शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

संपादकीय: जादूटोण्यावर प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 05:41 IST

Editorial : व्यक्ती अंधश्रद्धाळू असणे समजू शकते. मात्र, आपल्या काही व्यवस्थादेखील अंधश्रद्धाळू आहेत. त्यास प्रसारमाध्यमेदेखील अपवाद नाहीत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एका निवाड्यात यावरून माध्यमांवरही कोरडे ओढले आहेत.

भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये आम्हाला हे सांगतात की विज्ञाननिष्ठ दृष्टी, मानवतावाद, शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. अर्थात प्रत्येक नागरिकात वैज्ञानिक दृष्टिकोन कितपत रुजला याबाबत साशंकता आहे. का?, कसे?, काय?, केव्हा आणि कुठे? हे प्रश्न ज्याला सातत्याने पडतात तो विज्ञानवादी असे मानले जाते. असे प्रश्न न पडता किंवा चिकित्सा न करताच जो कुठल्याही गोष्टींवर डोळे झाकून विश्वास टाकतो त्याचा समावेश अंधश्रद्धाळू या वर्गात होतो. विज्ञान शिकविणारी महाविद्यालये खेडोपाडी उघडली असली तरी अंधश्रद्धा शिकविणारे शिकवणी वर्गही घरोघरी आहेत.

व्यक्ती अंधश्रद्धाळू असणे समजू शकते. मात्र, आपल्या काही व्यवस्थादेखील अंधश्रद्धाळू आहेत. त्यास प्रसारमाध्यमेदेखील अपवाद नाहीत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एका निवाड्यात यावरून माध्यमांवरही कोरडे ओढले आहेत. सध्या चॅनल्सवरून व इतर माध्यमांवरूनही यंत्र-तंत्रांच्या जाहिरातींचा धंदा जोरात आहे. हनुमान चालिसा नावाचे एक यंत्र तर असे आहे की जे म्हणे जीवनच बदलून टाकते. तसा दावा जाहिराती करतात. बडे बडे टीव्ही स्टार या जाहिराती करून माणसांवर भुरळ पाडतात. झटपट सुखाच्या शोधात असणारी माणसे काहीही चिकित्सा न करता या जाहिरातींना बळी बडतात. अर्थात सुख मिळवून देणारी  ही यंत्रं, मंत्र फुकट नाहीत. या सुखालाही विक्री मूल्य आहे. चॅनल पाहण्यासाठी पैसे मोजायचे आणि यंत्र खरेदी करण्यासाठीही. नागरिकांना फुकट सुख मिळवून  देणे या दैवी यंत्रांनाही जमलेले नाही. जी यंत्रंच फुकट नाहीत ती काय सुख मिळवून देणार? हा साधा प्रश्न मात्र माणसाला पडत नाही. समाज, शासनही या ढोंगाची चिकित्सा करत नाही. न्यायालयाने मात्र ती केली आहे. देवी, देवतांच्या नावाने यंत्र, तंत्र विक्री करण्याची जाहिरात दाखविण्यावर बंदी घालण्याचा आदेश न्यायालयाने सरकारला दिला आहे.

राज्य व केंद्र या दोन्ही सरकारांनी ही कार्यवाही करावी, असे न्यायालयाने सुनावले आहे. अशा जाहिराती केल्यास जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अध्यादेशानुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत, असेही न्यायालयाने बजावले. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी काय पावले उचलली याबाबतचा अहवालही न्यायालयाने मागविला आहे. वास्तविकत: लोकांना माहिती देणे, त्यांचे मनोरंजन व प्रबोधन करणे हा माध्यमांचा मुख्य हेतू होता. मात्र, जाहिरातींच्या मागे धावणारी माध्यमे प्रबोधनाऐवजी जादूटोण्याची वाहक व प्रचारक बनली हेच या निकालातून अधोरेखित झाले. पत्रकार दिन साजरा होत असतानाच न्यायालयाने दिलेला निकाल समस्त माध्यम जगताने समजावून घेणे आवश्यक आहे.

पुरोगामी महाराष्ट्रात माणसांना शहाणे करण्याचा प्रयत्न अनेक समाजसुधारकांनी केला. ‘सत्यावीण नाही अन्य धर्म’ अशी मांडणी महात्मा फुले यांनी केली. त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म सांगितला. दुर्दैवाने फुलेवादी म्हणविणारी मंडळीदेखील सत्यशोधनाकडे दुर्लक्ष करतात व नदीवर पिंडाला कावळा शिवण्यासाठी तिष्ठत बसतात. पिंड ठेवून कावळ्यांची वाट पाहत बसलेल्या माणसांच्या मेंदूचे करायचे काय, हा प्रश्न म्हणूनच नरेंद्र दाभोलकर यांनी उपस्थित केला. दाभोलकरांनीच महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा होण्यासाठी मोठा संघर्ष केला. या कायद्याचाच आधार घेत न्यायालयाने माध्यमांना अंधश्रद्धा पसरविणाऱ्या जाहिराती करण्यापासून रोखणारा आदेश दिला आहे. महाराष्ट्र व कर्नाटक वगळता अन्य राज्यांमध्ये अंधश्रद्धेविरोधात अद्याप ठोस कायदे नाहीत. प्रसारमाध्यमांसाठी जे कायदे बनले त्यातही अंधश्रद्धा पसरविणाऱ्या जाहिराती रोखण्यासाठी ठोस तरतुदी नाहीत, अशी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची अनेक वर्षांपासूनची तक्रार आहे. न्यायालयाने या निकालातून ही तक्रार एकप्रकारे दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. आपली राज्यघटना वैज्ञानिक दृष्टिकोन सांगत असली तरी प्रत्येकाच्या मेंदूत हा दृष्टिकोन रुजणेही महत्त्वाचे आहे.

नरेंद्र दाभोलकरांसारख्या समाजसुधारकांनी त्यासाठी अथक प्रयत्न केले; पण फारसा फरक पडला नाही. न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमूर्ती एम.जी. शेवलीकर यांनी वरील ऐतिहासिक निकाल दिला आहे. याच खंडपीठासमोर नगर जिल्ह्यातील मोहटादेवी देवस्थानचे असे एक प्रकरण आहे जेथे न्यायाधीश देवस्थानचे अध्यक्ष असताना दोन किलो सोन्याची सुवर्णयंत्रं मंदिरात पुरण्यात आली. तात्पर्य, लोकशाहीच्या चारही स्तंभांनी वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून घेणे व जपणे आवश्यक आहे. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय