळ गावी जातो म्हणजे काय होतं..? का असं एकाकीपण आयुष्याच्या शेवटाला येतं..? लौकिकार्थाने सगळं काही मिळवूनही असं काय मिळवायचं शिल्लक राहातं..? म्हणून तोच लेखक त्यासाठी स्वत:च्या जन्मगावी जायला तयार होतो..? मारुती चितमपल्ली यांनी आपली कर्मभूमी असणारं नागपूरचं घर सोडून स्वत:च्या गावी, सोलापूरच्या घरी जाण्याचा निर्णय घेतल्याची बातमी वाचल्यापासून हे अस्वस्थ प्रश्न मनात आहेत. ही अशी अस्वस्थता निर्माण करून, आपली सगळी ग्रंथसंपदा आणि थोडेबहुत सामान घेऊन ते शनिवारी नागपूरहून आपल्या गावाकडे गेलेदेखील...

वर्तमानपत्रात बातम्या आल्या, हळहळ व्यक्त झाली. एखादं चॅनल आता ही बातमी धीरगंभीर आवाजात दाखवून भावनिक टीआरपीची बेगमी करेलही, पण पुढे काय..? इथे तर एक लेखक आपल्या आयुष्याचं ८८ वर्षांचं झाड, मुळासकट उपटून पुन्हा आपल्या मूळ गावी नव्याने लावायला जातोय..! तो ज्या गावात त्याच्या आयुष्याचं झाड पुन्हा नव्याने लावणार आहे ती माती भलेही त्याची जन्मभूमी असेल; पण ते अनुभवानं गच्च भरलेलं झाड पुन्हा त्या नव्या मातीत रुजेल का?

एक लेखक आपलं दाणापाणी संपलं म्हणून राहातं गाव सोडून जातो; त्याचा आमच्या जगण्यावर, आमच्या गावावर, आमच्या भावभावनांवर काहीच परिणाम का होत नाही..? आमच्या संवेदना आतून विस्कटून का जात नाहीत..? की आमची नाळ फार पूर्वीच तुटून गेलीय या सगळ्यापासून..? कळत न कळत त्या लेखकाने आमच्या असण्यावर, आमच्या वागण्या-बोलण्यावर काही परिणाम केले असतील की नाही..? याचाही विचार हल्ली मनाला का स्पर्श करत नाही..?

एखाद्या अभिनेत्याच्या आत्महत्येमुळे आपण हरतºहेने व्यक्त होतो... एखाद्या अभिनेत्रीच्या टीवटिवीवर भरभरून मतं मांडतो... एखाद्या राजकीय घटनेवर कधी या, कधी त्या बाजूने सतत बोलत राहातो... कधी स्वत:ला देशभक्त म्हणवून घेतो, तर कधी दुसऱ्यांना देशद्रोही ठरवत भांडत राहातो, मात्र एक लेखक असा आपली मुळं उचकटून जातो, तेव्हा आपल्या मनावर एक साधा तरंगही उमटू नये? आपल्याला काही म्हणजे काही वाटू नये? एरव्ही तावातावाने भांडणाºया आपल्या साहित्यसंस्था? संस्कृतीच्या नावानं सतत गळे काढणारं आपलं सरकार? आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात काही व्यक्तिगत अडचणींमुळे एकांतवासाचा सामना करणाºया आणि तरीही नवनव्या प्रकल्पांमध्ये जीव ओतून कार्यरत असलेल्या लेखकाच्या बाबतीत आपलं काही कर्तव्य आहे, असं यातल्या कुणालाच वाटू नये? - की सत्काराच्या शाली पांघरल्या म्हणजे संपली जबाबदारी? आयुष्याच्या अनुभवांची शिदोरी अंतापर्यंत सोबत देणारा लेखक गाव सोडून गेला तेव्हा नागपुरातल्या एकाही संवेदनशील राजकारण्याला दु:ख झालं नाही... का? कोणतंही गाव ओळखल जातं ते तिथल्या संस्कृती, साहित्यिक, विचारवंतांमुळे! बलाढ्य नेते अगर उत्तुंग इमारतींमुळे नव्हे!!

पंडित जवाहरलाल नेहरू एकदा लाल किल्ल्यावर कार्यक्रमाला गेले होते. तेथे चालताना पाय अडखळून त्यांचा तोल गेला, तेव्हा जवळच उभ्या असलेल्या कवी रामधारीसिंग दिनकर यांनी त्यांना सावरलं. नेहरूंनी त्यांना धन्यवाद दिले, सॉरीही म्हटलं; तेव्हा कवी दिनकर म्हणाले, पंडितजी, सॉरी म्हणू नका... राजसत्तेचे पाय जेव्हा डगमगतात तेव्हा साहित्य आणि साहित्यिकच त्यांना आधार देण्याचं काम करतात!’- आता हे कोण कुणाला सांगणार? अ‍ॅडॉल्फ सॅक्स यानं १८४० मध्ये सॅक्सोफोनचा शोध लावला. बेल्जियममधल्या डिनांट गावात तो १८१४ मध्ये जन्माला आला. २०६ वर्षं उलटून गेली, तरी त्या गावात आजही वेगवेगळ्या आकारातल्या सॅक्सोफोनच्या शेकडो प्रतिकृती चौकाचौकांत लावून ठेवलेल्या आहेत... त्या श्रेष्ठ वादकाची आठवण म्हणून!- इथेतर एक जीवंत लेखकच गावातून त्याच्या अनुभवाचं झाड मुळासकट उपटून निघून गेलाय; तरी कुणाला काही वाटू नये?

जाता जाता : दहा-वीस जणांच्या भरल्या घरात एखाद्याला एकटं वाटू लागलं तर तो दोष त्या व्यक्तीचा कसा? त्याला एकटं का वाटतं याचा विचार घरातल्या बाकीच्यांनी करायचा असतो... कसदार लेखनापायी ज्याने आपलं आयुष्य उधळलं; त्या ॠषितुल्य माणसाला आपण सोबत देऊ शकलो नाही, हेच अस्वस्थ सत्य!

टॅग्स :environmentपर्यावरणforestजंगल