शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

Atal Bihari Vajpayee : साधे जीवन, उच्च विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 03:38 IST

अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेप्रमाणे त्यांचे व्यक्तिमत्त्वदेखील तितकेच प्रभावी होते. आयुष्यभर सर्वसामान्यत्व जपलेला हा मनुष्य ‘साधे जीवन, उच्च विचार’ या उक्तीप्रमाणेच जगला.

- मा.गो. वैद्य, ( माजी प्रवक्ते, रा.स्व. संघ)अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेप्रमाणे त्यांचे व्यक्तिमत्त्वदेखील तितकेच प्रभावी होते. आयुष्यभर सर्वसामान्यत्व जपलेला हा मनुष्य ‘साधे जीवन, उच्च विचार’ या उक्तीप्रमाणेच जगला. अगदी खासदार असतानादेखील स्वत:चे कपडे ते धुवत असत. जिव्हेवर सरस्वती अन् मनात भारतमाता घेऊन जगणारे अटलजी अलौकिकच होते. नागपुरात अटलबिहारी वाजपेयी यांनी संघ तृतीय शिक्षा वर्गात प्रशिक्षण घेतले होते.या शिक्षा वर्गात अटलजींची वक्तृत्वावरील पकड, कवितेची जाण आणि लाघवी व्यक्तिमत्त्व अनुभवयाची पहिल्यांदा संधी मिळाली. अनेक स्वयंसेवक त्यांच्यापासून प्रभावित झाले होते.अटलबिहारी वाजपेयी १९६१ ते १९६६ या कालावधीत जनसंघाच्या कामाने अनेकदा नागपूरला आले. एरवी ते महानगर अध्यक्ष सुंदरलाल रॉय यांच्या घरी थांबत. मात्र रॉय शहरात नसल्यामुळे अटलबिहारी वाजपेयी एकदा माझ्या निवासस्थानी थांबले. त्यावेळी खासदार असूनदेखील त्यांनी खाली बसूनच जेवण करणे पसंत केले व कपडेदेखील स्वत: धुतले.विनोदी ‘काले’ कविता१९४५ च्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचे सर्वाधिकारी मल्हारराव काळे हे होते. अटलजी हिंदी भाषेत त्यांना ‘काले’ असे म्हणत. शिक्षा वर्गात सायंकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमांत अटलजींनी ‘रेशमबाग की मिट्टी काली, नाग नदी का पानी काला और...हमारे सर्वाधिकारी भी काले’ अशी कविता म्हणून सर्वांनाच पोट धरुन हसायला भाग पाडले होते.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी